पी. एम. श्री शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ (मुंबई बाजार) येथे प्राथमिक शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचलनालय पुणे रमाकांत काठमोडे यांची सदिच्छा भेट शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील पी. एम. श्री शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ (मुंबई बाजार) येथे प्राथमिक शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचलनालय पुणे रमाकांत काठमोडे यांनी सदिच्छा भेट देत शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांकडून संगणक लॅबचा प्रभावी वापर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. भेटीदरम्यान काठमोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना विविध प्रश्न विचारले. तसेच ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमाची अंमलबजावणी, शाळेतील भौतिक सुविधा आणि शालेय पोषण आहार याबाबत सविस्तर माहिती घेतली. शिक्षकांना मार्गदर्शन करत त्यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. यावेळी शिरूरचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती नितेश गादिया, शिक्षण समिती सदस्य सागर नरवडे, माजी गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, प्रशासन अधिकारी किसन खोडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेतील शैक्षणिक उपक्रम, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत काठमोडे यांनी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले.
पी. एम. श्री शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ (मुंबई बाजार) येथे प्राथमिक शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचलनालय पुणे रमाकांत काठमोडे यांची सदिच्छा भेट शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील पी. एम. श्री शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ (मुंबई बाजार) येथे प्राथमिक शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचलनालय पुणे रमाकांत काठमोडे यांनी सदिच्छा भेट देत शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांकडून संगणक लॅबचा प्रभावी वापर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. भेटीदरम्यान काठमोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना विविध प्रश्न
विचारले. तसेच ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमाची अंमलबजावणी, शाळेतील भौतिक सुविधा आणि शालेय पोषण आहार याबाबत सविस्तर माहिती घेतली. शिक्षकांना मार्गदर्शन करत त्यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. यावेळी शिरूरचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती नितेश गादिया, शिक्षण समिती सदस्य सागर नरवडे, माजी गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, प्रशासन अधिकारी किसन खोडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेतील शैक्षणिक उपक्रम, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत काठमोडे यांनी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले.
- गॅसची साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांना शासनाचे निर्देश राज्यात एलपीजी गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत राहावा आणि काळाबाजार रोखावा यासाठी प्रशासन सतर्क झाले असून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. साठेबाजी, जादा दराने विक्री किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. #MaharashtraRevenue #RevenueDepartment #GasHoarding #ActionAgainstHoarding #GasShortage #LPGCrisis #LPGSupply1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- #pcmc #commisionerofpcmc #marathinews #ncp #bjp1
- पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- *नागपूर मोर्चात सहभागी व्हा; मोहन भागवत यांना जाब विचारू – प्रकाश आंबेडकर* पुणे : सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका कमकुवत ठरत आहे. इराणने जम्मू-काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने भूमिका घेतली होती, मात्र इराणवर हल्ला झाल्यानंतर भारताने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे स्पष्ट केले नाही, अशी टीका त्यांनी केली. इराण हा चीनचा मित्र देश असून योग्य धोरण अवलंबले असते तर भारताला गॅस पुरवठा मिळू शकला असता आणि सध्याचा गॅस तुटवडा निर्माण झाला नसता, असेही ते म्हणाले. याशिवाय सरकार आंदोलनांवर निर्बंध आणणारे नवे कायदे करत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्याकडे स्पष्ट धोरण नाही ते केवळ जात आणि धर्माच्या राजकारणावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी राजकारण करणे शक्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकिंग व्यवस्थेबाबतही लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.1
- Post by Vruttshakti Digital News1