*सप्तशृंगी–नांदुरी रस्त्यावर एकेरी वाहतूक लागू* *नाशिक, सप्तशृंगी गड ते नांदुरी या रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याचे व्हाइट टॅपिंग तसेच व्हॅली साइड रिटेनिंग वॉलच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सुरक्षितेच्या दृष्टीने 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 पर्यंत नियंत्रित वेळापत्रकानुसार सप्तशृंगी–नांदुरी रस्त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था (Only One Way Traffic) लागू करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कळवण) डॉ. कश्मिरा संखे यांनी दिले आहेत. सदर रस्ता हा डोंगराळ भागातून जात असून, रस्त्याची रुंदी मर्यादित, तीव्र वळणे व उतार-चढाव असल्याने कामाच्या कालावधीत दुहेरी वाहतूक करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व सुरक्षित होण्यासाठी काँक्रिट टाकल्यानंतर आवश्यक क्युअरिंग कालावधी पूर्ण होणे गरजेचे आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवल्यास रस्त्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सण-उत्सवांच्या काळात भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार, नियंत्रित वेळापत्रकानुसार वाहतूक सोडण्यात येणार असून, नांदुरीकडे आणि नांदुरीहून सप्तशृंगीकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेच्या अंतराने सुरू करण्यात येणार असून दरम्यान आवश्यक ‘क्लिअर टाईम’ ठेवण्यात येणार आहे. तथापि, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पोलीस वाहने, दैनंदिन आपत्कालीन सेवा, शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस आदी अत्यावश्यक सेवांना परिस्थितीनुसार तत्काळ मार्ग मोकळा करून देण्यात येणार आहे सप्तशृंगी गड ट्रस्ट, ग्रामपंचायत सप्तशृंगी गड व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने वाहतूक नियंत्रण करावे, तसेच कोणतीही वित्तीय अथवा जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. *असे आहे वेळापत्रक* *सकाळ सत्रात* - *नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - सकाळी 6 ते 6.30, 8 ते 8.30, 10 ते 10.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - सकाळी 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30 *दुपार सत्रात* - *नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - दुपारी 12 ते 12.30, 2 ते 2.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - दुपारी 1 ते 1.30, 3 ते 3.30 *संध्याकाळ सत्रात- नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - 4 ते 4.30, 6 ते 6.30, 8 ते 8.30 व 10 ते 10.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - 5 ते 5.30, 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30 *रात्र सत्रात- नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - रात्री 12 ते 12.30, 2 ते 2.30, 4 ते 4.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - रात्री 1 ते 1.30, 3 ते 3.30, 5 ते 5.30 प्रवास कालावधी हा 30 मिनिटांचा आहे. प्रत्येक सत्रानंतर 30 मिनिटे प्रवास पुर्ण होण्यासाठी क्लिअर टाईम असणार आहे. एका वेळेस फक्त एकाच दिशेने वाहतुक चालु राहील व गाडी पोहचेपर्यंत विरूद्ध दिशेची वाहतुक थांबलेली राहिल असे आदेशात नमूद आहे.
*सप्तशृंगी–नांदुरी रस्त्यावर एकेरी वाहतूक लागू* *नाशिक, सप्तशृंगी गड ते नांदुरी या रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याचे व्हाइट टॅपिंग तसेच व्हॅली साइड रिटेनिंग वॉलच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सुरक्षितेच्या दृष्टीने 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 पर्यंत नियंत्रित वेळापत्रकानुसार सप्तशृंगी–नांदुरी रस्त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था (Only One Way Traffic) लागू करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कळवण) डॉ. कश्मिरा संखे यांनी दिले आहेत. सदर रस्ता हा डोंगराळ भागातून जात असून, रस्त्याची रुंदी मर्यादित, तीव्र वळणे व उतार-चढाव असल्याने कामाच्या कालावधीत दुहेरी वाहतूक करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व सुरक्षित होण्यासाठी काँक्रिट टाकल्यानंतर आवश्यक क्युअरिंग कालावधी पूर्ण होणे गरजेचे आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवल्यास रस्त्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सण-उत्सवांच्या काळात भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार, नियंत्रित वेळापत्रकानुसार वाहतूक सोडण्यात येणार असून, नांदुरीकडे आणि नांदुरीहून सप्तशृंगीकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेच्या अंतराने सुरू करण्यात येणार असून दरम्यान आवश्यक ‘क्लिअर टाईम’ ठेवण्यात येणार आहे. तथापि, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पोलीस वाहने, दैनंदिन आपत्कालीन सेवा, शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस आदी अत्यावश्यक सेवांना परिस्थितीनुसार तत्काळ मार्ग मोकळा करून देण्यात येणार आहे सप्तशृंगी गड ट्रस्ट, ग्रामपंचायत सप्तशृंगी गड व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने वाहतूक नियंत्रण करावे, तसेच कोणतीही वित्तीय अथवा जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. *असे आहे वेळापत्रक* *सकाळ सत्रात* - *नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - सकाळी 6 ते 6.30, 8 ते 8.30, 10 ते 10.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - सकाळी 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30 *दुपार सत्रात* - *नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - दुपारी 12 ते 12.30, 2 ते 2.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - दुपारी 1 ते 1.30, 3 ते 3.30 *संध्याकाळ सत्रात- नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - 4 ते 4.30, 6 ते 6.30, 8 ते 8.30 व 10 ते 10.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - 5 ते 5.30, 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30 *रात्र सत्रात- नांदुरी ते सप्तश्रृंगी गड* - रात्री 12 ते 12.30, 2 ते 2.30, 4 ते 4.30 *सप्तश्रृंगी गड ते नांदुरी* - रात्री 1 ते 1.30, 3 ते 3.30, 5 ते 5.30 प्रवास कालावधी हा 30 मिनिटांचा आहे. प्रत्येक सत्रानंतर 30 मिनिटे प्रवास पुर्ण होण्यासाठी क्लिअर टाईम असणार आहे. एका वेळेस फक्त एकाच दिशेने वाहतुक चालु राहील व गाडी पोहचेपर्यंत विरूद्ध दिशेची वाहतुक थांबलेली राहिल असे आदेशात नमूद आहे.
- Post by Jsr Udhfd1
- सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.1
- राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे1
- Post by महाराष्ट्र सरकार1
- Post by महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार1
- मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।1
- मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -79729787261
- Post by महाराष्ट्र सरकार1