जि. प. नंदुरबार सीईओ नमन गोयल यांच्या धाडसी निर्णयामुळे अनुसूचित क्षेत्रातील २२० 'शिक्षण सेवक' नियुक्तीचे आदेश वाटप! आमदार आमश्यादादा पाडवी यांचे सहकार्य, प्रहार शिक्षक संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश जि. प. नंदुरबार सीईओ नमन गोयल यांच्या धाडसी निर्णयामुळे अनुसूचित क्षेत्रातील २२० 'शिक्षण सेवक' नियुक्तीचे आदेश वाटप! आमदार आमश्यादादा पाडवी यांचे सहकार्य, प्रहार शिक्षक संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश नंदुरबार (दि. २६): शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदांमुळे रखडलेली भरती प्रक्रिया आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलणे नेहमीच गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर, कर्तव्यदक्ष अधिकारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल यांनी एक महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय घेत अनुसूचित क्षेत्रातील २२० 'शिक्षण सेवक' पदांच्या नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभा अक्कलकुवा-धडगाव तालुक्याचे आमदार मा. आमश्यादादा पाडवी, ॲड योगेश वि.जायभाये (मा. उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ औरंगाबाद,नागपूर) गणेशदादा पराडके मा. शिक्षण सभापती जिल्हा परिषद नंदुरबार यांचे सहकार्य, मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. पाठपुरावा करीत असताना जिल्हा परिषद नंदुरबार येथे आंदोलन करण्यात आले होते. पार्श्वभूमी व शासन निर्देश मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्र आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२) मधील गुणांच्या आधारे पेसा क्षेत्रातील पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली. शासन निर्णय दि. १९ फेब्रुवारी २०२६ व शालेय शिक्षण विभागाकडील दि. १७ जुलै २०२६ च्या निर्देशानुसार, नंदुरबार जिल्हा परिषदेतंर्गत मानधन तत्त्वावर पात्र उमेदवारांना 'शिक्षण सेवक' म्हणून तीन वर्षांच्या मानधनावर नियुक्त्या देण्यात येत आहेत. नियुक्तीच्या प्रमुख अटी व प्रशासकीय नियम मानधन व सेवाकाळ शिक्षण सेवक पदावर तीन वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावर, नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती मिळण्यास पात्र ठरतील. हा कालावधी रुजू झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांचा राहील. पेसाक्षेत्र व बदली नियम सदर नियुक्ती स्थानिक पेसा क्षेत्रात असल्याने ग्रामविकास विभागाने ठरविलेले जिल्हांतर्गत बदली व सेवाविषयक धोरण बंधनकारक असेल. नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाण्यास नियम प्रतिबंधित असून, यासाठी रितसर राजीनामा देऊन पुन्हा पवित्र पोर्टलद्वारे नियमानुसार प्रक्रिया पार पडली. कागदपत्र पडताळणी जात प्रमाणपत्र, जात वैधता, टीईटी/टीएआयटी पात्रता, शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत पडताळणी करण्यात आली. कोणतीही माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास पूर्वसूचना न देता नियुक्ती रद्द केली जाईल. हजर होण्याचा कालावधी उमेदवारांना नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित ठिकाणी सेवेत रुजू होणे अनिवार्य आहे. मुदतीत न आल्यास नेमणूक रद्द समजली जाईल. इतर अटी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू राहील. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, संगणक अर्हता आणि मुख्यालयी वास्तव्य करण्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.असेही नियुक्ती आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी यांना संघटनेच्या वतीने अभिनंदन शुभेच्छा देण्यात आल्या. महत्त्वाचा निर्णय तडीस नेल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी क्रांती आरसूड, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी (योजना) डॉ. युनुस पठाण, आस्थापना विभाग शिक्षण अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत व जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी विशेष अभिनंदन केले आहे. मानधन तत्वावर काम करणारे शिक्षक बांधवांनी गुणवत्ता पात्रता यादीतील मानधन कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन, कायमची नियुक्ती द्यावी, आणि सेवेमध्ये सामावून घ्यावे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून दाद मिळत नसल्यामुळे पुढील न्याय हक्कासाठी जि.प. नंदुरबार येथे समक्ष हजर राहून विनंती तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रहार शिक्षक संघटनेमार्फत न्यायालयात, वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करण्यात आला होता त्या पाठपुरावाला यश मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वाडी-वस्ती आणि पाड्यांवरील शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार असल्याने शिक्षक बांधव व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
जि. प. नंदुरबार सीईओ नमन गोयल यांच्या धाडसी निर्णयामुळे अनुसूचित क्षेत्रातील २२० 'शिक्षण सेवक' नियुक्तीचे आदेश वाटप! आमदार आमश्यादादा पाडवी यांचे सहकार्य, प्रहार शिक्षक संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश जि. प. नंदुरबार सीईओ नमन गोयल यांच्या धाडसी निर्णयामुळे अनुसूचित क्षेत्रातील २२० 'शिक्षण सेवक' नियुक्तीचे आदेश वाटप! आमदार आमश्यादादा पाडवी यांचे सहकार्य, प्रहार शिक्षक संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश नंदुरबार (दि. २६): शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदांमुळे रखडलेली भरती प्रक्रिया आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलणे नेहमीच गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर, कर्तव्यदक्ष अधिकारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल यांनी एक महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय घेत अनुसूचित क्षेत्रातील २२० 'शिक्षण सेवक' पदांच्या नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभा अक्कलकुवा-धडगाव तालुक्याचे आमदार मा. आमश्यादादा पाडवी, ॲड योगेश वि.जायभाये (मा. उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ औरंगाबाद,नागपूर) गणेशदादा पराडके मा. शिक्षण सभापती जिल्हा परिषद नंदुरबार यांचे सहकार्य, मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. पाठपुरावा करीत असताना जिल्हा परिषद नंदुरबार येथे आंदोलन करण्यात आले होते. पार्श्वभूमी व शासन निर्देश मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्र आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२) मधील गुणांच्या आधारे पेसा क्षेत्रातील पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली. शासन निर्णय दि. १९ फेब्रुवारी २०२६ व शालेय शिक्षण विभागाकडील दि. १७ जुलै २०२६ च्या निर्देशानुसार, नंदुरबार जिल्हा परिषदेतंर्गत मानधन तत्त्वावर पात्र उमेदवारांना 'शिक्षण सेवक' म्हणून तीन वर्षांच्या मानधनावर नियुक्त्या देण्यात येत आहेत. नियुक्तीच्या प्रमुख अटी व प्रशासकीय नियम मानधन व सेवाकाळ शिक्षण सेवक पदावर तीन वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावर, नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती मिळण्यास पात्र ठरतील. हा कालावधी रुजू झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांचा राहील. पेसाक्षेत्र व बदली नियम सदर नियुक्ती स्थानिक पेसा क्षेत्रात असल्याने ग्रामविकास विभागाने ठरविलेले जिल्हांतर्गत बदली व
सेवाविषयक धोरण बंधनकारक असेल. नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाण्यास नियम प्रतिबंधित असून, यासाठी रितसर राजीनामा देऊन पुन्हा पवित्र पोर्टलद्वारे नियमानुसार प्रक्रिया पार पडली. कागदपत्र पडताळणी जात प्रमाणपत्र, जात वैधता, टीईटी/टीएआयटी पात्रता, शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत पडताळणी करण्यात आली. कोणतीही माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास पूर्वसूचना न देता नियुक्ती रद्द केली जाईल. हजर होण्याचा कालावधी उमेदवारांना नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित ठिकाणी सेवेत रुजू होणे अनिवार्य आहे. मुदतीत न आल्यास नेमणूक रद्द समजली जाईल. इतर अटी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू राहील. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, संगणक अर्हता आणि मुख्यालयी वास्तव्य करण्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.असेही नियुक्ती आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी यांना संघटनेच्या वतीने अभिनंदन शुभेच्छा देण्यात आल्या. महत्त्वाचा निर्णय तडीस नेल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी क्रांती आरसूड, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी (योजना) डॉ. युनुस पठाण, आस्थापना विभाग शिक्षण अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत व जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी विशेष अभिनंदन केले आहे. मानधन तत्वावर काम करणारे शिक्षक बांधवांनी गुणवत्ता पात्रता यादीतील मानधन कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन, कायमची नियुक्ती द्यावी, आणि सेवेमध्ये सामावून घ्यावे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून दाद मिळत नसल्यामुळे पुढील न्याय हक्कासाठी जि.प. नंदुरबार येथे समक्ष हजर राहून विनंती तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रहार शिक्षक संघटनेमार्फत न्यायालयात, वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करण्यात आला होता त्या पाठपुरावाला यश मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वाडी-वस्ती आणि पाड्यांवरील शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार असल्याने शिक्षक बांधव व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
- शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्याना शेजारी श्री शिव पंचायतन दक्षिण मुखी श्री हनुमान आणि शनि देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे. या भव्य मंदिरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल. गणेश अंबिका हनुमानजी आणि शनि देवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा येईल. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रांत पूजन देवता आवाहन स्थापन ग्रहण दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत प्राणप्रतिष्ठा विधी होईल. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार मंगल स्नान न्यास प्राणप्रतिष्ठा प्रधान हवन उत्तरांग हवन कलश शिखर स्थापन ध्वजारोहण, बलिदान, महा पूर्णा होती होईल. त्यानंतर महाआरती महाप्रसाद होईल भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.3
- Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice1
- जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.1
- मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो1
- पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप पुणे | प्रतिनिधी पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे. सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो. “पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. “पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सी ओ पी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सी ओ पी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे. पोलिसांनी सी ओ पी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार? व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. “पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.1
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- महागाई रोखण्यासाठी शासनाचे धोरण अपयशी ठरले - माजी मंत्री अँड पद्माकर वळवी साखरेचे दर आणि वाढत्या महागाईवर पद्माकर वळवींची प्रतिक्रिया साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका महागाईमुळे जनतेचे आर्थिक गणित कोलमडले साखरेच्या दरवाढीवर सरकारने तातडीने नियंत्रण आणावे महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावेत दरवाढीचा थेट परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत महागाईच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्याची गरज महागाई रोखण्यासाठी शासनाचे धोरण अपयशी ठरले असल्याचं मत - अँड पद्माकर वळवी1