नाथनगरच्या शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठ्यासाठी बेमुदत उपोषण सुरू छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – शेंद्राबन महसुली क्षेत्रातील नाथनगर येथील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा पूर्ववत करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण आजपासून सुरू झाले आहे. याबाबत सुधाकर विश्वनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. शेंद्राबन येथील गट क्रमांक ४३, ४५, ४७, ४९, ५०, ५१, ५९ आणि ६० हे गट पूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून संपादित करण्यात आले होते. त्या काळात या भागातील १८ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे कृषी पंप कार्यरत होते. मात्र काही वर्षांनंतर भूसंपादन प्रक्रिया रद्द करून जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली. मात्र, संपादन काळात येथील संपूर्ण विद्युत वितरण व्यवस्था काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षे शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत विद्युत पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिसरात पाण्याची उपलब्धता असूनही वीज नसल्यामुळे सिंचन होऊ शकत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर नाथनगर येथील सर्व शेतकरी बुधवारी (दि. १५ एप्रिल २०२६) रोजी सकाळी ११ वाजता महावितरण ग्रामीण मंडळ कार्यालय, नारेगाव, वखार्ड रोड, छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाथनगरच्या शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठ्यासाठी बेमुदत उपोषण सुरू छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – शेंद्राबन महसुली क्षेत्रातील नाथनगर येथील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा पूर्ववत करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण आजपासून सुरू झाले आहे. याबाबत सुधाकर विश्वनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. शेंद्राबन येथील गट क्रमांक ४३, ४५, ४७, ४९, ५०, ५१, ५९ आणि ६० हे गट पूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून संपादित करण्यात आले होते. त्या काळात या भागातील १८ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे कृषी पंप कार्यरत होते. मात्र काही वर्षांनंतर भूसंपादन प्रक्रिया रद्द करून जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली. मात्र, संपादन काळात येथील संपूर्ण विद्युत वितरण व्यवस्था काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षे शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत विद्युत पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिसरात पाण्याची उपलब्धता असूनही वीज नसल्यामुळे सिंचन होऊ शकत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर नाथनगर येथील सर्व शेतकरी बुधवारी (दि. १५ एप्रिल २०२६) रोजी सकाळी ११ वाजता महावितरण ग्रामीण मंडळ कार्यालय, नारेगाव, वखार्ड रोड, छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- छत्रपती संभाजी नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून जयंती साजरी केली1
- Md Tayyab Zafar Best Speech ॥ Eid Milan Program ॥ Organized by Vanchit Bahujan Aghadi1
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...2
- सिल्लोड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले भाषण व अनेक वर्षापासून निमित्त महापुरुषांच्या जयंती निमित्त ते भाषण करतात मात्र अनेक वर्षांचा अनुभव यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला आहे1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1