पोलीस कुटुंबातील मुलगा बनला डॉक्टर – मिलिंद उईके यांचे यश, कुटुंबाचा अभिमान पोलीस कुटुंबातील मुलगा बनला डॉक्टर – मिलिंद उईके यांचे यश, कुटुंबाचा अभिमान नागपूर : पोलीस खात्यात कार्यरत असलेले भाऊतुल्य मित्र श्री प्रकाशराव उईके यांच्या चिरंजीव मिलिंद प्रकाशराव उईके यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (Medical) नुकतीच एमबीबीएस पदवी संपादन करून आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशस्वी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उईके कुटुंब उपस्थित होते. मुलाला डॉक्टर म्हणून प्रमाणित करण्यात आलेला हा क्षण अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद ठरला. पोलीस सेवेत कार्यरत असल्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नाही, तरीही या कठीण परिस्थितीत सौ. वैशाली उईके यांनी अथक परिश्रम घेऊन मुलाला वैद्यकीय अधिकारी बनवण्यात मोठा सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या त्याग आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे (नागपूर शहर), स्वयंसेवक व रुग्णदूत, तसेच केंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्लीचे नागपूर शहर प्रसिद्धीप्रमुख यांनी डॉक्टर मिलिंद उईके यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच सामाजिक कार्यकर्ते विकासजी मिश्रा, अमितजी यादव, रुग्णसेवक प्रवीणजी शर्मा व सचिनजी शर्मा यांनीही मिलिंद यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, तरी सर्व शुभेच्छुकांनी मनापासून शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
पोलीस कुटुंबातील मुलगा बनला डॉक्टर – मिलिंद उईके यांचे यश, कुटुंबाचा अभिमान पोलीस कुटुंबातील मुलगा बनला डॉक्टर – मिलिंद उईके यांचे यश, कुटुंबाचा अभिमान नागपूर : पोलीस खात्यात कार्यरत असलेले भाऊतुल्य मित्र श्री प्रकाशराव उईके यांच्या चिरंजीव मिलिंद प्रकाशराव उईके यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (Medical) नुकतीच एमबीबीएस पदवी संपादन करून आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशस्वी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उईके कुटुंब उपस्थित होते. मुलाला डॉक्टर म्हणून प्रमाणित करण्यात आलेला हा क्षण अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद ठरला. पोलीस सेवेत कार्यरत असल्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नाही, तरीही या कठीण परिस्थितीत सौ. वैशाली उईके यांनी अथक परिश्रम घेऊन मुलाला वैद्यकीय अधिकारी बनवण्यात मोठा सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या त्याग आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे (नागपूर शहर), स्वयंसेवक व रुग्णदूत, तसेच केंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्लीचे नागपूर शहर प्रसिद्धीप्रमुख यांनी डॉक्टर मिलिंद उईके यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच सामाजिक कार्यकर्ते विकासजी मिश्रा, अमितजी यादव, रुग्णसेवक प्रवीणजी शर्मा व सचिनजी शर्मा यांनीही मिलिंद यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, तरी सर्व शुभेच्छुकांनी मनापासून शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1