logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उमापूर येथे सुरु..! - पादुकांच्या हेलिकॉप्टर आगमनाने सोहळ्याला भव्यतेची जोड ; पठाडे महाराजांच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध..! श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उमापूर येथे सुरु..! - पादुकांच्या हेलिकॉप्टर आगमनाने सोहळ्याला भव्यतेची जोड ; पठाडे महाराजांच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध..! शिरूर कासार प्रतिनिधी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उमापूर येथे अतिशय भव्य, दिव्य आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे. गावागावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे उमापूर नगरी अक्षरशः भक्तीच्या सागरात न्हाऊन निघाली आहे. या सप्ताहाच्या प्रारंभीच युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीमध्ये “उमापूरमध्ये भक्तीचा महापूर आला आहे,” उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. सप्ताहाचे उद्घाटन महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी महंत संभाजी महाराज, दत्ता महाराज गिरी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिभावाचे वातावरण अधिकच गडद झाले. आज सकाळी नारायणगड येथून नगदनारायण महाराज यांच्या पादुका महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते हेलिकॉप्टरद्वारे उमापूर येथे आणण्यात आल्या. या अभूतपूर्व सोहळ्याने कार्यक्रमाची भव्यता अधिकच खुलून आली. पादुकांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात भव्य दिव्य दिंडी सोहळा पार पडला. त्यानंतर फुलांची उधळण करत भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले. सप्ताहातील पहिले कीर्तनपुष्प युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर पठाडे माऊली यांनी गुंफले. आपल्या कीर्तनातून त्यांनी सांगितले की, “नारायणगडचा फिरता नारळी सप्ताह म्हणजे लोकांचे ऊर्जाकेंद्र आहे. ही परंपरा केवळ धार्मिक नसून समाजाला एकत्र आणणारी, प्रेरणा देणारी आहे. भक्तिसंप्रदायातील सर्व गडांचा जनक म्हणून नारायणगडाची ओळख असून, ही परंपरा समाजाला दिशा देणारी आहे.” तसेच, उमापूरमधील तरुणांनी आपली शक्ती, वेळ आणि श्रम पणाला लावून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी घेतलेली मेहनतही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली. यावेळी पठाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या “पडता जडभारी | दासी आठवावा हरी मग तो होऊ नेदी सिण | आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने | बारा वाटा पळती विघ्ने तुका म्हणे प्राण | करा देवासी अर्पण” या अभंगावर अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी चिंतन मांडले. नामस्मरणाची ताकद, संकटसमयी हरिनामाचे महत्त्व आणि पूर्ण समर्पणाची भावना त्यांनी अत्यंत सुंदररीत्या उलगडून सांगितली. त्यांच्या प्रभावी निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दुपारच्या सत्रात समाधान महाराज शर्मा यांनी रामकथेच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक बळ दिले. त्यांच्या कथनातून रामभक्ती, आदर्श जीवन आणि धर्माचरण यांचे महत्त्व अधोरेखित झाले. सप्ताहादरम्यान मोठ्या प्रमाणात अन्नदान सुरू असून, हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे गाथा भजन, हरिपाठ आणि संगीत भजन असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रमही अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात पार पडत आहेत. या सतत सुरू असलेल्या उपक्रमांमुळे उमापूर परिसरात अखंड भक्तिरसाची अनुभूती मिळत आहे. आजच्या कीर्तन सोहळ्यास हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. उमापूरमध्ये सध्या श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडत असून, आगामी दिवसांतही विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे हा उत्सव अधिकच रंगतदार होणार आहे. फुले टाकण्याच्या कार्यक्रमाला गडाचे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

1 hr ago
user_Mahesh Mangrulkar
Mahesh Mangrulkar
Shirur (Kasar), Beed•
1 hr ago
25d17336-4a3c-4952-a4c3-4e2153ec5920

श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उमापूर येथे सुरु..! - पादुकांच्या हेलिकॉप्टर आगमनाने सोहळ्याला भव्यतेची जोड ; पठाडे महाराजांच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध..! श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उमापूर येथे सुरु..! - पादुकांच्या हेलिकॉप्टर आगमनाने सोहळ्याला भव्यतेची जोड ; पठाडे महाराजांच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध..! शिरूर कासार प्रतिनिधी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उमापूर येथे अतिशय भव्य, दिव्य आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे. गावागावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे उमापूर नगरी अक्षरशः भक्तीच्या सागरात न्हाऊन निघाली आहे. या सप्ताहाच्या प्रारंभीच युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीमध्ये “उमापूरमध्ये भक्तीचा महापूर आला आहे,” उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. सप्ताहाचे उद्घाटन महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी महंत संभाजी महाराज, दत्ता महाराज गिरी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिभावाचे वातावरण अधिकच गडद झाले. आज सकाळी नारायणगड येथून नगदनारायण महाराज यांच्या पादुका महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते हेलिकॉप्टरद्वारे उमापूर येथे आणण्यात आल्या. या अभूतपूर्व सोहळ्याने कार्यक्रमाची भव्यता अधिकच खुलून आली. पादुकांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात भव्य दिव्य दिंडी सोहळा पार पडला. त्यानंतर फुलांची उधळण करत भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले. सप्ताहातील पहिले कीर्तनपुष्प युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर पठाडे माऊली यांनी गुंफले. आपल्या कीर्तनातून त्यांनी सांगितले की, “नारायणगडचा फिरता नारळी

07f75972-afe4-4464-a939-06fec8b1dee3

सप्ताह म्हणजे लोकांचे ऊर्जाकेंद्र आहे. ही परंपरा केवळ धार्मिक नसून समाजाला एकत्र आणणारी, प्रेरणा देणारी आहे. भक्तिसंप्रदायातील सर्व गडांचा जनक म्हणून नारायणगडाची ओळख असून, ही परंपरा समाजाला दिशा देणारी आहे.” तसेच, उमापूरमधील तरुणांनी आपली शक्ती, वेळ आणि श्रम पणाला लावून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी घेतलेली मेहनतही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली. यावेळी पठाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या “पडता जडभारी | दासी आठवावा हरी मग तो होऊ नेदी सिण | आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने | बारा वाटा पळती विघ्ने तुका म्हणे प्राण | करा देवासी अर्पण” या अभंगावर अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी चिंतन मांडले. नामस्मरणाची ताकद, संकटसमयी हरिनामाचे महत्त्व आणि पूर्ण समर्पणाची भावना त्यांनी अत्यंत सुंदररीत्या उलगडून सांगितली. त्यांच्या प्रभावी निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दुपारच्या सत्रात समाधान महाराज शर्मा यांनी रामकथेच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक बळ दिले. त्यांच्या कथनातून रामभक्ती, आदर्श जीवन आणि धर्माचरण यांचे महत्त्व अधोरेखित झाले. सप्ताहादरम्यान मोठ्या प्रमाणात अन्नदान सुरू असून, हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे गाथा भजन, हरिपाठ आणि संगीत भजन असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रमही अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात पार पडत आहेत. या सतत सुरू असलेल्या उपक्रमांमुळे उमापूर परिसरात अखंड भक्तिरसाची अनुभूती मिळत आहे. आजच्या कीर्तन सोहळ्यास हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. उमापूरमध्ये सध्या श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडत असून, आगामी दिवसांतही विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे हा उत्सव अधिकच रंगतदार होणार आहे. फुले टाकण्याच्या कार्यक्रमाला गडाचे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    7
    भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    user_D K G Pradesh Prasar
    D K G Pradesh Prasar
    Media house गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    2
    बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    user_Motiram Narke
    Motiram Narke
    Local Politician बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----
    1
    ---
(प्रतिनिधी):-  बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-----
“रात्री पाणी देताना जीव धोक्यात”
---
सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली.
-----
सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. 
---
डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
-----
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सर्व धर्मीय सद्भावना ईद मिलन: Bk Dr Donika & Maulana ने दिया शांति का संदेश
    1
    सर्व धर्मीय सद्भावना ईद मिलन: Bk Dr Donika & Maulana ने दिया शांति का संदेश
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    54 min ago
  • जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    1
    जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    46 min ago
  • जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    1
    जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.