Shuru
Apke Nagar Ki App…
सदन में घुसते ही पानी पानी हुए मोदी
किरण आरके ( पत्रकार )
सदन में घुसते ही पानी पानी हुए मोदी
More news from Nashik and nearby areas
- *चांदवड नगरपरिषद प्रभाग ३ ची रणधुमाळी:* *अपक्ष उमेदवार अनुक्रमाक 5 सोनवणे प्रसाद अनिल यांच्या बाजूने जनमताचा कौल!* अँकर : संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ ची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर प्रलंबित असलेल्या या जागेसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार असून, २१ तारखेला तातडीने मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सोनवणे प्रसाद अनिल यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, त्यांच्या समर्थनात जनसागराचा ओघ वाढताना दिसत आहे. नगरपरिषदेच्या इतर सर्व प्रभागांचे मतदान २ डिसेंबर रोजीच पार पडले होते. मात्र, कायदेशीर बाबींमुळे प्रभाग ३ ची निवडणूक लांबणीवर पडली होती. आता कोर्टाचा हिरवा कंदील मिळाल्याने प्रशासनाने २० तारखेला मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. एकाच जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. *पक्षभेद विसरून गोटु सोनवणे यांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा* प्रसाद अनिल सोनवणे यांच्या उमेदवारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मिळत असलेला सर्वपक्षीय पाठिंबा. कोणत्याही एका चौकटीत न अडकता, प्रभागातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आज सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. "सामान्य जनतेचा हक्काचा माणूस" ही त्यांची प्रतिमा विरोधकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. प्रचारादरम्यान गोटू सोनवणे यांनी मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे. त्यांनी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला आहे...... *मूलभूत सोयी:* प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि आधुनिक पथदीपांची (Street Lights) व्यवस्था करणे. *पाणीप्रश्न* : पिण्याच्या पाण्याची अनियमितता दूर करून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवणे. *घरकुल योजना:* गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मदत कक्ष सुरू करण्याचे आश्वासन. "गोटू सोनवणे हे केवळ उमेदवार नसून आमच्या प्रभागातील एक विश्वासू मित्र आहेत. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावेळी प्रभाग ३ मध्ये परिवर्तन निश्चित आहे." असे प्रभागातील सजग मतदार मतदारांना आवाहन करतांना सांगत आहे जनतेच्या मनातील उमेदवार सध्या प्रभागात फिरताना "एकच ध्यास, गोटू सोनवणे यांचा विजय" असा सूर सर्वसामान्य मतदारांमध्ये उमटताना दिसत आहे. त्यांच्या साध्या राहणी मानामुळे आणि सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी जनमानसात आपली जागा निर्माण केली आहे. २० तारखेच्या मतदानात हे जनमत पेटीत कसे बंद होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.1
- 2500 आनुदानाने घरामध्ये वीज सोलार लावा आणि वीज बचत करा मुख्यमंत्री अनुदान योजना1
- पुणे गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच आहे का याची अंमलबजावणी कधी होणार1
- २६ तासांच्या प्रयत्नानंतर चिमुकलीचा मृतदेह सापडला; #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #shortsvideos1
- संतप्त शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आश्वासनानंतर आंदोलन स्थगित1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील चास आश्रम शाळा मधील रात्री झोपत असताना एका मुलाची रॅकिंग1
- इंजिन बिघाडीमुळे आदिलाबाद परळी पॅसेंजर खोळंबली थंडीच्या कडाक्यात प्रवाशांची मोठी गैरसोय1
- प्रेम विवाह करणाऱ्या उपेंद्रला झाडाला बांधून मारले2