logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एकरी २५ हजार मदतीची मागणी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यासह शहरात १५ व १६ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे, घरांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा त्वरित करून बाधितांना मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, व्यापारी सेना, महिला आघाडी तसेच शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने धरणगाव तहसील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रत्येक शेतकऱ्याला एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे उपनेते मा. गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख मा. निलेश भाऊ चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. धरणगाव येथे निवेदन देताना जानकीराम पाटील, जयदीप पाटील, राजेंद्र ठाकरे, निलेश चौधरी, विजय पाटील, उमेश महाजन, भागवत चौधरी, हेमंत महाजन, परमेश्वर महाजन, अरुण पाटील, सचिन पाटील, राहुल रोकडे, राजेंद्र चौधरी, सोपान महाजन, जितेंद्र धनगर, किशोर माळी, रविंद्र वाघ, स्वप्निल परदेशी, गजानन महाजन, माधव पाटील, भरत पाटील, संदीप पाटील, लखिचंद पाटील, भिकन पाटील, साकरे आदींसह गंगापुरी, जाभोरा, धरणगाव, पष्टाणे, रोटवद, साळवा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ऐक्याचे कौतुक करत उपस्थितांचे आभार मानले.

on 18 August
user_Kiran Mali
Kiran Mali
Journalist Dharangaon, Jalgaon•
on 18 August

एकरी २५ हजार मदतीची मागणी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यासह शहरात १५ व १६ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे, घरांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा त्वरित करून बाधितांना मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, व्यापारी सेना, महिला आघाडी तसेच शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने धरणगाव तहसील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रत्येक शेतकऱ्याला एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे उपनेते मा. गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख मा. निलेश भाऊ चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. धरणगाव येथे निवेदन देताना जानकीराम पाटील, जयदीप पाटील, राजेंद्र ठाकरे, निलेश चौधरी, विजय पाटील, उमेश महाजन, भागवत चौधरी, हेमंत महाजन, परमेश्वर महाजन, अरुण पाटील, सचिन पाटील, राहुल रोकडे, राजेंद्र चौधरी, सोपान महाजन, जितेंद्र धनगर, किशोर माळी, रविंद्र वाघ, स्वप्निल परदेशी, गजानन महाजन, माधव पाटील, भरत पाटील, संदीप पाटील, लखिचंद पाटील, भिकन पाटील, साकरे आदींसह गंगापुरी, जाभोरा, धरणगाव, पष्टाणे, रोटवद, साळवा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ऐक्याचे कौतुक करत उपस्थितांचे आभार मानले.

More news from Jalgaon and nearby areas
  • Post by Kiran Mali
    1
    Post by Kiran Mali
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Journalist Dharangaon, Jalgaon•
    19 hrs ago
  • राज्यभरातील कुणबी संघटना नागपुरात एकवटणार... मंगेश भारसाकडे
    1
    राज्यभरातील कुणबी संघटना नागपुरात एकवटणार... मंगेश भारसाकडे
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे कार्यक्रमात ​आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲपचा वापर करा; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शेतकऱ्यांना आवाहन ​सिल्लोड: बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीमध्ये मोबाईल ॲप्सचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे आवाहन माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. २४ डिसेंबर रोजी सिल्लोड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. ​तंत्रज्ञानामुळे शेती होणार सोपी ​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, हवामानाचा अंदाज, बाजारभाव आणि पिकांवरील रोगराईचे व्यवस्थापन करण्यासाठी सध्या अनेक प्रगत मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास: ​शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील. ​नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होईल. ​बाजारपेठेची माहिती थेट मिळाल्याने आर्थिक फसवणूक टळेल. ​शेतकऱ्यांनी बदलाची कास धरावी ​सत्तार यांनी पुढे नमूद केले की, "आजचा शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जाण असलेला 'स्मार्ट' शेतकरी व्हावे लागेल. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळवण्यासाठीही मोबाईल ॲप्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत." ​यावेळी उपस्थित कृषी तज्ज्ञांनी विविध सरकारी आणि खाजगी ॲप्सची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. या कार्यक्रमाला सिल्लोड परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ​
    1
    माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे कार्यक्रमात 
​आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲपचा वापर करा; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
​सिल्लोड: बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीमध्ये मोबाईल ॲप्सचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे आवाहन माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. २४ डिसेंबर रोजी सिल्लोड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
​तंत्रज्ञानामुळे शेती होणार सोपी
​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, हवामानाचा अंदाज, बाजारभाव आणि पिकांवरील रोगराईचे व्यवस्थापन करण्यासाठी सध्या अनेक प्रगत मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास:
​शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील.
​नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होईल.
​बाजारपेठेची माहिती थेट मिळाल्याने आर्थिक फसवणूक टळेल.
​शेतकऱ्यांनी बदलाची कास धरावी
​सत्तार यांनी पुढे नमूद केले की, "आजचा शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जाण असलेला 'स्मार्ट' शेतकरी व्हावे लागेल. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळवण्यासाठीही मोबाईल ॲप्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत."
​यावेळी उपस्थित कृषी तज्ज्ञांनी विविध सरकारी आणि खाजगी ॲप्सची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. या कार्यक्रमाला सिल्लोड परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बांग्लादेश,, मुर्दाबाद
    1
    बांग्लादेश,, मुर्दाबाद
    user_Babulal Rathore
    Babulal Rathore
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Khwaja Sharfuddin Big Message
    1
    Khwaja Sharfuddin Big Message
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    18 hrs ago
  • आजची मेहनत – उद्याचं यश! घरात अभ्यास होत नाहीये? शांत जागा शोधताय? स्पर्धा परीक्षा, बोर्ड परीक्षा व नियमित अभ्यासासाठी आदर्श वातावरण. Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, शिस्तबद्ध आणि अभ्यासाला पूरक वातावरण. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डेस्क, वीज बॅकअप व योग्य प्रकाशव्यवस्था. आजच भेट द्या | सीट मर्यादित आहेत 9372003644
    1
    आजची मेहनत – उद्याचं यश!
घरात अभ्यास होत नाहीये? शांत जागा शोधताय?
स्पर्धा परीक्षा, बोर्ड परीक्षा व नियमित अभ्यासासाठी आदर्श वातावरण.
Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, शिस्तबद्ध आणि अभ्यासाला पूरक वातावरण.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डेस्क, वीज बॅकअप व योग्य प्रकाशव्यवस्था.
आजच भेट द्या | सीट मर्यादित आहेत 9372003644
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    21 hrs ago
  • थेट जनतेतून मत डॉ संतोष तायडे ठरले खामगाव धुरंधर...
    1
    थेट जनतेतून मत डॉ संतोष तायडे ठरले खामगाव धुरंधर...
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.