*डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन* *शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी समाधान शिबिर उपक्रम अतिशय महत्वाचा - डॉ.शेफाली भुजबळ* * महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासन आपल्या दारी या भूमिकेतून राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज माऊली लॉन्स येवला येथे पार पडले. यावेळी आयोजित उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, अपर तहसीलदार शीतल घोलप, नायब तहसीलदार पंकज नेवसे, नायब तहसीलदार विवेक चांदवडकर, उपअभियंता पुष्पा पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थी नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, शासन आपल्या दारी या भूमिकेतून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दाखल्यांचे वितरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी समाधान शिबिर हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. महाराजस्व समाधान शिबिर हे केवळ एक शासकीय उपक्रम नसून नागरिकांच्या विश्वासाला बळकटी देणारे माध्यम आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचा प्रयत्न या अभियानातून दिसून येतो. या समाधान शिबिरात नागरिकांना विविध महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ७/१२ व ८अ उताऱ्यांचे वितरण, फेरफार नोंदींचा निपटारा, जमीन मोजणी, वारसा नोंद, तसेच विविध योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
*डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन* *शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी समाधान शिबिर उपक्रम अतिशय महत्वाचा - डॉ.शेफाली भुजबळ* * महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासन आपल्या दारी या भूमिकेतून राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज माऊली लॉन्स येवला येथे पार पडले. यावेळी आयोजित उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास
बनकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, अपर तहसीलदार शीतल घोलप, नायब तहसीलदार पंकज नेवसे, नायब तहसीलदार विवेक चांदवडकर, उपअभियंता पुष्पा पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थी नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, शासन आपल्या दारी या भूमिकेतून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दाखल्यांचे वितरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी समाधान शिबिर हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. महाराजस्व समाधान शिबिर हे केवळ एक शासकीय उपक्रम नसून नागरिकांच्या विश्वासाला बळकटी देणारे माध्यम आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी
अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचा प्रयत्न या अभियानातून दिसून येतो. या समाधान शिबिरात नागरिकांना विविध महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ७/१२ व ८अ उताऱ्यांचे वितरण, फेरफार नोंदींचा निपटारा, जमीन मोजणी, वारसा नोंद, तसेच विविध योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
- अनुमंडलीय अस्पताल की सीढ़ियों पर महिला ने बच्चे को दिया जन्म, जच्चा-बच्चा सुरक्षित अनुमंडलीय अस्पताल बाढ़ में एक महिला ने अस्पताल के बाहर सीढ़ी पर बच्चें को जन्म दिया, यह नजारा उस समय आश्चर्यचकित कर देने वाला था। घर पर लेबर पेन उठने के बाद वह ऑटो से इलाज के लिए बाढ़ अनुमंडल अस्पताल पहुंची। जहां अचानक लेबर पेन उठने के बाद उसने वहीं नवजात को जन्म दिया। महिला धनमंती देवी का मायके बाढ़ के उमानाथ मोहल्ला में है और उसका ससुराल सकसोहरा है। ई-रिक्शा से अस्पताल आई थी लेकिन ई-रिक्शा चालक ने उसे अस्पताल के पुराने भवन के पास ही छोड़ दिया। जहां से लगभग 100 मीटर की दूरी तक वह पैदल आई और इस दौरान एक महिला परिजन भी उसके साथ थी। तभी अचानक महिला अनुमंडलीय अस्पताल के नए भवन की प्रवेश द्वार की सीढी तक पहुंचते ही रुक गई और जब तक अस्पताल के कर्मी यह समझ पाते तब तक प्रसूति महिला वही लेट गई और उसकी सहयोगी महिला ने उनका ढाढस बांधते रही। आधे घंटे बाद अस्पताल प्रशासन हरकत में आया इसके बाद अस्पताल के सीढ़ी पर ही महिला ने बच्चें को जन्म दिया वहां मौजूद लोग यह नजारा देखकर स्तब्ध रह गए, बच्चा को जन्म देने के बाद महिला अस्पताल के भीतर गई जहां उनकी जांच की जा रही है। फिलहाल बताया जा रहा है कि जच्चा और बच्चा दोनों सुरक्षित है।1
- "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- Post by Mushraf Tadvi1
- 🗒️ विषय: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी शरद कळस्कर यांना आज मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच अन्य अधिवक्त्यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.1
- येवला येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महादेवांची विधिवत महापूजा आणि मनमोहक भस्म आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा महादेवांना प्रभू श्रीरामांच्या स्वरूपात अत्यंत देखणा शृंगार साकारण्यात आला होता. या अलौकिक दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.1
- 🎤 वक्ता : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरजी, (मुंबई उच्च न्यायालय) राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद1
- Post by Mushraf Tadvi1