logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा गावात २८ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वादळग्रस्तांना तातडीने मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे. या वादळामुळे फुटाणा मोकासा येथील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यात काही घरे अंशतः तर काही पूर्णपणे कोसळली आहेत. तसेच, वीज खांब पडल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीमालाचेही मोठे नुकसान झाल्याने नागरिकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच नैसर्गिक आपत्तीत घरावरील टीनचे शेड कोसळल्याने स्वर्गीय लहानूबाई नानुजी पाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नुकसानग्रस्त घरांचे, शेतीचे व इतर मालमत्तेचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, कोसळलेले वीज खांब त्वरित उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. मृत लहानूबाई नानुजी पाल यांच्या कुटुंबाला विशेष आर्थिक सहाय्य व तातडीची नुकसानभरपाई देण्याची मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे. याशिवाय, आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही स्वतंत्र पत्र पाठवून फुटाणा मोकासा येथील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याचे आणि बाधित नागरिकांना शक्य तितक्या लवकर मदत उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. या नैसर्गिक संकटाच्या काळात शासनाने संवेदनशील भूमिका घेत प्रभावित कुटुंबांना दिलासा द्यावा आणि मदतकार्य युद्धपातळीवर राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

14 hrs ago
user_Vainganga News Live Network
Vainganga News Live Network
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
14 hrs ago
05ba5f51-8b26-40e5-b78a-b1271a5fd954

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा गावात २८ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वादळग्रस्तांना तातडीने मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे. या वादळामुळे फुटाणा मोकासा येथील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यात काही घरे अंशतः तर काही पूर्णपणे कोसळली आहेत. तसेच, वीज खांब पडल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीमालाचेही मोठे नुकसान झाल्याने नागरिकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच नैसर्गिक आपत्तीत घरावरील टीनचे शेड कोसळल्याने स्वर्गीय लहानूबाई नानुजी पाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नुकसानग्रस्त घरांचे, शेतीचे व इतर मालमत्तेचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, कोसळलेले वीज खांब त्वरित उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. मृत लहानूबाई नानुजी पाल यांच्या कुटुंबाला विशेष आर्थिक सहाय्य व तातडीची नुकसानभरपाई देण्याची मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे. याशिवाय, आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही स्वतंत्र पत्र पाठवून फुटाणा मोकासा येथील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याचे आणि बाधित नागरिकांना शक्य तितक्या लवकर मदत उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. या नैसर्गिक संकटाच्या काळात शासनाने संवेदनशील भूमिका घेत प्रभावित कुटुंबांना दिलासा द्यावा आणि मदतकार्य युद्धपातळीवर राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

More news from Chandrapur and nearby areas
  • सावली आणि सिंदेवाही तालुक्यात चार पिलांसह २० हत्तींच्या कळपाने शिरकाव केला आहे. या हत्तींच्या कळपामुळे सावली तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
    1
    सावली आणि सिंदेवाही तालुक्यात चार पिलांसह २० हत्तींच्या कळपाने शिरकाव केला आहे. या हत्तींच्या कळपामुळे सावली तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
    user_Suresh Komawar
    Suresh Komawar
    Press advisory Pombhurna, Chandrapur•
    5 min ago
  • लोकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर बनणे हे सर्वात पवित्र कार्य आहे, जे विश्वासाच्या नाजूक धाग्याने बांधलेले आहे. मात्र, जेव्हा या विश्वासाला व्यवसायाचे स्वरूप दिले जाते, तेव्हा व्यवस्थेतील गैरव्यवहार सुरू होतो. या गैरव्यवहारांवर केवळ छोटे-छोटे उपाय करून सुधारणा होणार नाही, तर संपूर्ण व्यवस्थेलाच मूळापासून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
    1
    लोकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर बनणे हे सर्वात पवित्र कार्य आहे, जे विश्वासाच्या नाजूक धाग्याने बांधलेले आहे. मात्र, जेव्हा या विश्वासाला व्यवसायाचे स्वरूप दिले जाते, तेव्हा व्यवस्थेतील गैरव्यवहार सुरू होतो. या गैरव्यवहारांवर केवळ छोटे-छोटे उपाय करून सुधारणा होणार नाही, तर संपूर्ण व्यवस्थेलाच मूळापासून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी अमृत योजनेच्या निकृष्ट कामकाजाविरुद्ध दंड थोपटले आहेत. या निषेधार्थ, १ जून रोजी सकाळी १० वाजता मनपा विरोधात ‘घागर फोडो मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. विक्रांत सहारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, अमृत योजनेच्या निकृष्ट कामात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
    1
    चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी अमृत योजनेच्या निकृष्ट कामकाजाविरुद्ध दंड थोपटले आहेत. या निषेधार्थ, १ जून रोजी सकाळी १० वाजता मनपा विरोधात ‘घागर फोडो मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. विक्रांत सहारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, अमृत योजनेच्या निकृष्ट कामात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    1
    मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सध्या 'कार्य त्यौहार' च्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यातून काही सकारात्मक बदल घडून येतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
    1
    सध्या 'कार्य त्यौहार' च्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यातून काही सकारात्मक बदल घडून येतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
    user_Satish Tiwari
    Satish Tiwari
    Artist वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंब्रा-कळवा मतदारसंघातील आमदारांनी जनहितार्थ असलेल्या विविध मुद्द्यांवर जनतेला भावनिक आवाहन केले आहे. या आवाहनाद्वारे आमदारांनी जनतेच्या हिताचे विषय मांडत त्यांना कळकळीची विनंती केली.
    1
    मुंब्रा-कळवा मतदारसंघातील आमदारांनी जनहितार्थ असलेल्या विविध मुद्द्यांवर जनतेला भावनिक आवाहन केले आहे. या आवाहनाद्वारे आमदारांनी जनतेच्या हिताचे विषय मांडत त्यांना कळकळीची विनंती केली.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • NEET विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भारतातील युवा नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत नाहीत. विद्यार्थ्यांनी सांगितले की, परीक्षेचे पेपर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर खुलेआम विकले जात आहेत. हे पेपर कोणत्या किमतीत विकले जात आहेत, कोण विकत घेत आहे आणि माफियां कसे काम करत आहेत, हे सर्व या मुलांना माहीत आहे. त्यांचा एकच प्रश्न होता की, 'जे आम्हाला माहीत आहे, ते सरकारला आणि संस्थांना का माहीत नाही?' सत्य हे आहे की, या मुलांना या सडलेल्या व्यवस्थेत सुधारणा कशी करता येईल, हे सरकारपेक्षा चांगले माहीत आहे. दुसरीकडे, ही किती लाजिरवाणी बाब आहे की, ज्या सेनेचे काम शत्रूंपासून देशाचे रक्षण करणे आहे, तिला आज मोदी सरकारच्या 'स्वतःच्या भ्रष्टाचारापासून' मुलांचे पेपर वाचवण्यासाठी पाठवले जात आहे. आता तुकड्यांमध्ये सुधारणा करून काम चालणार नाही. विद्यार्थी, शिक्षक आणि तज्ज्ञांसोबत मिळून संपूर्ण परीक्षा व्यवस्था नव्याने तयार करावी लागेल. आपण आणखी मुले गमावू शकत नाही आणि एकाही पिढीचे भविष्य या भ्रष्ट व्यवस्थेच्या हवाली करू शकत नाही.
    1
    NEET विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भारतातील युवा नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत नाहीत. विद्यार्थ्यांनी सांगितले की, परीक्षेचे पेपर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर खुलेआम विकले जात आहेत. हे पेपर कोणत्या किमतीत विकले जात आहेत, कोण विकत घेत आहे आणि माफियां कसे काम करत आहेत, हे सर्व या मुलांना माहीत आहे.

त्यांचा एकच प्रश्न होता की, 'जे आम्हाला माहीत आहे, ते सरकारला आणि संस्थांना का माहीत नाही?' सत्य हे आहे की, या मुलांना या सडलेल्या व्यवस्थेत सुधारणा कशी करता येईल, हे सरकारपेक्षा चांगले माहीत आहे. दुसरीकडे, ही किती लाजिरवाणी बाब आहे की, ज्या सेनेचे काम शत्रूंपासून देशाचे रक्षण करणे आहे, तिला आज मोदी सरकारच्या 'स्वतःच्या भ्रष्टाचारापासून' मुलांचे पेपर वाचवण्यासाठी पाठवले जात आहे.

आता तुकड्यांमध्ये सुधारणा करून काम चालणार नाही. विद्यार्थी, शिक्षक आणि तज्ज्ञांसोबत मिळून संपूर्ण परीक्षा व्यवस्था नव्याने तयार करावी लागेल. आपण आणखी मुले गमावू शकत नाही आणि एकाही पिढीचे भविष्य या भ्रष्ट व्यवस्थेच्या हवाली करू शकत नाही.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • कुही तालुक्यातील वेलतूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. या वादळामुळे काही ठिकाणी घरांची छत उडून गेल्याची माहिती मिळाली आहे. वेलतूर आणि आसपासच्या भागात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर आणि वादळी वारे सुरू आहेत. हवामान कोणत्याही क्षणी आणखी बिघडू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा कच्च्या घरांच्या आश्रयाला थांबू नये, तसेच वीज आणि टेलिफोनच्या खांबांपासून दूर राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून सुरक्षित ठिकाणी थांबावे असेही सूचित करण्यात आले आहे.
    1
    कुही तालुक्यातील वेलतूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. या वादळामुळे काही ठिकाणी घरांची छत उडून गेल्याची माहिती मिळाली आहे.

वेलतूर आणि आसपासच्या भागात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर आणि वादळी वारे सुरू आहेत. हवामान कोणत्याही क्षणी आणखी बिघडू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा कच्च्या घरांच्या आश्रयाला थांबू नये, तसेच वीज आणि टेलिफोनच्या खांबांपासून दूर राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून सुरक्षित ठिकाणी थांबावे असेही सूचित करण्यात आले आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.