“शेगांवकरांची लूट थांबवा!” – १००% शास्ती माफीसाठी प्रहारचा इशारा; आंदोलनाचा गर्जना “शेगावकरांची लूट थांबवा!” – १००% शास्ती माफीसाठी प्रहारचा इशारा; आंदोलनाचा गर्जना शेगाव | प्रतिनिधी मालमत्ता करावरील वाढत्या शास्तीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेगावकर नागरिकांना दिलासा द्यावा आणि महाराष्ट्र शासनाच्या अभय योजनेअंतर्गत १०० टक्के शास्ती माफी तात्काळ लागू करावी, अशी जोरदार मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला धडक निवेदन देण्यात आले. सामान्य नागरिक, छोटे व्यापारी आणि कष्टकरी वर्गावर अन्यायकारक कराचा बोजा टाकून त्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. राज्य शासनाने १९ मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार थकित मालमत्ता कर वसुलीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी “अभय योजना” राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना अनेक नगरपालिकांनी ही योजना लागू केली; मात्र शेगावमध्ये अद्याप अंमलबजावणी न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. मूळ करापेक्षा दुप्पट रक्कम शास्तीच्या स्वरूपात आकारली जात असल्याने नागरिक कर भरण्यास असमर्थ ठरत असून यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रहारच्या वतीने दिलेल्या निवेदनात १०० टक्के शास्ती माफीची योजना तातडीने लागू करून ती किमान ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू ठेवावी, तसेच नगराध्यक्ष व नगरसेवकांनी वैयक्तिक लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असून हा लढा शेगावकरांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचा ठाम पवित्रा प्रहारने घेतला आहे. वाढत्या कराच्या बोजामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा जनआक्रोश उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. “सामान्यांच्या हक्कासाठी प्रहार मैदानात” अशी घोषणा देत नगर परिषद प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेवटी करण्यात आली.
“शेगांवकरांची लूट थांबवा!” – १००% शास्ती माफीसाठी प्रहारचा इशारा; आंदोलनाचा गर्जना “शेगावकरांची लूट थांबवा!” – १००% शास्ती माफीसाठी प्रहारचा इशारा; आंदोलनाचा गर्जना शेगाव | प्रतिनिधी मालमत्ता करावरील वाढत्या शास्तीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेगावकर नागरिकांना दिलासा द्यावा आणि महाराष्ट्र शासनाच्या अभय योजनेअंतर्गत १०० टक्के शास्ती माफी तात्काळ लागू करावी, अशी जोरदार मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला धडक निवेदन देण्यात आले. सामान्य नागरिक, छोटे व्यापारी आणि कष्टकरी वर्गावर अन्यायकारक कराचा बोजा टाकून त्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. राज्य शासनाने १९ मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार थकित मालमत्ता कर वसुलीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी “अभय योजना” राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना अनेक नगरपालिकांनी ही योजना लागू केली; मात्र शेगावमध्ये अद्याप अंमलबजावणी न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. मूळ करापेक्षा
दुप्पट रक्कम शास्तीच्या स्वरूपात आकारली जात असल्याने नागरिक कर भरण्यास असमर्थ ठरत असून यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रहारच्या वतीने दिलेल्या निवेदनात १०० टक्के शास्ती माफीची योजना तातडीने लागू करून ती किमान ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू ठेवावी, तसेच नगराध्यक्ष व नगरसेवकांनी वैयक्तिक लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असून हा लढा शेगावकरांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचा ठाम पवित्रा प्रहारने घेतला आहे. वाढत्या कराच्या बोजामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा जनआक्रोश उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. “सामान्यांच्या हक्कासाठी प्रहार मैदानात” अशी घोषणा देत नगर परिषद प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेवटी करण्यात आली.
- ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!1
- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी ज.न.म. संस्थान, उपपीठ पश्चिम विदर्भ, चिंचोली फाटा (सवर्णा), खामगाव हायवे, ता. शेगाव, जि. बुलढाणा येथे सकाळी 9:00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिरांतर्गत या वर्षी जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1,71,150 रक्त कुपिंकांचे संकलन करण्यात आले, ब्लड इन नीड, "एक पेड माँ के नाम" वृक्षारोपण उपक्रमांतर्गत 1,10,687 वृक्षारोपण नोव्हेंबर 2025 महिन्यांमध्ये करण्यात आले, इत्यादी उपक्रम आयोजित केली जातात. या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. 22 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमात दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी साधक दीक्षा व 23 फेब्रुवारी 2026 रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा व उपासक यांनी साधक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ समिती, जिल्हा सेवा समिती यांनी केले आहे.1
- खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.1
- शांतता आणि उत्साह! खामगावात शिवजयंतीसाठी चोख बंदोबस्त.1
- बुलढाण्यात जनआक्रोश! हद्दवाढीविरोधात ५ गावांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा.*1
- Post by Ayaz patel Ayaz patel1
- Post by महेंद्र रघुनाथ महाजन बक्षीपुर9
- राष्ट्रपतींच्या दौऱ्यानेच जाग आली का? संत नगरी शेगावात प्रशासनाच्या ‘तत्परते’वर नागरिकांचा सवाल शेगाव : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संत नगरी शेगावात प्रशासन अक्षरशः धावपळ करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते आनंद सागर बाळापूर रोडवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू झाली असून खामगाव रोडवरील दुभाजकांची साफसफाई, झाडांची मशागत, गवत काढणे, रस्त्यांची स्वच्छता अशा सर्व कामांना अचानक वेग आला आहे. मात्र या ‘तत्परते’मुळे शहरातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे — ही कामे फक्त व्हीआयपी दौऱ्यापुरतीच का? काही दिवसांपूर्वीच शेगावातील प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. हजारो दिंड्या, वारकरी आणि भाविक संत नगरीत दाखल झाले होते. त्या वेळी रस्त्यांवरील खड्डे जैसे थे होते, अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद होत्या, स्वच्छतेचा प्रश्न कायम होता. नगरपालिकेकडून कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. भक्तांच्या सोयी-सुविधांपेक्षा प्रशासनाची उदासीनता अधिक ठळकपणे जाणवत होती. आता मात्र राष्ट्रपतींचा दौरा जाहीर होताच काही दिवसांतच चित्र पालटले आहे. वर्षानुवर्षे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन अचानक सक्रिय झाले आहे. जे काम नियमित देखभाल म्हणून व्हायला हवे होते, ते आज ‘ततडीच्या कामां’च्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होत विचारत आहेत — शेगावातील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रपतींच्या दौऱ्याचीच गरज होती का? संत नगरीचा दर्जा, येथील लाखो भाविकांची वर्दळ, शहराची वाढती लोकसंख्या या सगळ्यांचा विचार करता रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता ही मूलभूत कामे कायमस्वरूपी दर्जेदार असणे अपेक्षित आहे. परंतु येथे परिस्थिती उलटी दिसते. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष आणि व्हीआयपींसाठी तातडीची ‘मेकओव्हर’ मोहीम — हीच प्रशासनाची कार्यपद्धती बनली आहे का, असा रोखठोक सवाल आता केला जात आहे. राष्ट्रपतींचा दौरा हा निश्चितच शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे. मात्र त्या निमित्ताने सुरू झालेली ही धावपळ प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर बोट ठेवणारी ठरत आहे. संत नगरी शेगावात विकास हा कायमस्वरूपी आणि नागरिककेंद्री होणार की तो फक्त मोठ्या पाहुण्यांच्या स्वागतापुरताच मर्यादित राहणार? हा प्रश्न आज प्रत्येक शेगावकराच्या मनात घुमत आहे.1