Shuru
Apke Nagar Ki App…
कर्जत तालुक्यातील युवकाने अँगलला गळफास घेऊन केली आत्महत्या कर्जत तालुक्यातील वालवड येथील २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ८ मार्च रोजी सकाळी कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. सागर ज्ञानदेव काळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहत्या घरातील अँगलला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मिरजगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कर्जत लाईव्ह
कर्जत तालुक्यातील युवकाने अँगलला गळफास घेऊन केली आत्महत्या कर्जत तालुक्यातील वालवड येथील २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ८ मार्च रोजी सकाळी कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. सागर ज्ञानदेव काळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहत्या घरातील अँगलला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मिरजगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by कर्जत लाईव्ह1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- Post by Vijay Meher1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान, काल पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.4
- Post by AapTak Hindi News Channel1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..1
- Post by Vijay Meher1