साखर कारखान्यांना व्यावसायिक साखर विक्रीचा दर ठरवण्याची मुभा द्या - प्रा.शिवाजीराव पाटील. कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर) :- बदलती मुक्त अर्थव्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी स्पर्धा ही सगळ्याच उद्योगासमोर आव्हान बनली आहे त्यात सहकारी साखर कारखानदारी देखील सुटलेली नाही तेव्हा शेतकरी, साखर कामगार व त्यावर अवलंबून असणारा घटक जोपासण्यासाठी शासनाने सहकार चळवळीला बळ देऊन, साखर कारखान्यांना कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून अनुदानात वाढ करावी, एफ आर पी देताना साखर कारखान्यांना कसरत करावी लागत आहे तेव्हा साखर विक्रीचा दर तातडीने वाढवावा, इथेनॉल खरेदी दरात वाढ करावी व शीतपेय, मिठाई व अन्य व्यावसायिक घटकांना लागणाऱ्या साखरेसाठीचा स्वतंत्र विक्री दर साखर कारखान्यांना ठरवण्याची मुभा द्यावी असे ठराव भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी मांडले. श्रीक्षेत्र शिर्डी परिसरातील सावळीविहिर येथील साई पालखी निवारा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले. त्याचे दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत हे शिबिर भरवण्यामागील भूमिका स्पष्ट करून राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पहिल्या दिवसाचे उद्घाटन झाले असे सांगितले. सरचिटणीस राऊसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक करत साखर कामगार त्यांच्या पुढील प्रश्न, निर्माण होणारी नवनवीन आव्हाने, साखर कारखानदारी चालवताना येणाऱ्या अडचणी, शेतकरी, सभासद या सगळ्या घटकांचा उहापोह करत व राज्यातील साखर कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ काय करत आहे याची माहिती दिली. दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष तात्यासाहेब काळे व सरचिटणीस राऊसाहेब पाटील यांचा सत्कार करून त्यांना गाय वासरू प्रतीकात्मक भेटवस्तू दिली. प्रा.शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील साखर कारखानदारी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे शेतकऱ्यांना एफआरपी देताना अतिशय कसरत करावी लागत आहे मागील दोन हंगाम अत्यंत अडचणीचे गेले , येणारे हंगामात साखर कारखानदारी व त्यावर अवलंबून असणारा खर्च कसा भागवायचा याची चिंता सगळ्यांनाच पडली आहे तेव्हा शासनाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच याबाबत वेळीच धोरण घेऊन त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, राज्यासह देशातील साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली आहे. तेव्हा अमित शहा यांनी यात लवकर मार्ग काढावा व देशातील सहकार चळवळ वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, घरगुती वापरासाठी ३० टक्के साखर विक्री होते तर ७० टक्के साखर व्यावसायिक कारणांसाठी वापरली जाते, त्यांना मात्र अतिशय कमी दरामध्ये ही साखर उपलब्ध होते, हे गणित कुठे जमत नाही. तेव्हा राज्यातील साखर कारखान्यांना व्यावसायिक कारणासाठी साखर विक्रीचा दर ठरवण्याची मुभा तातडीने देण्यात यावी, त्याचबरोबर या एफ. आर. पी. मध्ये कामगारांचे पगार देखील समावेश करण्यात यावा, याप्रसंगी मिलिंद रानडे यांनी कामगार चळवळ व त्यापुढील आव्हाने याबाबत सखोल मार्गदर्शन करून केंद्र शासनाच्या कामगार विषयक नवनवीन धोरणावर टीका केली. दुपारच्या सत्रात कामगार कायदे व चळवळ याविषयी विधीज्ञ संतोष म्हस्के तर नवीन कामगार कायदे याबाबत विधीज्ञ दीपक भालेराव यांनी सविस्तर विवेचन करून केंद्र शासनाने नव्याने आणलेले कायदे कामगारांच्या दृष्टीने घातक आहे परिणामी कामगार चळवळ, सहकार संपुष्टात येईल, यासाठी याचा पुनर्विचार व्हावा. जवाहर सहकारी साखर कारखान्याचे श्री हळदकर यांनी उपस्थित साखर कामगारांना हास्य क्लब मधील हास्याचे विविध प्रकार शिकवले, दत्त शिरोळ कारखान्याचे चंद्रशेखर कुलांगी यांनी आभार व सूत्रसंचालन केले. या शिबिराचा समारोप शनिवार दिनांक एक ऑगस्ट रोजी होत आहे या मार्गदर्शन शिबिरासाठी राज्यभरातील साखर कामगार, अधिकारी पदाधिकारी विविध कामगार संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळीविहिर येथील साई पालखी निवारा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे. साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले. त्याचे दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पार पडले, याप्रसंगी अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊसाहेब पाटील व सर्व संचालक, साखर कामगार उपस्थित होते.
साखर कारखान्यांना व्यावसायिक साखर विक्रीचा दर ठरवण्याची मुभा द्या - प्रा.शिवाजीराव पाटील. कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर) :- बदलती मुक्त अर्थव्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी स्पर्धा ही सगळ्याच उद्योगासमोर आव्हान बनली आहे त्यात सहकारी साखर कारखानदारी देखील सुटलेली नाही तेव्हा शेतकरी, साखर कामगार व त्यावर अवलंबून असणारा घटक जोपासण्यासाठी शासनाने सहकार चळवळीला बळ देऊन, साखर कारखान्यांना कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून अनुदानात वाढ करावी, एफ आर पी देताना साखर कारखान्यांना कसरत करावी लागत आहे तेव्हा साखर विक्रीचा दर तातडीने वाढवावा, इथेनॉल खरेदी दरात वाढ करावी व शीतपेय, मिठाई व अन्य व्यावसायिक घटकांना लागणाऱ्या साखरेसाठीचा स्वतंत्र विक्री दर साखर कारखान्यांना ठरवण्याची मुभा द्यावी असे ठराव भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी मांडले. श्रीक्षेत्र शिर्डी परिसरातील सावळीविहिर येथील साई पालखी निवारा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले. त्याचे दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन प्रा. शिवाजीराव पाटील
यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत हे शिबिर भरवण्यामागील भूमिका स्पष्ट करून राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पहिल्या दिवसाचे उद्घाटन झाले असे सांगितले. सरचिटणीस राऊसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक करत साखर कामगार त्यांच्या पुढील प्रश्न, निर्माण होणारी नवनवीन आव्हाने, साखर कारखानदारी चालवताना येणाऱ्या अडचणी, शेतकरी, सभासद या सगळ्या घटकांचा उहापोह करत व राज्यातील साखर कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ काय करत आहे याची माहिती दिली. दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष तात्यासाहेब काळे व सरचिटणीस राऊसाहेब पाटील यांचा सत्कार करून त्यांना गाय वासरू प्रतीकात्मक भेटवस्तू दिली. प्रा.शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील साखर कारखानदारी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे शेतकऱ्यांना एफआरपी देताना अतिशय कसरत करावी लागत आहे मागील दोन हंगाम अत्यंत अडचणीचे गेले , येणारे हंगामात साखर कारखानदारी व
त्यावर अवलंबून असणारा खर्च कसा भागवायचा याची चिंता सगळ्यांनाच पडली आहे तेव्हा शासनाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच याबाबत वेळीच धोरण घेऊन त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, राज्यासह देशातील साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली आहे. तेव्हा अमित शहा यांनी यात लवकर मार्ग काढावा व देशातील सहकार चळवळ वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, घरगुती वापरासाठी ३० टक्के साखर विक्री होते तर ७० टक्के साखर व्यावसायिक कारणांसाठी वापरली जाते, त्यांना मात्र अतिशय कमी दरामध्ये ही साखर उपलब्ध होते, हे गणित कुठे जमत नाही. तेव्हा राज्यातील साखर कारखान्यांना व्यावसायिक कारणासाठी साखर विक्रीचा दर ठरवण्याची मुभा तातडीने देण्यात यावी, त्याचबरोबर या एफ. आर. पी. मध्ये कामगारांचे पगार देखील समावेश करण्यात यावा, याप्रसंगी मिलिंद रानडे यांनी कामगार चळवळ व त्यापुढील आव्हाने याबाबत सखोल मार्गदर्शन करून केंद्र शासनाच्या कामगार विषयक नवनवीन धोरणावर टीका केली. दुपारच्या सत्रात कामगार कायदे व चळवळ याविषयी
विधीज्ञ संतोष म्हस्के तर नवीन कामगार कायदे याबाबत विधीज्ञ दीपक भालेराव यांनी सविस्तर विवेचन करून केंद्र शासनाने नव्याने आणलेले कायदे कामगारांच्या दृष्टीने घातक आहे परिणामी कामगार चळवळ, सहकार संपुष्टात येईल, यासाठी याचा पुनर्विचार व्हावा. जवाहर सहकारी साखर कारखान्याचे श्री हळदकर यांनी उपस्थित साखर कामगारांना हास्य क्लब मधील हास्याचे विविध प्रकार शिकवले, दत्त शिरोळ कारखान्याचे चंद्रशेखर कुलांगी यांनी आभार व सूत्रसंचालन केले. या शिबिराचा समारोप शनिवार दिनांक एक ऑगस्ट रोजी होत आहे या मार्गदर्शन शिबिरासाठी राज्यभरातील साखर कामगार, अधिकारी पदाधिकारी विविध कामगार संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळीविहिर येथील साई पालखी निवारा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे. साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले. त्याचे दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पार पडले, याप्रसंगी अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊसाहेब पाटील व सर्व संचालक, साखर कामगार उपस्थित होते.
- बदापूर-ब्राह्मणगाव रस्त्याची दैनंदिन दुरवस्था: संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतली; नागरिक हैराण येवला:दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बदापूर ते ब्राह्मणगाव रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे रोजच लहान-मोठी वाहने फसण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास मोठा उशीर झाला. या रस्त्यावरून दररोज दुचाकी, छोटा हत्ती आणि ट्रॅक्टरसारखी वाहने चिखलात अडकून पडतात. आज अचानक शाळेची बस रस्त्यातच रुतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली. दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर तातडीने 'रस्त्याचे' काम करून रस्ता दुरुस्त करावा, अशी तीव्र मागणी त्रस्त ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे1
- शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!1
- चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे4
- येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.2
- खड्ड्याच्या प्रश्नांवर"अधिकारी महापौर, आमदारांचेही ऐकत नाहीत"; खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संताप नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "एवढे खड्डे नाशिकमध्ये यापूर्वी कधीच नव्हते. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असून वारंवार अपघात घडत आहेत आणि नागरिकांचा जीव जात आहे," असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली. तसेच महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. "अधिकारी महापौर, आमदार आणि कुंभमेळा मंत्र्यांचेही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा टोला लगावत भुजबळ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.1
- दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .1
- मालेगाव पंढरपूर बसमध्ये प्रवाशांच्या जीव धोक्यात... - भर पावसात गाडीची काच तुटलेली व्हायपर बंद, तरीही वाहनचालक गाडी चालवतोय... - गाडीतील सुज्ञ प्रवाशांकडून व्हिडिओ व्हायरल... नाशिकच्या मालेगाव बस डेपो मधून मालेगाव पंढरपूर येथे जाणाऱ्या बसची काच तुटलेली, तिचे व्हायपर देखील बंद आहे. आणि त्यात बाहेर जोरात पडणारा पाऊस यामुळे समोर रस्त्यावर काही दिसत नसताना वाहनचालक मात्र बिनधास्तपणे गाडी चालवत असल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तत्काळ गाडी थांबवून आम्हला गाडी बदलून देण्याची मागणी प्रवासी करत आहे. मात्र बसचे अधिकारी कर्मचारी काही जीवित हानी बघायची वाट बघत आहेत का? असा सवाल आता विचारला जात आहे..3