येत्या २५ जूनपासून राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान'मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. हे आवाहन त्यांनी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस सुमारे १६० मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. बैठकीत महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरासंदर्भात तक्रारी आणि सूचना मांडल्या. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्री ॲड. शेलार यांनी संबंधित यंत्रणांना प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले. नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान'अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक स्तरांवर व्यापक जनजागृती केली जाणार आहे. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन जनजागृतीस हातभार लावावा, असे आवाहन सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा केले.
येत्या २५ जूनपासून राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान'मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. हे आवाहन त्यांनी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस सुमारे १६० मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. बैठकीत महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरासंदर्भात तक्रारी आणि सूचना मांडल्या. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्री ॲड. शेलार यांनी संबंधित यंत्रणांना प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले. नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान'अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक स्तरांवर व्यापक जनजागृती केली जाणार आहे. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन जनजागृतीस हातभार लावावा, असे आवाहन सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा केले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, मराठा समाजाला न्याय देणे हीच त्यांच्या सरकारची भूमिका राहिली आहे. पत्रकारांच्या समोरच अंतरवाली सराटी येथे मंत्री विखे पाटील आणि आमदार लाड यांनीही हेच विधान वाचून दाखवले.1
- Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन1
- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियान' या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.1
- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे माती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर सात जणांनी एकत्र येत एका कुटुंबावर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या रक्तरंजित मारहाणीमध्ये महिलेसह कुटुंबातील सदस्यांवर काठीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सात जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कलम लावण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.1
- गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.1
- सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीतील विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे मान्य असल्याचे म्हटले. सरनाईक यांनी नमूद केले की, नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते सर्वजण रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहत होते, परंतु महायुतीचा धर्म पाळण्यासाठी काही वेळा मागे-पुढे करावे लागते. याशिवाय, आगामी विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या जागांच्या मागणीवर बोलताना सरनाईक म्हणाले की, राजकारणात देवाणघेवाण आणि राजकीय समीकरणे बदलत असतात. महायुतीमध्ये आपल्या हक्काच्या जागा मागणे ही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या आग्रही मागणीनुसार, मागील वेळेस लढवलेल्या पाच जागा कायम राहाव्यात आणि अतिरिक्त दोन जागा मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. जरी आता समीकरणे बदलली असली तरी, भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी, सरनाईक यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांनी संवेदनशील विषयांवर बोलताना तोंडाला कुलूप लावणे गरजेचे आहे, असे सरनाईक म्हणाले. प्रसाद लाड यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पक्षात कोणतीही नाराजी नसून, महायुतीचे ऐक्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच, जागावाटपावरून भविष्यात शिवसेनेला योग्य वाटा मिळेल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.4
- बारामती शहर आणि परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या कारवाई अंतर्गत अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकण्यात आले, ज्यामुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा दणका बसला आहे.1
- जेजुरी येथील एका टोल नाक्यावर रील स्टार महेश मोटे यांनी टोल भरण्यास नकार देत गोंधळ घातला. 'मी रील स्टार आहे, मी टोल देणार नाही,' असे म्हणत मोटे यांनी टोलनाक्यावर राडा केला होता. या घटनेनंतर, पुण्याच्या रील स्टार अमृता कुलकर्णी यांनी महेश मोटे यांच्या या कृतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. टोल भरण्यावरून महेश मोटे यांनी घातलेल्या या राड्यानंतर इतर अनेक रील स्टार्सनीही त्यांच्यावर टीका केली आहे.1