पालघर जिल्ह्यात भूमिपुत्र एल्गार संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत एक अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या १४ जून रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी कोणतेही बॅनर, पोस्टर, पुष्पगुच्छ अथवा शाल-श्रीफळ स्वीकारण्यास नकार दिला. त्याऐवजी, कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुका, विभाग आणि गावांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करावा असे आवाहन पवार यांनी केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, १५ ते २० जून या कालावधीत भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू आणि पालघर तालुक्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून, प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा संदेश यातून देण्यात आला. या उपक्रमात संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस स्वप्निल वाघ, सरचिटणीस नवनाथ भोये, पालघर जिल्हा उपाध्यक्ष विजय राऊत, विकास जोडी, जिल्हा सरचिटणीस रेखा धांगडे, पालघर जिल्हा नारीशक्ती प्रमुख प्रमिला तरसे, सरिता जाधव, मिलिंद थुले, दिलीप भानुशाली, चित्रा पवार व करुणा मुकणे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच, वाडा तालुक्यात अमित तरे, पालघर तालुक्यात युवाशक्ती प्रमुख नयन धांगडे, विकी घरत, साक्षात मांजरेकर, हर्षल गावड, सुजल धांगडे, सोनू वर्मा आणि शेवंती घरत यांनी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. मोखाडा तालुक्यात रामा होला, अंकुश होला, गणेश माळी आणि विजय नडगे यांनी हा शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम यशस्वीपणे राबवला, तर डहाणू तालुक्यात मनोज पारधी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर आणि अतुल जाधव यांनी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपली. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक व विधायक पद्धत इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून आणि शिक्षणाला हातभार लावत प्रमोद पवार यांना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या.
पालघर जिल्ह्यात भूमिपुत्र एल्गार संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत एक अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या १४ जून रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी कोणतेही बॅनर, पोस्टर, पुष्पगुच्छ अथवा शाल-श्रीफळ स्वीकारण्यास नकार दिला. त्याऐवजी, कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुका, विभाग आणि गावांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करावा असे आवाहन पवार यांनी केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, १५ ते २० जून या कालावधीत भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू आणि पालघर तालुक्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून, प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा संदेश यातून देण्यात आला. या उपक्रमात संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस स्वप्निल वाघ, सरचिटणीस नवनाथ भोये, पालघर जिल्हा उपाध्यक्ष विजय राऊत, विकास जोडी, जिल्हा सरचिटणीस रेखा धांगडे, पालघर जिल्हा नारीशक्ती प्रमुख प्रमिला तरसे, सरिता जाधव, मिलिंद थुले, दिलीप भानुशाली, चित्रा पवार व करुणा मुकणे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच, वाडा तालुक्यात अमित तरे, पालघर तालुक्यात युवाशक्ती प्रमुख नयन धांगडे, विकी घरत, साक्षात मांजरेकर, हर्षल गावड, सुजल धांगडे, सोनू वर्मा आणि शेवंती घरत यांनी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. मोखाडा तालुक्यात रामा होला, अंकुश होला, गणेश माळी आणि विजय नडगे यांनी हा शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम यशस्वीपणे राबवला, तर डहाणू तालुक्यात मनोज पारधी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर आणि अतुल जाधव यांनी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपली. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक व विधायक पद्धत इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून आणि शिक्षणाला हातभार लावत प्रमोद पवार यांना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या.
- Post by M Veer1
- नगरसेवकांकडून काम न केल्याच्या आरोपांवर रेहन पीतलवाला यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे. ही बातमी इस्लामउद्दीन खान यांनी रात्री ९ वाजता प्रसारित केली.1
- शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन प्रभावशाली आणि शक्तिशाली फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करत नाही, तर याउलट गरीब, छोटे आणि दिव्यांग फेरीवालेच या कारवाईचे लक्ष्य ठरवले जात आहेत. या कथित पक्षपातीपणामुळे कारवाईची निष्पक्षता आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की, जर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जात असेल, तर ती कोणत्याही भेदभावाशिवाय, सर्व नागरिकांना समान रीतीने लागू केली जावी. प्रशासनाकडून ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, नियमांचे पालन सर्वांसाठी एकसारखे असावे आणि कोणत्याही व्यक्तीसोबत पक्षपात किंवा भेदभाव केला जाऊ नये, जेणेकरून सर्वांना समान न्याय मिळेल.1
- दिवा जंक्शनहून रत्नागिरीकडे संध्याकाळी ५:५० वाजता सुटणाऱ्या रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली जात नाही, ही अत्यंत मोठी हलगर्जी आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या काही लोकांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की, या गाडीत प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी खूप अडचणी येतात. चालू तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही, तर तिकीट नसलेले प्रवासी लवकर पोहोचून पूर्ण सीटवर ताबा मिळवतात. यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे, रेल्वे विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि ‘जो ज्या वेळी येईल, त्याला रिकाम्या सीटवर बसावे’ अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.1
- नगरसेवक आणि सामान्य जनतेमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद पाणी कनेक्शन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.1
- hot aunty romance uuhgdkhcgfxjxihxjcxhczojxjnfyibgghgg1
- महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी मारुती मंदिर परिसरात शनिवारी एक दुःखद घटना घडली. मंदिरासमोर असलेला सभा मंडप अचानक कोसळला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेवेळी मंडपाखाली सुमारे 30 ते 40 भाविक दबले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना आर.पी. रुग्णालय आणि परिसरातील इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मंडप कोसळल्याने कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी केली जात आहे.1