भेंडवळच्या भविष्यवाणीनं शेतकऱ्याची चिंता वाढली, पाऊसपाणीबाबत काय सांगितला अंदाज शेकडो वर्षांची परंपरा आणि शेतकऱ्यांचा अढळ विश्वास बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदाची घटमांडणी पार पडली असून, वर्षभरासाठी महत्त्वाचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.पावसाचा अंदाज, सुरुवात दमदार, शेवट आव्हानात्मक यंदा पावसाचे प्रमाण एकूणात सर्वसाधारण राहील, असे भाकीत करण्यात आले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण मध्यम राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. हंगामाच्या शेवटी पुन्हा पावसाचा जोर वाढेल. या अतिवृष्टीमुळे काही भागात महापूर येऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेती आणि पिकांची स्थिती कशी असणार? शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष थोडे आव्हानात्मक ठरू शकते. पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि त्यांना बाजारात चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. तर ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भेंडवळच्या भविष्यवाणीनं शेतकऱ्याची चिंता वाढली, पाऊसपाणीबाबत काय सांगितला अंदाज शेकडो वर्षांची परंपरा आणि शेतकऱ्यांचा अढळ विश्वास बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदाची घटमांडणी पार पडली असून, वर्षभरासाठी महत्त्वाचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.पावसाचा अंदाज, सुरुवात दमदार, शेवट आव्हानात्मक यंदा पावसाचे प्रमाण एकूणात सर्वसाधारण राहील, असे भाकीत करण्यात आले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण मध्यम राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. हंगामाच्या शेवटी पुन्हा पावसाचा जोर वाढेल. या अतिवृष्टीमुळे काही भागात महापूर येऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेती आणि पिकांची स्थिती कशी असणार? शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष थोडे आव्हानात्मक ठरू शकते. पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि त्यांना बाजारात चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. तर ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- 👩💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…1
- सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .1
- सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला1