दुपारच्या वेळी बाहेर निघणे टाळा उन्हाशी खेळ जीवावर भेटू शकतो *दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन* *पाळधी/धरणगाव/प्रतिनिधी (दि. १७ एप्रिल) - जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका गंभीर बनत चालला असून नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी, उन्हाशी खेळ करू नका; सावधगिरीच हा सर्वोत्तम उपाय आहे. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या… उन्हाळा काही दिवसांचा असतो, पण आपला जीव अमूल्य आहे,” असे भावनिक शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना थेट सतर्क राहण्याचे आवाहन केले.* सध्या उन्हाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचत असून दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्यप्रकाश अत्यंत तीव्र असतो. या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी दुपारच्या वेळेत शेतातील कामे टाळावीत, जनावरांसाठी सावली व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच ग्रामपंचायतींनी दवंडी करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे व बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे, हलके व सैल कपडे परिधान करणे तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. शहरी भागातील नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळून कामांचे नियोजन सकाळ किंवा सायंकाळच्या वेळेत करावे. बांधकाम साईट, दुकाने व कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनिवार्य ठेवावी, तसेच रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांनी नियमित विश्रांती घ्यावी, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. उष्माघाताची लक्षणे जसे की डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा जास्त घाम येणे याकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी व आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्यात आले असून आरोग्य विभागाला तातडीच्या सेवांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरी व ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवली जात आहे.
दुपारच्या वेळी बाहेर निघणे टाळा उन्हाशी खेळ जीवावर भेटू शकतो *दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन* *पाळधी/धरणगाव/प्रतिनिधी (दि. १७ एप्रिल) - जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका गंभीर बनत चालला असून नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी, उन्हाशी खेळ करू नका; सावधगिरीच हा सर्वोत्तम उपाय आहे. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या… उन्हाळा काही दिवसांचा असतो, पण आपला जीव अमूल्य आहे,” असे भावनिक शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना थेट सतर्क राहण्याचे आवाहन केले.* सध्या उन्हाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचत असून दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्यप्रकाश अत्यंत तीव्र असतो. या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी दुपारच्या वेळेत शेतातील कामे टाळावीत, जनावरांसाठी सावली व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच ग्रामपंचायतींनी दवंडी करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे व बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे, हलके व सैल कपडे परिधान करणे तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. शहरी भागातील नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळून कामांचे नियोजन सकाळ किंवा सायंकाळच्या वेळेत करावे. बांधकाम साईट, दुकाने व कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनिवार्य ठेवावी, तसेच रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांनी नियमित विश्रांती घ्यावी, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. उष्माघाताची लक्षणे जसे की डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा जास्त घाम येणे याकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी व आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्यात आले असून आरोग्य विभागाला तातडीच्या सेवांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरी व ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवली जात आहे.
- 🗒️ विषय: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी शरद कळस्कर यांना आज मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच अन्य अधिवक्त्यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.1
- "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.1
- Post by Mushraf Tadvi1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!1
- 🎤 वक्ता : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरजी, (मुंबई उच्च न्यायालय) राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद1