Shuru
Apke Nagar Ki App…
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मदत; सुरक्षेसाठी ५० लाखांचा निधी मंजूर!
Amravati News Update
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मदत; सुरक्षेसाठी ५० लाखांचा निधी मंजूर!
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Labour addaa.1
- बच्चू भाऊ छोट्या बच्चूंना भेटतील की आरोग्यमंत्र्यांना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल 1
- अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा; 4.98 लाखांचा मुद्देमाल जप्त अकोल्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात छापा टाकला. या कारवाईत तब्बल 3,200 लिटर सडवा मोहामाल, 71 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 4 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध दारूविरोधातील पोलिसांच्या या कारवाईची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📍 ठिकाण: नायगाव, अकोला 🚔 कारवाई: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला 💰 जप्त मुद्देमाल: ₹4,98,600 👥 ताब्यात: 2 आरोपी India News R7 Marathi — अकोला आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा.2
- अकोट शहर पोलिसांचा धडाका आठ चोरीच्या दुचाकींसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला : अकोट शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेत ८ चोरीच्या मोटारसायकली, दोन इंजिन, चेसीस व स्पेअर पार्ट असा तब्बल ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गजानन प्रभुदास रायबोले (२३) व अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार (३०), दोघेही रा. इंदिरानगर, येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती, अशी आरोपींची नावे आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता अकोट शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे व गुन्हे शोध पथकाने केली.1
- बीएसएनएल टॉवरवर चढलेल्या गोविंद गवई यांना अखेर रात्री साडेअकरा वाजता सुखरूप खाली उतरवण्यात यश बीएसएनएल टॉवरवर चढलेल्या गोविंद गवई यांना अखेर रात्री साडेअकरा वाजता सुखरूप खाली उतरवण्यात यश कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व कुटुंबीयांच्या अथक प्रयत्नांना यश प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या ४२ वर्षीय गोविंद गवई (रा. बडनेरा) यांनी अमर शहीद भगतसिंग चौक येथील बीएसएनएलच्या टॉवरवर चढल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री साडेअकराच्या सुमारास गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद गवई यांचा सुमारे बारा वर्षांपूर्वी धामणगांव रेल्वे तालुक्यातील दिघी महल्ले येथील एका युवतीसोबत विवाह झाला होता. कौटुंबिक वादातून सुमारे सहा वर्षांपूर्वी धामणगांव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात खावटीचा दावा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी गोविंद गवई न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाच्या परिसरात त्यांचा मेव्हण्यासोबत वाद झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गवई यांनी थेट अमर शहीद भगतसिंग चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. ते टॉवरवर चढल्याचे समजताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधत खाली येण्याची विनंती केली; मात्र गवई हे खाली येण्यास तयार नव्हते. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांना पाचारण करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीलाही घटनास्थळी बोलावण्यात आले. अनेक नागरिकांनी तसेच कुटुंबीयांनी फोनवरून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची सासू, पत्नी व मेव्हणा यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून गवई यांना खाली येण्याची विनंती केली. अखेर गवई यांच्या बहिणीने फोनवरून त्यांच्याशी संवाद साधत भावाची समजूत काढली. बहिणीच्या आवाहनाला प्रतिसाद देत रात्री साडेअकराच्या सुमारास गोविंद गवई टॉवरवरून खाली उतरले. त्यानंतर दत्तापूर पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, धामणगांव रेल्वे येथे पाठविले. या घटनेमुळे धामणगांव शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये दिवसभर एकच चर्चा रंगली होती. पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कुटुंबीयांच्या संयमी प्रयत्नांमुळे अखेर गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.1
- जश्मे ईद मिलादुन्नबी अवसर पर गवर्नमेंट हॉस्पिटल फल वाटप1
- हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.4
- Post by Labour addaa.1