टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साहात टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साहात कुही, ता. 21 : जागतिक क्षयरोग दिन निमित्त पंचायत समिती कुही येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी तथा प्रशासक अधिकारी डॉ. स्वप्निल मेश्राम होते, तर उद्घाटक म्हणून ग्रामीण रुग्णालय कुहीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ गेडाम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश चकोले यांची उपस्थिती लाभली. स्तरावर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत क्षयरोग नियंत्रणासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे व उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. राज्यभरातून ३८५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून कुही तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींना (१३ सिल्व्हर, १८ ब्रॉन्झ) गौरविण्यात आले. पुरस्कार स्वरूपात महात्मा गांधी यांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ, साळवा, तितूर व वेलतूर येथील कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. टीबी नोटिफिकेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा यांना गौरविण्यात आले, तर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत वेलतूर केंद्राचा सन्मान झाला. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ. रचना नागदिवे यांना गौरविण्यात आले. तसेच विविध उपकेंद्रे व आरोग्य सेविकांचा त्यांच्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साहात टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साहात कुही, ता. 21 : जागतिक क्षयरोग दिन निमित्त पंचायत समिती कुही येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी तथा प्रशासक अधिकारी डॉ. स्वप्निल मेश्राम होते, तर उद्घाटक म्हणून ग्रामीण रुग्णालय कुहीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ गेडाम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश चकोले यांची उपस्थिती लाभली. स्तरावर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत क्षयरोग नियंत्रणासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे व उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. राज्यभरातून ३८५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून कुही तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींना (१३ सिल्व्हर, १८ ब्रॉन्झ) गौरविण्यात आले. पुरस्कार स्वरूपात महात्मा गांधी यांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ, साळवा, तितूर व वेलतूर येथील कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. टीबी नोटिफिकेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा यांना गौरविण्यात आले, तर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत वेलतूर केंद्राचा सन्मान झाला. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ. रचना नागदिवे यांना गौरविण्यात आले. तसेच विविध उपकेंद्रे व आरोग्य सेविकांचा त्यांच्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
- कृउबा समिती मार्केट मध्ये विक्रमी कापसाची आवक भिवापूर । उमरेड भिवापूर तालुक्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापसा माल मोठया प्रमाणात आणित असल्याने जिकडे - तिकडे भरगच्च कापसाचे ठिग भरून असल्याचे दृष्टिक्षेपणास येत आहे. मार्च अखेर पर्यंत 53,656 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समिती सचिव रामकृष्ण गोगल. यांनी दिली असून याबाबतची त्याची प्रतिक्रिया तसेच मार्केट यार्ड मध्ये दि.5 एप्रिलला 1876 क्विंटल आवक होती. व दर 6300 -8500 रुपये प्राप्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये रविवार, बुधवार ,गुरुवार हे तीन दिवस कापूस खरेदी चे आहे. गेल्या वर्षी क्विंटल मागे 6330 ते 7600 रुपये भाव इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे. खाजगी जिनिंग मध्ये कापसाच्या भावामध्ये तफावत असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समिती कडे आकृष्ट होत असून कापसाचा माल यार्डत आणत असल्याची माहीती कृउबा समितीचे सभापती बालु इंगोले यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- Post by कु सुषमा डबराल1
- जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"1
- मुजफ्फरपुर में नाबालिग गुम/शुदगी से मचा हड़/कंप #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1