नाशिक:येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर *माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये येवला शहराचा राज्य स्तरावर ६ तर विभाग स्तरावर १ ला क्रमांक* *येवला,दि.१७ फेब्रुवारी:-* माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येवला शहराने राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक पटकावला असून येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या या अभियानात हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन उपक्रम, सौरऊर्जेचा वापर, प्लास्टिकमुक्त उपक्रम, नदी-नाले स्वच्छता, वृक्षारोपण व जैवविविधतेचे संवर्धन अशा विविध बाबींवर गुणांकन करण्यात आले. या सर्व घटकांमध्ये येवला शहराने सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी करत विभागीय पातळीवर उल्लेखनीय स्थान मिळविले. येवला शहरात राबविण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्यांचे संगोपन, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची उभारणी,जलसंधारण व स्वच्छता मोहिमा, नागरिकांचा सक्रिय सहभाग व जनजागृती अभियान या सर्व प्रयत्नांमुळे येवला शहर पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. *बक्षीसाच्या रकमेतून ही होणार विकास कामे* सदर बक्षीस रकमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा यासाठी प्राधान्य असणार आहे. यामध्ये १) शहराचे / गावाचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना (जैवविविधतेच्या संवर्धनासह) उदा. मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, सार्वजनिक उद्याने २) जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल (जैवविविधतेच्या संवर्धनासह) ३) रोपवाटिकांची निर्मिती ४) जलसंवर्धनाचे उपक्रम ५) रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन ६) नदी, तळे व नाले यांचे पुनर्जीवीकरण ७) नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उपाय योजना ८) सौरऊर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे ९) विद्युत वाहनांना प्रोत्साहन – चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे १०) माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरणासाठी प्रतिक्रिया “येवला शहराने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी दिलेला सक्रिय प्रतिसाद आणि नगर परिषदेचे नियोजनबद्ध काम यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यातही येवला शहर हरित, स्वच्छ व शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास आहे.” *छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य.* पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. येवला शहराने दाखविलेली एकजूट आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे हे यश मिळाले आहे. ७५ लाख रुपयांच्या बक्षीस रकमेतून आणखी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. *समीर भुजबळ, माजी खासदार* माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये येवला शहराला राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक मिळून ७५ लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले, ही संपूर्ण येवलाकरांसाठी अभिमानाची बाब आहे. नगर परिषद, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले. प्राप्त झालेली बक्षीस रक्कम हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प आणि स्वच्छता उपक्रम यांसाठी प्रभावीपणे वापरण्यात येईल. *राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष, येवला नगरपालिका*
नाशिक:येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर *माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये येवला शहराचा राज्य स्तरावर ६ तर विभाग स्तरावर १ ला क्रमांक* *येवला,दि.१७ फेब्रुवारी:-* माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येवला शहराने राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक पटकावला असून येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या या अभियानात हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन उपक्रम, सौरऊर्जेचा वापर, प्लास्टिकमुक्त उपक्रम, नदी-नाले स्वच्छता, वृक्षारोपण व जैवविविधतेचे संवर्धन अशा विविध बाबींवर गुणांकन करण्यात आले. या सर्व घटकांमध्ये येवला शहराने सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी करत विभागीय पातळीवर उल्लेखनीय स्थान मिळविले. येवला शहरात राबविण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्यांचे संगोपन, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची उभारणी,जलसंधारण व स्वच्छता मोहिमा, नागरिकांचा सक्रिय सहभाग व जनजागृती अभियान या सर्व प्रयत्नांमुळे येवला शहर पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. *बक्षीसाच्या रकमेतून ही होणार विकास कामे* सदर बक्षीस रकमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा यासाठी प्राधान्य असणार आहे. यामध्ये १) शहराचे / गावाचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना (जैवविविधतेच्या संवर्धनासह) उदा. मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, सार्वजनिक उद्याने २) जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल (जैवविविधतेच्या संवर्धनासह) ३) रोपवाटिकांची निर्मिती ४) जलसंवर्धनाचे उपक्रम ५) रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन ६) नदी, तळे व नाले यांचे पुनर्जीवीकरण ७) नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उपाय योजना ८) सौरऊर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे ९) विद्युत वाहनांना प्रोत्साहन – चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे १०) माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरणासाठी प्रतिक्रिया “येवला शहराने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी दिलेला सक्रिय प्रतिसाद आणि नगर परिषदेचे नियोजनबद्ध काम यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यातही येवला शहर हरित, स्वच्छ व शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास आहे.” *छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य.* पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. येवला शहराने दाखविलेली एकजूट आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे हे यश मिळाले आहे. ७५ लाख रुपयांच्या बक्षीस रकमेतून आणखी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. *समीर भुजबळ, माजी खासदार* माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये येवला शहराला राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक मिळून ७५ लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले, ही संपूर्ण येवलाकरांसाठी अभिमानाची बाब आहे. नगर परिषद, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले. प्राप्त झालेली बक्षीस रक्कम हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प आणि स्वच्छता उपक्रम यांसाठी प्रभावीपणे वापरण्यात येईल. *राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष, येवला नगरपालिका*
- Post by VK ONLINE INFORMATION1
- Post by Dilip Patil1
- 💪1
- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.1
- मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोस्तो ये व्हिडिओ ज्यादा से ज्यादा शेअर करे काय काही लोक बाबासाहेबांना शिव्या देतात बाबासाहेबांचे विषयी घाणेरडे शब्द वापरतात काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिले आहे काय बाबासाहेबांनी फक्त दलितांना शोषितांना वंचितांना संविधानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेब प्रत्येक जातीसाठी तेवढेच सन्माननीय आहेत जेवढे वंचितांसाठी शोषितांसाठी आहेत बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना तेवढाच मान सन्मान आणि अधिकार देतो तरीसुद्धा काही बाणगूळ जातीवादी मानसिकतेचे विचारधारेचे काही कुत्रे बाबासाहेबांना शिवी देतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा1
- Post by जय श्री सीताराम2
- किचन में खाना बना रही थी महिला, राष्ट्रगान बजते ही हो गई सावधान1
- बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही1