न्यू बायपास रोडवर कुसुम आजीचा थरार, आधार केंद्राच्या टीमने वाचवले प्राण* *85 वर्षीय मनोरुग्ण आजी 8 दिवस घरून बेपत्ता, लोणी टाकळी येथे हायवेवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या* आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क * *बडनेरा / लोणी टाकळी, 25 ऑगस्ट 2026* *अमरावती महानगरपालिका व पब्लिक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा* च्या तत्परतेमुळे एका 85 वर्षीय आजीचे प्राण वाचले आहेत. *कुसुम दौलतराव मेश्राम, वय अंदाजे 85 वर्षे*, या मनोरुग्ण असलेल्या आजी मागील आठ दिवसांपासून घरातून निघून गेल्याने बेपत्ता होत्या. त्या *न्यू बायपास रोड, लोणी टाकळी* येथे रस्त्याच्या अगदी कडेला झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या रोडवर मोठमोठे ट्रक आणि गाड्या अतिशय वेगाने धावत असल्यामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. त्याचवेळी *लोणी टाकळी येथील शाळेतील एक शिक्षिका* घरी जात असताना त्यांना आजी रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. त्यांनी तात्काळ मानवतेचे दर्शन घडवत *आधार केंद्राच्या टीमला* कॉल करून माहिती दिली. माहिती मिळताच *अगदी 10 मिनिटांत आधार केंद्राची टीम घटनास्थळी पोहोचली*, आजीला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन *आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे दाखल करण्यात आले*. त्यांना स्वच्छता, जेवण व आवश्यक काळजी देण्यात आली. त्यानंतर टीमने तात्काळ *कुटुंबाचा शोध सुरू केला* आणि त्याच दिवशी *रात्री 8 वाजता कुसुम आजीला सुखरूप त्यांच्या मुलाच्या स्वाधीन करण्यात आले*. आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आईला पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. या संपूर्ण कार्यात *संचालक श्री राजीव बसवनाथे, व्यवस्थापिका सौ. ज्योती राठोड आणि काळजीवाहक रोहित घोंगडे आधार केंद्राची टीम* यांनी विशेष परिश्रम घेतले. लोणी टाकळी येथील शिक्षिकेचे आणि आधार टीमच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. *भवतु सब्ब मंगलम्* 🌸 *निवेदक:* *एक हात मदतीचा परिवार* *अमरावती महानगरपालिका व पब्लिक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित* आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा, अमरावती
न्यू बायपास रोडवर कुसुम आजीचा थरार, आधार केंद्राच्या टीमने वाचवले प्राण* *85 वर्षीय मनोरुग्ण आजी 8 दिवस घरून बेपत्ता, लोणी टाकळी येथे हायवेवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या* आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क * *बडनेरा / लोणी टाकळी, 25 ऑगस्ट 2026* *अमरावती महानगरपालिका व पब्लिक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा* च्या तत्परतेमुळे एका 85 वर्षीय आजीचे प्राण वाचले आहेत. *कुसुम दौलतराव मेश्राम, वय अंदाजे 85 वर्षे*, या मनोरुग्ण असलेल्या आजी मागील आठ दिवसांपासून घरातून निघून गेल्याने बेपत्ता होत्या. त्या *न्यू बायपास रोड, लोणी टाकळी* येथे रस्त्याच्या अगदी कडेला झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या रोडवर मोठमोठे ट्रक आणि गाड्या अतिशय वेगाने धावत असल्यामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. त्याचवेळी *लोणी टाकळी येथील शाळेतील एक शिक्षिका* घरी जात असताना त्यांना आजी रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. त्यांनी तात्काळ मानवतेचे दर्शन घडवत *आधार केंद्राच्या टीमला* कॉल करून माहिती दिली. माहिती मिळताच *अगदी 10 मिनिटांत आधार केंद्राची टीम घटनास्थळी पोहोचली*, आजीला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन *आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे दाखल करण्यात आले*. त्यांना स्वच्छता, जेवण व आवश्यक काळजी देण्यात आली. त्यानंतर टीमने तात्काळ *कुटुंबाचा शोध सुरू केला* आणि त्याच दिवशी *रात्री 8 वाजता कुसुम आजीला सुखरूप त्यांच्या मुलाच्या स्वाधीन करण्यात आले*. आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आईला पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. या संपूर्ण कार्यात *संचालक श्री राजीव बसवनाथे, व्यवस्थापिका सौ. ज्योती राठोड आणि काळजीवाहक रोहित घोंगडे आधार केंद्राची टीम* यांनी विशेष परिश्रम घेतले. लोणी टाकळी येथील शिक्षिकेचे आणि आधार टीमच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. *भवतु सब्ब मंगलम्* 🌸 *निवेदक:* *एक हात मदतीचा परिवार* *अमरावती महानगरपालिका व पब्लिक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित* आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा, अमरावती
- आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”4
- वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,1
- छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर ,घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला ,अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश खवड्या डोंगरावरील घटनेनंतर पुन्हा मोठी घटना टळली घरी वाद झाले असल्याने रागामध्ये तरुण टावर वर चढला असल्याची माहिती तरुणाची आई सोबत भांडण झाले होते आणि नशेमध्ये तो टावर वर चढला कारण शिवाजी माळी असे तरुणाचे नाव2
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा1
- जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट प्रेमाचा सण. याच सणाचे औचित्य साधून वैजापूरमधील विद्यार्थ्यांनी देशासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या सीमेवरील जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुक्ताई प्राथमिक विद्यालय आणि कैलास पाटील विद्यालयातील चिमुकल्यांनी स्वहस्ते राख्या बनवून जवानांना पाठवल्या आहेत. पाहूया या विशेष उपक्रमाचा हा सविस्तर वृत्तांत..."1
- खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी1