दादर–भुसावल एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना दिलासा धरणगाव : खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. दादर–भुसावल दरम्यान धावणारी विशेष गाडी आता कायमस्वरूपी करण्यात आली असून, ती 19047/48 दादर–भुसावल एक्सप्रेस या नव्या क्रमांकाने नियमित धावणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या तिकीट दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत बचत होणार असून, सामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फायदा होईल. खानदेशातील अनेक प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करत असल्याने ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच खानदेशच्या लोकप्रिय खासदार मा. स्मिता ताई वाघ यांच्या प्रयत्नांमुळे ही मागणी पूर्ण झाल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर, डीआरएम व संबंधित अधिकाऱ्यांचेही खानदेशवासीयांकडून आभार मानण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेचे झेड अर आर यु सी सी मेंबर प्रतीक जैन यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून,प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल.”
दादर–भुसावल एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना दिलासा धरणगाव : खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. दादर–भुसावल दरम्यान धावणारी विशेष गाडी आता कायमस्वरूपी करण्यात आली असून, ती 19047/48 दादर–भुसावल एक्सप्रेस या नव्या क्रमांकाने नियमित धावणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या तिकीट दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत बचत होणार असून, सामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फायदा होईल. खानदेशातील अनेक प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करत असल्याने ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच खानदेशच्या लोकप्रिय खासदार मा. स्मिता ताई वाघ यांच्या प्रयत्नांमुळे ही मागणी पूर्ण झाल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर, डीआरएम व संबंधित अधिकाऱ्यांचेही खानदेशवासीयांकडून आभार मानण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेचे झेड अर आर यु सी सी मेंबर प्रतीक जैन यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून,प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल.”
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by गणेश मौर्य1
- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- पैठण तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पैठण तालुक्यात आज अवकाळी गारांचा जोरदार पाऊस झाला. रांजणगाव, दांडगा परिसरात अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.1
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by Jansagar 9 Marathi1
- सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.1