logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अमरावती जिल्ह्याला २.६६ कोटींचा निधी* *शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने उलटले; निधी वितरणास विलंब* आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर अखेर सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पहिल्या गणवेशाची शिल्लक रक्कम आणि दुसऱ्या गणवेशासाठी मिळालेला निधी मिळून एकूण २ कोटी ६६ लाख ४८ हजार ४०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५५७ सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. शासनाकडून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करून देण्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात दुसऱ्या गणवेशाचा निधी उशिरा मिळाल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. *पहिल्या गणवेशासाठीही निधी अपुरा* पहिल्या टप्प्यात शासनाने प्रतिगणवेश २४० रुपये याप्रमाणे २ कोटी ४३ लाख १९ हजार ४४० रुपयांचा निधी मंजूर करून तालुकास्तरावर वितरित केला होता. मात्र, या रकमेतही गणवेश शिवून घेण्यासाठी पालकांना अतिरिक्त खर्च करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच गणवेशात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी दोन गणवेश देणे अपेक्षित आहे. यामध्ये नियमित शालेय गणवेशासह स्काऊट-गाईड गणवेशाचा समावेश आहे. दोन्ही गणवेशांसाठी एकूण ६०० रुपये निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी, बीपीएल कुटुंबातील विद्यार्थी तसेच पात्र ओबीसी व सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, स्वातंत्र्यदिनही उलटून गेल्यानंतर दुसऱ्या गणवेशासाठी निधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. *शाळांना अन्य निधीचीही प्रतीक्षा* दरम्यान, शाळांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेली समग्र शिक्षा अभियानाची निधी तसेच सादील रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील आवश्यक खर्च मुख्याध्यापक व शिक्षकांना स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याचे चित्र आहे. समग्र शिक्षा अभियानाची निधी आणि सादील रक्कम तातडीने शाळांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत आहे. ०००००० *पंचायत समिती निहाय निधी* क्र.| पंचायत समिती| अनुदान (रुपये) १| अचलपूर| २९,०७,३०० २| अमरावती| १५,४८,९०० ३| अंजनगाव सुर्जी| १४,८१,७०० ४| भातकुली| ११,११,२०० ५| चांदूर बाजार| १८,६९,३०० ६| चिखलदरा| २७,८७,६०० ७| चांदूर रेल्वे| ९,७३,२०० ८| दर्यापूर| १६,७८,८०० ९| धारणी| ५४,८५,२०० १०| धामणगाव रेल्वे| ८,४९,९०० ११| मोर्शी| १७,६४,३०० १२| नांदगाव खंडेश्वर| १३,७७,९०० १३|तिवसा| ११,००,१०० १४| वरूड| १७,१३,००० एकूण| | २,६६,४८,४०० दुसऱ्या गणवेशासाठी निधी उशिरा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बराच काळ गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्राप्त निधी तालुकास्तरावर तातडीने वितरित करून विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

57 min ago
user_आयकॉन महाराष्ट्र न्यूज
आयकॉन महाराष्ट्र न्यूज
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
57 min ago
be3e900e-58c1-46c2-abf2-c4caa662e1c6

विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अमरावती जिल्ह्याला २.६६ कोटींचा निधी* *शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने उलटले; निधी वितरणास विलंब* आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर अखेर सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पहिल्या गणवेशाची शिल्लक रक्कम आणि दुसऱ्या गणवेशासाठी मिळालेला निधी मिळून एकूण २ कोटी ६६ लाख ४८ हजार ४०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५५७ सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. शासनाकडून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करून देण्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात दुसऱ्या गणवेशाचा निधी उशिरा मिळाल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. *पहिल्या गणवेशासाठीही निधी अपुरा* पहिल्या टप्प्यात शासनाने प्रतिगणवेश २४० रुपये याप्रमाणे २ कोटी ४३ लाख १९ हजार ४४० रुपयांचा निधी मंजूर करून तालुकास्तरावर वितरित केला होता. मात्र, या रकमेतही गणवेश शिवून घेण्यासाठी पालकांना अतिरिक्त खर्च करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच गणवेशात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी दोन गणवेश देणे अपेक्षित आहे. यामध्ये नियमित शालेय गणवेशासह स्काऊट-गाईड गणवेशाचा समावेश आहे. दोन्ही गणवेशांसाठी एकूण ६०० रुपये निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी, बीपीएल कुटुंबातील विद्यार्थी तसेच पात्र ओबीसी व सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, स्वातंत्र्यदिनही उलटून गेल्यानंतर दुसऱ्या गणवेशासाठी निधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. *शाळांना अन्य निधीचीही प्रतीक्षा* दरम्यान, शाळांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेली समग्र शिक्षा अभियानाची निधी तसेच सादील रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील आवश्यक खर्च मुख्याध्यापक व शिक्षकांना स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याचे चित्र आहे. समग्र शिक्षा अभियानाची निधी आणि सादील रक्कम तातडीने शाळांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत आहे. ०००००० *पंचायत समिती निहाय निधी* क्र.| पंचायत समिती| अनुदान (रुपये) १| अचलपूर| २९,०७,३०० २| अमरावती| १५,४८,९०० ३| अंजनगाव सुर्जी| १४,८१,७०० ४| भातकुली| ११,११,२०० ५| चांदूर बाजार| १८,६९,३०० ६| चिखलदरा| २७,८७,६०० ७| चांदूर रेल्वे| ९,७३,२०० ८| दर्यापूर| १६,७८,८०० ९| धारणी| ५४,८५,२०० १०| धामणगाव रेल्वे| ८,४९,९०० ११| मोर्शी| १७,६४,३०० १२| नांदगाव खंडेश्वर| १३,७७,९०० १३|तिवसा| ११,००,१०० १४| वरूड| १७,१३,००० एकूण| | २,६६,४८,४०० दुसऱ्या गणवेशासाठी निधी उशिरा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बराच काळ गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्राप्त निधी तालुकास्तरावर तातडीने वितरित करून विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”
    4
    आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त;  विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई
खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली.
ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती.
दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले.
येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत.
याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,
    1
    वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर ,घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला ,अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश खवड्या डोंगरावरील घटनेनंतर पुन्हा मोठी घटना टळली घरी वाद झाले असल्याने रागामध्ये तरुण टावर वर चढला असल्याची माहिती तरुणाची आई सोबत भांडण झाले होते आणि नशेमध्ये तो टावर वर चढला कारण शिवाजी माळी असे तरुणाचे नाव
    2
    छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर ,घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला ,अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश 

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर 
घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला 
अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश 
खवड्या डोंगरावरील घटनेनंतर पुन्हा मोठी घटना टळली 
घरी वाद झाले असल्याने रागामध्ये तरुण टावर वर चढला असल्याची माहिती
तरुणाची आई सोबत भांडण झाले होते आणि नशेमध्ये तो टावर वर चढला
कारण शिवाजी माळी असे तरुणाचे नाव
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    19 hrs ago
  • मोबाईल टॉवरवर चढलेल्या मुलाची अग्निशमन जवानांनी केली सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद : सावंगी येथील महाकाली मंदिर परिसरात मोबाईल टॉवरवर एक मुलगा चढल्याची माहिती मिळताच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मुलाची समजूत काढत त्याला सावधपणे टॉवरवरून खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जवान राजू ताठे, रामेश्वर बमणे, सय्यद अझर यांनी बचावकार्य केले. चालक समीर शेख व वैभव विसपुते यांनी सहकार्य केले.
    1
    मोबाईल टॉवरवर चढलेल्या मुलाची अग्निशमन जवानांनी केली सुखरूप सुटका
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद  : सावंगी येथील महाकाली मंदिर परिसरात मोबाईल टॉवरवर एक मुलगा चढल्याची माहिती मिळताच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मुलाची समजूत काढत त्याला सावधपणे टॉवरवरून खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जवान राजू ताठे, रामेश्वर बमणे, सय्यद अझर यांनी बचावकार्य केले. चालक समीर शेख व वैभव विसपुते यांनी सहकार्य केले.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    1
    ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट प्रेमाचा सण. याच सणाचे औचित्य साधून वैजापूरमधील विद्यार्थ्यांनी देशासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या सीमेवरील जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुक्ताई प्राथमिक विद्यालय आणि कैलास पाटील विद्यालयातील चिमुकल्यांनी स्वहस्ते राख्या बनवून जवानांना पाठवल्या आहेत. पाहूया या विशेष उपक्रमाचा हा सविस्तर वृत्तांत..."
    1
    जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट प्रेमाचा सण. याच सणाचे औचित्य साधून वैजापूरमधील विद्यार्थ्यांनी देशासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या सीमेवरील जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुक्ताई प्राथमिक विद्यालय आणि कैलास पाटील विद्यालयातील चिमुकल्यांनी स्वहस्ते राख्या बनवून जवानांना पाठवल्या आहेत. पाहूया या विशेष उपक्रमाचा हा सविस्तर वृत्तांत..."
    user_RBM News Maharashtra
    RBM News Maharashtra
    पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
    1
    खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील नागेवाडी परिसरात महिलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान ३० वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले. नितीन पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने नागेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या..

धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा..


महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या..
धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा..
आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील नागेवाडी परिसरात महिलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान ३० वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले. नितीन पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने नागेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.