जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर दुधगांवकर यांची निवड सर्वधर्मीय फुले–शाहू–आंबेडकर जयंती महोत्सवासाठी सर्वानुमते निर्णय परभणी (प्रतिनिधी):- सर्वधर्मीय नागरिकांच्या सामूहिक समन्वयातून मागील अठरा वर्षांपासून परभणीत सर्वधर्मीय फुले–शाहू–आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर गणेशराव दुधगांवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येथील सावली विश्रामगृहात रविवारी (दि. २९) ज्येष्ठ साहित्यिक दि. फ. लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत महोत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. सुनिल जाधव आणि प्रा. डॉ. सुरेश हिवराळे, तर मुख्य समन्वयकपदी अनिताताई सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष, सचिव, संघटक, संयोजक, युवा समन्वयक आणि मुख्य निमंत्रक पदांसाठी विविध मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महोत्सवाच्या नियोजनाला वेग आला आहे. दरम्यान, महोत्सव समितीचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी यंदाच्या महोत्सवातील विविध उपक्रमांची घोषणा केली. यामध्ये पाच हजार वृक्षारोपण, अठरा तास अभ्यास अभियान, आदर्श भीमजयंती पुरस्कार, सम्यक जीवन गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय विचार उत्सव, त्रैभाषिक कवी संमेलन, आंबेडकरी जलसा, परिसंवाद, विचार प्रवर्तक देखावा तसेच विविध राज्यस्तरीय स्पर्धांचा समावेश आहे. बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश हिवाळे, भूमिका डॉ. सुनिल जाधव, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी केले. यंदाचा महोत्सव सामाजिक सलोखा, विचारप्रबोधन आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर दुधगांवकर यांची निवड सर्वधर्मीय फुले–शाहू–आंबेडकर जयंती महोत्सवासाठी सर्वानुमते निर्णय परभणी (प्रतिनिधी):- सर्वधर्मीय नागरिकांच्या सामूहिक समन्वयातून मागील अठरा वर्षांपासून परभणीत सर्वधर्मीय फुले–शाहू–आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर गणेशराव दुधगांवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येथील सावली विश्रामगृहात रविवारी (दि. २९) ज्येष्ठ साहित्यिक दि. फ. लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत महोत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. सुनिल जाधव आणि प्रा. डॉ. सुरेश हिवराळे, तर मुख्य समन्वयकपदी अनिताताई सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष, सचिव, संघटक, संयोजक, युवा समन्वयक आणि मुख्य निमंत्रक पदांसाठी विविध मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महोत्सवाच्या नियोजनाला वेग आला आहे. दरम्यान, महोत्सव समितीचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी यंदाच्या महोत्सवातील विविध उपक्रमांची घोषणा केली. यामध्ये पाच हजार वृक्षारोपण, अठरा तास अभ्यास अभियान, आदर्श भीमजयंती पुरस्कार, सम्यक जीवन गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय विचार उत्सव, त्रैभाषिक कवी संमेलन, आंबेडकरी जलसा, परिसंवाद, विचार प्रवर्तक देखावा तसेच विविध राज्यस्तरीय स्पर्धांचा समावेश आहे. बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश हिवाळे, भूमिका डॉ. सुनिल जाधव, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी केले. यंदाचा महोत्सव सामाजिक सलोखा, विचारप्रबोधन आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- Post by AapTak Hindi News Channel1
- जालन्यात अनेक हाॕटेलचा गॅस संपला; चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक सुरू व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; हॉटेल व खानावळ चालक अडचणीत, ग्राहकांच्या नाराजीचा करावा लागतोय सामना1