राजकारणाच्या खेळात पुन्हा एकदा सत्य, प्रामाणिकपणा आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न... :- शेख जिलानी --- राजकारणाच्या खेळात पुन्हा एकदा सत्य, प्रामाणिकपणा आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांसारख्या कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकाऱ्यांची बदली ही केवळ एका व्यक्तीची बदली नाही, तर ती लाखो दिव्यांगांच्या आशा-अपेक्षांवर घाला आहे. असे प्रतिपादन दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेख जिलानी यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की आज जर आपण शांत बसलो, तर उद्या आपल्या हक्कांवर कुणी ही सहज पाय ठेवेल. त्या मुळे ही लढाई आता एका व्यक्ती पुरती राहिलेली नाही ही लढाई आहे न्यायाची, सन्मानाची आणि आपल्या हक्कांच्या अस्तित्वाची, बीड जिल्ह्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव आणि भगिनींनी, गट-तट, पक्ष, संघटना, संस्था या सगळ्या भिंती तोडून एकत्र यायची वेळ आली आहे. मंत्रालय, मुंबईवर आपल्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवायचा आहे. जो पर्यंत तुकाराम मुंढे साहेबांची बदली रद्द होत नाही आणि त्यांची पुन्हा दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती होत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. ही फक्त मागणी नाही हा इशारा आहे अन्याय करणाऱ्यांना...
राजकारणाच्या खेळात पुन्हा एकदा सत्य, प्रामाणिकपणा आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न... :- शेख जिलानी --- राजकारणाच्या खेळात पुन्हा एकदा सत्य, प्रामाणिकपणा आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांसारख्या कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकाऱ्यांची बदली ही केवळ एका व्यक्तीची बदली नाही, तर ती लाखो दिव्यांगांच्या आशा-अपेक्षांवर घाला आहे. असे प्रतिपादन दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेख जिलानी यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की आज जर आपण शांत बसलो, तर उद्या आपल्या हक्कांवर कुणी ही सहज पाय ठेवेल. त्या मुळे ही लढाई आता एका व्यक्ती पुरती राहिलेली नाही ही लढाई आहे न्यायाची, सन्मानाची आणि आपल्या हक्कांच्या अस्तित्वाची, बीड जिल्ह्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव आणि भगिनींनी, गट-तट, पक्ष, संघटना, संस्था या सगळ्या भिंती तोडून एकत्र यायची वेळ आली आहे. मंत्रालय, मुंबईवर आपल्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवायचा आहे. जो पर्यंत तुकाराम मुंढे साहेबांची बदली रद्द होत नाही आणि त्यांची पुन्हा दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती होत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. ही फक्त मागणी नाही हा इशारा आहे अन्याय करणाऱ्यांना...
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- Post by कर्जत लाईव्ह1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1