logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल! प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; हरकतींसाठी ठरल्या अंतिम तारखा ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल! प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; हरकतींसाठी ठरल्या अंतिम तारखा शेगांव / बुलढाणा, दि. १८ (जिमाका) – जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया आता वेगात सुरू झाली असून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने टप्पानिहाय कालबद्ध नियोजन जाहीर करत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. * २० फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम प्रारूप टप्प्यात तहसीलदारांकडून गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम केला जाणार असून तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग सीमा निश्चित होणार आहेत. * ५ मार्चपर्यंत समितीकडून तपासणी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती ५ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची छाननी करणार असून प्रस्ताव ११ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेत ३० मार्चपर्यंत प्रारूपावर अंतिम स्वाक्षऱ्या होणार आहेत. * ७ एप्रिलपासून हरकतींसाठी संधी प्रारूप प्रभाग रचनेला ७ एप्रिलपर्यंत प्रसिद्धी देण्यात येणार असून नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. * ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रस्ताव आयोगाकडे पाठवतील आणि आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. * “नागरिकांनी नोंद घ्यावी” – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असून सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

18 hrs ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
18 hrs ago
3b404e3f-6027-4242-beb1-ea4e80ce7562

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल! प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; हरकतींसाठी ठरल्या अंतिम तारखा ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल! प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; हरकतींसाठी ठरल्या अंतिम तारखा शेगांव / बुलढाणा, दि. १८ (जिमाका) – जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया आता वेगात सुरू झाली असून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने टप्पानिहाय कालबद्ध नियोजन जाहीर करत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. * २० फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम प्रारूप टप्प्यात तहसीलदारांकडून गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम केला जाणार असून तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग सीमा निश्चित होणार आहेत. * ५ मार्चपर्यंत समितीकडून तपासणी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती ५ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची छाननी करणार असून प्रस्ताव ११ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेत ३० मार्चपर्यंत प्रारूपावर अंतिम स्वाक्षऱ्या होणार आहेत. * ७ एप्रिलपासून हरकतींसाठी संधी प्रारूप प्रभाग रचनेला ७ एप्रिलपर्यंत प्रसिद्धी देण्यात येणार असून नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. * ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रस्ताव आयोगाकडे पाठवतील आणि आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. * “नागरिकांनी नोंद घ्यावी” – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असून सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​खामगाव : शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या मुख्य भागातून आणि मिरवणूक मार्गावरून 'रूट मार्च' काढण्यात आला. ​मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गाची पायी चालत पाहणी केली. मार्गावरील संवेदनशील ठिकाणे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. ​या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अफवांना थारा मिळू नये, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.​मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
    4
    ​खामगाव :  शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या मुख्य भागातून आणि मिरवणूक मार्गावरून 'रूट मार्च' काढण्यात आला.
​मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गाची पायी चालत पाहणी केली. मार्गावरील संवेदनशील ठिकाणे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. ​या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अफवांना थारा मिळू नये, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.​मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice
    1
    🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨
खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢
#Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice
    user_DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    पत्रकार खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Asgar Khan in BCN news nagpur
    1
    Post by Asgar Khan in BCN news nagpur
    user_Asgar Khan in BCN news nagpur
    Asgar Khan in BCN news nagpur
    पत्रकार Akola, Maharashtra•
    11 hrs ago
  • चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    1
    चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    1
    कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ​खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. मात्र, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ​काल रात्री च्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दुर्दैवी घटनेत घरातील एका मुलीला दुखापत झाली आहे. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला.ही घटना घडल्यानंतर शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यास सुरुवात केली. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या किंवा धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांची गर्दी जमा झाली होती. ​​घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी दोन्ही समुदायातील प्रमुख व्यक्तींची तातडीची बैठक घेतली. ​"ही घटना दोन समाजातील नसून वैयक्तिक वादाचा परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना समज दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. ​शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी जनतेला खालील बाबींचे आवाहन केले आहे: ​अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते फॉरवर्ड करू नका. उद्या शिवजयंतीचा मोठा सण आहे. हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, अफवा पसरवणाऱ्या आयडीवर सायबर सेलचे बारीक लक्ष असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये.
    3
    ​खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. मात्र, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. 
​काल रात्री च्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दुर्दैवी घटनेत घरातील एका मुलीला दुखापत झाली आहे. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला.ही घटना घडल्यानंतर शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यास सुरुवात केली. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या किंवा धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांची गर्दी जमा झाली होती. ​​घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी दोन्ही समुदायातील प्रमुख व्यक्तींची तातडीची बैठक घेतली. ​"ही घटना दोन समाजातील नसून वैयक्तिक वादाचा परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना समज दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. ​शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी जनतेला खालील बाबींचे आवाहन केले आहे:
​अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते फॉरवर्ड करू नका.  उद्या शिवजयंतीचा मोठा सण आहे. हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, अफवा पसरवणाऱ्या आयडीवर सायबर सेलचे बारीक लक्ष असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.