खामगाव नगर परिषदेने वाढीव मालमत्ता कर रद्द करावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे निवेदन l खामगाव : खामगाव नगर परिषदेने वाढविलेला मालमत्ता कर रद्द करावा या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी १७ फेब्रुवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. सदर निवेदनात नमूद आहे की महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०५ यातील मुद्दा क्रमांक ४ च्या नुसार कोणत्याही परिस्थितीत मागील कराच्या ४० टक्के पेक्षा जास्त कारवार करता येत नाही. असे असताना खामगाव नगर परिषदेने शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करत प्रचंड वाढ केली आहे तसेच शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसताना सुद्धा पाणीपट्टी कर हा १२०० रुपयावरून १८०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ अन्याकारक असून नागरिकांच्या मनात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.वास्तविक पाहता नगरपालिका प्रशासनाकडून मूलभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे.शहरातील अनेक स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे, अनेक चौकामध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढिग पडलेले दिसतात. एकीकडे मूलभूत सुविधेचा अभाव असताना प्रचंड प्रमाणात हुकूमशाही पद्धतीने मालमत्ता कर वाढवून नागरिकांवर अन्याय करण्यात आला. हा अन्याय राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहन करणार नाही. पंधरा दिवसाच्या आत सदर प्रकरणात योग्य ती दखल न घेतल्यास नगरपरिषद परिसरामध्ये वाढीव कराच्या नोटीससेची होळी करण्यात येईल व गांधीगिरीच्या मार्गाने अनेक प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी दिला आहे. सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, प्रदेश संघटक सदाशिव क्षीरसागर, युवा जिल्हाध्यक्ष सुरज बेलोकार, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तहसीन शहा, जयेभ भिसे, दीपक महाजन, अभय अकोटकर, अमित फुलारे, महादेव अंबुसकार, शेख हुसेन, शेख शब्बीर, शेख रहीम,गजानन जयस्वाल, जी.टी. चौकसे,भीमा बावस्कर,शेर खान, शेख मुस्ताक, विष्णू भारसाकडे, अंकुश गवई, मेजर सुभाष फेरंग यांच्या सह्या आहेत. न. प. नगराध्यक्षा यांनी नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा - खामगाव नगर परिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढ केली आहे प्रशासनाची एक हाती सत्ता आहे. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष म्हणून योग्य ठराव घेऊन अन्यायकारी मालमत्ता कर रद्द करू शकतात. जळगाव जामोद येथे आमदार डॉ. संजय कुटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मालमत्ता कर रद्द करून घेतला आहे. खामगाव नगरपालिकेत योग्य ठराव घेऊन वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे नगराध्यक्षा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.l
खामगाव नगर परिषदेने वाढीव मालमत्ता कर रद्द करावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे निवेदन l खामगाव : खामगाव नगर परिषदेने वाढविलेला मालमत्ता कर रद्द करावा या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी १७ फेब्रुवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. सदर निवेदनात नमूद आहे की महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०५ यातील मुद्दा क्रमांक ४ च्या नुसार कोणत्याही परिस्थितीत मागील कराच्या ४० टक्के पेक्षा जास्त कारवार करता येत नाही. असे असताना खामगाव नगर परिषदेने शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करत प्रचंड वाढ केली आहे तसेच शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसताना सुद्धा पाणीपट्टी कर हा १२०० रुपयावरून १८०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ अन्याकारक असून नागरिकांच्या मनात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.वास्तविक पाहता नगरपालिका प्रशासनाकडून मूलभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे.शहरातील अनेक स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे, अनेक चौकामध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढिग पडलेले दिसतात. एकीकडे मूलभूत सुविधेचा अभाव असताना प्रचंड प्रमाणात हुकूमशाही पद्धतीने मालमत्ता कर वाढवून नागरिकांवर अन्याय करण्यात आला. हा अन्याय राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहन करणार नाही. पंधरा दिवसाच्या आत सदर प्रकरणात योग्य ती दखल न घेतल्यास नगरपरिषद परिसरामध्ये वाढीव कराच्या नोटीससेची होळी करण्यात येईल व गांधीगिरीच्या मार्गाने अनेक प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी दिला आहे. सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, प्रदेश संघटक सदाशिव क्षीरसागर, युवा जिल्हाध्यक्ष सुरज बेलोकार, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तहसीन शहा, जयेभ भिसे, दीपक महाजन, अभय अकोटकर, अमित फुलारे, महादेव अंबुसकार, शेख हुसेन, शेख शब्बीर, शेख रहीम,गजानन जयस्वाल, जी.टी. चौकसे,भीमा बावस्कर,शेर खान, शेख मुस्ताक, विष्णू भारसाकडे, अंकुश गवई, मेजर सुभाष फेरंग यांच्या सह्या आहेत. न. प. नगराध्यक्षा यांनी नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा - खामगाव नगर परिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढ केली आहे प्रशासनाची एक हाती सत्ता आहे. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष म्हणून योग्य ठराव घेऊन अन्यायकारी मालमत्ता कर रद्द करू शकतात. जळगाव जामोद येथे आमदार डॉ. संजय कुटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मालमत्ता कर रद्द करून घेतला आहे. खामगाव नगरपालिकेत योग्य ठराव घेऊन वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे नगराध्यक्षा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.l
- खामगाव : शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या मुख्य भागातून आणि मिरवणूक मार्गावरून 'रूट मार्च' काढण्यात आला. मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गाची पायी चालत पाहणी केली. मार्गावरील संवेदनशील ठिकाणे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अफवांना थारा मिळू नये, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.4
- 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice1
- चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*1
- Post by Raghunath Aghao1
- शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान1
- खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. मात्र, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. काल रात्री च्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दुर्दैवी घटनेत घरातील एका मुलीला दुखापत झाली आहे. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला.ही घटना घडल्यानंतर शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यास सुरुवात केली. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या किंवा धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांची गर्दी जमा झाली होती. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी दोन्ही समुदायातील प्रमुख व्यक्तींची तातडीची बैठक घेतली. "ही घटना दोन समाजातील नसून वैयक्तिक वादाचा परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना समज दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी जनतेला खालील बाबींचे आवाहन केले आहे: अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते फॉरवर्ड करू नका. उद्या शिवजयंतीचा मोठा सण आहे. हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, अफवा पसरवणाऱ्या आयडीवर सायबर सेलचे बारीक लक्ष असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये.3