उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या १६ अनधिकृत नळ कनेक्शनवरून ग्रामस्थ आक्रमक बिल नाही, डिपॉझिट नाही, नमुना 8 वर नोंद नाही; ग्रामसेवकांना १० दिवसांची नोटीस बजावून खुलासा मागितला कोल्हापूर (करवीर) : * उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुष्पणील अपार्टमेंट येथील १६ अनधिकृत पाणी कनेक्शनचा प्रकार समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या १६ कनेक्शनबाबत डिपॉझिट, पाणी बिल, पावती किंवा नमुना ७ वर कोणतीही नोंद नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जागेवर १६ पीव्हीसी पाइप झाडीत लपविलेल्या अवस्थेत आढळून आल्याचेही निवेदनात नमूद आहे. सामाजिक कार्यकर्ते एस. राजू माने (उजळाईवाडी) यांनी ग्रामस्थांसह ग्रामविकास अधिकारी महेश खाडे आणि उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडे या प्रकरणी **‘नोटीस बजावून खुलासा पत्र’** देण्याची मागणी केली आहे. या पत्रात १६ नळ कनेक्शन नेमक्या कोणाच्या आदेशाने देण्यात आली, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सहमती होती का, तसेच संबंधित नोंदी व आर्थिक व्यवहार कुठे आहेत, याबाबत खुलासा मागण्यात आला आहे. निवेदनानुसार, या कनेक्शनसाठी पाणी डिपॉझिट भरले आहे का, मासिक पाणी बिल आकारण्यात आले आहे का आणि बिल रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच नमुना ७ वर केवळ घरपट्टीची रक्कम दाखवण्यात आली असून पाणीपट्टीचा आकार कुठे आहे, असा सवालही करण्यात आला आहे. याशिवाय, प्रत्यक्ष पाहणीवेळी १६ पीव्हीसी पाइप झाडीत लपविलेल्या अवस्थेत आढळले असून त्यांना मीटर बसवलेले नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या कनेक्शनसाठी ठराव, ग्रामपंचायत सदस्यांची सहमतीपत्रे आणि संबंधित आदेशाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. **‘हा प्रकार भ्रष्टाचाराचा असून ग्रामपंचायतीचा महसूल बुडवला जात आहे,’** असा आरोप एस. राजू माने यांनी केला आहे. संबंधित प्रकरणात पुरावा म्हणून नमुना ७ आणि प्रत्यक्ष पाहणीचे फोटो जोडल्याचेही निवेदनात नमूद आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला **१० दिवसांची मुदत** देत खुलासा मागितला आहे. या मुदतीत लेखी खुलासा न दिल्यास गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व लोकायुक्त यांच्याकडे फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाकडून अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीअंती या १६ पाणी कनेक्शनची अधिकृतता, नोंदी आणि महसूल व्यवहाराबाबत नेमके तथ्य स्पष्ट होणार आहे.
उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या १६ अनधिकृत नळ कनेक्शनवरून ग्रामस्थ आक्रमक बिल नाही, डिपॉझिट नाही, नमुना 8 वर नोंद नाही; ग्रामसेवकांना १० दिवसांची नोटीस बजावून खुलासा मागितला कोल्हापूर (करवीर) : * उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुष्पणील अपार्टमेंट येथील १६ अनधिकृत पाणी कनेक्शनचा प्रकार समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या १६ कनेक्शनबाबत डिपॉझिट, पाणी बिल, पावती किंवा नमुना ७ वर कोणतीही नोंद नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जागेवर १६ पीव्हीसी पाइप झाडीत लपविलेल्या अवस्थेत आढळून आल्याचेही निवेदनात नमूद आहे. सामाजिक कार्यकर्ते एस. राजू माने (उजळाईवाडी) यांनी ग्रामस्थांसह ग्रामविकास अधिकारी महेश खाडे आणि उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडे या प्रकरणी **‘नोटीस बजावून खुलासा पत्र’** देण्याची मागणी केली आहे. या पत्रात १६ नळ कनेक्शन नेमक्या कोणाच्या आदेशाने देण्यात आली, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सहमती होती का, तसेच संबंधित नोंदी व आर्थिक व्यवहार कुठे आहेत, याबाबत खुलासा मागण्यात आला आहे. निवेदनानुसार, या कनेक्शनसाठी पाणी डिपॉझिट भरले आहे का, मासिक पाणी बिल आकारण्यात आले आहे का आणि बिल रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले
आहेत. तसेच नमुना ७ वर केवळ घरपट्टीची रक्कम दाखवण्यात आली असून पाणीपट्टीचा आकार कुठे आहे, असा सवालही करण्यात आला आहे. याशिवाय, प्रत्यक्ष पाहणीवेळी १६ पीव्हीसी पाइप झाडीत लपविलेल्या अवस्थेत आढळले असून त्यांना मीटर बसवलेले नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या कनेक्शनसाठी ठराव, ग्रामपंचायत सदस्यांची सहमतीपत्रे आणि संबंधित आदेशाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. **‘हा प्रकार भ्रष्टाचाराचा असून ग्रामपंचायतीचा महसूल बुडवला जात आहे,’** असा आरोप एस. राजू माने यांनी केला आहे. संबंधित प्रकरणात पुरावा म्हणून नमुना ७ आणि प्रत्यक्ष पाहणीचे फोटो जोडल्याचेही निवेदनात नमूद आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला **१० दिवसांची मुदत** देत खुलासा मागितला आहे. या मुदतीत लेखी खुलासा न दिल्यास गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व लोकायुक्त यांच्याकडे फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाकडून अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीअंती या १६ पाणी कनेक्शनची अधिकृतता, नोंदी आणि महसूल व्यवहाराबाबत नेमके तथ्य स्पष्ट होणार आहे.
- रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी # **कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे. मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे. राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे. यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.1
- अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .4
- हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमनद्या वितळल्याने तयार झालेले काही हिमनदीय तलाव नैसर्गिक माती-बर्फ-दगडांच्या बांधांनी अडवलेले असतात. हा बांध तुटला की प्रचंड वेगाने पाणी, चिखल, दगड आणि बर्फाचा लोंढा दरीत खाली धावतो. यालाच म्हणतात GLOF - Glacial Lake Outburst Flood. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगाने वितळत असताना हिमालयातील अशा तलावांचा धोका का वाढतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला GLOF बद्दल आधी माहिती होती का? कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर शेअर करा. GLOF | Glacial Lake Outburst Flood | GLOF meaning | GLOF explained in Marathi | Glacial Lake | Himalayan Glaciers | Himalayan Flood | हिमालयातील पूर | हिमनदी | हिमनदी वितळणे | ग्लेशियल लेक | ग्लोबल वॉर्मिंग | Climate Change | हिमालयातील संकट |1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; ३० हून अधिक मंडळांचा सहभाग, सामाजिक सलोख्याचा संदेश1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.4
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1