लातूर. मनपा शाळेत Eat Right मोहिमेस सुरुवात. मनपा शाळेत Eat Right मोहिमेस सुरुवात मनपा शाळेत Eat Right मोहिमेस सुरुवात लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संतुलित आहार (Eat Right) या मोहिमेचा मनपाच्या शाळा क्रमांक ९ येथून शुभारंभ करण्यात आला. मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या संकल्पनेतून तसेच उपायुक्त श्रीमती वसुधा फड यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळा मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत आरोग्य विभागाच्या वतीने संतुलित आहार विषयी चर्चासत्र घेण्यात आले.या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मागील महिन्यापासून मनपा शाळातील सर्व मुलांची तपासणी सुरू आहे.शाळकरी मुलांच्या वाढीकडे लक्ष देत त्यांच्यातील कुपोषितपणा शोधण्याचे काम यातून केले जात आहे.या तपासणीमध्ये जी मुले वयोमानानुसार वजनाने कमी आढळली त्यांची पुढील वर्षभरात दर महिन्यास तपासणी केली जाणार आहे.गरज पडल्यास मोफत औषधोपचार करून वजन वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आहाराविषयी समुपदेशन केले जाणार आहे.याच मोहिमेचा भाग म्हणून शाळा क्रमांक ९ मध्ये झालेल्या या चर्चासत्रात पालकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती,आहार तज्ञ श्रीमती अंधोरीकर,माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.श्यामा जाधव,आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉ.व्यवहारे,डॉ.शीला पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची यावेळी उपस्थिती होती.
लातूर. मनपा शाळेत Eat Right मोहिमेस सुरुवात. मनपा शाळेत Eat Right मोहिमेस सुरुवात मनपा शाळेत Eat Right मोहिमेस सुरुवात लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संतुलित आहार (Eat Right) या मोहिमेचा मनपाच्या शाळा क्रमांक ९ येथून शुभारंभ करण्यात आला. मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या संकल्पनेतून तसेच उपायुक्त श्रीमती वसुधा फड यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळा मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत आरोग्य विभागाच्या वतीने संतुलित आहार विषयी चर्चासत्र घेण्यात आले.या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मागील महिन्यापासून मनपा शाळातील सर्व मुलांची तपासणी सुरू आहे.शाळकरी मुलांच्या वाढीकडे लक्ष देत त्यांच्यातील कुपोषितपणा शोधण्याचे काम यातून केले जात आहे.या तपासणीमध्ये जी मुले वयोमानानुसार वजनाने कमी आढळली त्यांची पुढील वर्षभरात दर महिन्यास तपासणी केली जाणार आहे.गरज पडल्यास मोफत औषधोपचार करून वजन वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आहाराविषयी समुपदेशन केले जाणार आहे.याच मोहिमेचा भाग म्हणून शाळा क्रमांक ९ मध्ये झालेल्या या चर्चासत्रात पालकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती,आहार तज्ञ श्रीमती अंधोरीकर,माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.श्यामा जाधव,आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉ.व्यवहारे,डॉ.शीला पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची यावेळी उपस्थिती होती.
- लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू लातूर | प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले. दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर1
- *वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पत्रकारांच्या अडचणींकडे विधानपरिषद सभागृहात लक्ष वेधले* मुंबई, दि. ९ मार्च २०२६ : महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये काम केले ते बंद पडलेले असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये सत्यता पडताळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामात निकषांबाबत तांत्रिक अडचणीतुन मार्ग काढण्यास यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, जेणेकरून पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होईल. अनेक वृद्ध पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात, मात्र विद्यमान यंत्रणेतील मर्यादांमुळे त्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला (DGIPR) या संदर्भात अधिक अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.1
- Post by अखंड भारत1
- अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?2
- Post by Dilip Surwase5
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- Post by Dilip Surwase7