जिल्हाधिकारी कार्यालयात २२ कोटी… आता पोलीस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा अपहार “जिल्हाधिकारी कार्यालयात २२ कोटी… आता पोलीस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा अपहार! लातूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय?” लातूर जिल्ह्यात सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराची मालिका थांबायचं नाव घेत नाही. आधी जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल २२ कोटींचा कथित घोटाळा समोर आला आणि आता थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७ रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यांच्यावर कायदा आणि शिस्त राखण्याची जबाबदारी, त्यांच्याच कार्यालयात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मे २०१५ ते मार्च २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत आरोपींनी संगणमत करून वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड केली. Incentive, Basic Arrears, Special Pay आणि इतर वेतन शीर्षकांखाली बनावट नोंदी तयार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जास्तीची रक्कम मंजूर करून त्यातील पैसे स्वतःच्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लिपिक राहुल वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय क्षिरसागर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १६ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता लातूरकरांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत आहे — “जिल्हाधिकारी कार्यालयानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय… उद्या आणखी कोणत्या सरकारी खात्यातून कोट्यवधींचा घोटाळा बाहेर येणार?” सामान्य नागरिक कर भरतो विकासासाठी; पण सरकारी कार्यालयांमध्येच भ्रष्टाचाराची ‘इनसाईड सिस्टीम’ तयार होत असेल, तर जनतेने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? लातूरमध्ये भ्रष्टाचाराचे हे जाळे नेमके किती खोलवर गेले आहे? फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांपुरता हा प्रकार मर्यादित आहे की यामागे आणखी मोठे चेहरे आहेत? दहा वर्षे हा प्रकार सुरू असताना कोणालाच संशय कसा आला नाही? ऑडिट, तपासणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा नेमकी करत काय होती? आता जनतेची मागणी एकच — “फक्त लिपिकांवर कारवाई नको… या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण, हेही बाहेर आले पाहिजे!” लातूर जिल्हा पोलीस दलाने निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले असले तरी, या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे श्री गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर तथा चौकशी अधिकारी यांचे फिर्यादीवरून गुरन १९८/२०२६ कलम३१८(४),३१६(४),३१६(५),३३६(२),३३८,३३६(३),३४०(२),३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये आरोपी नामे लिपिक राहुल गोविंदराव वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय मारुती क्षिरसागर व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय दिगंबर सूर्यवंशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी मे २०१५ ते मार्च २०२५ या कालावधीत संगणमत करून अप्रमाणिकपणे शासनाचे रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड करून, बनावट दस्तऐवज तयार करून व त्याचा गैरवापर करून Incentive, Basic Arrears, Special Pay व इतर वेतन शीर्षकांखाली अनधिकृतरीत्या जास्तीची रक्कम अदा करून व जास्तीचे अदा केलेल्या रकमेतून स्वतः करिता स्वतःचे बँक खात्यावर रक्कम स्वीकारून २ कोटी ३८ लाख ९२ हजार ००७ इतक्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. सदर गुन्ह्यातील 03 आरोपींना तात्काळ अटक करून माननीय न्यायालय समक्ष हजर केले असता सदर आरोपींची माननीय न्यायालयाने दिनांक 16.05.2026 पावेतो तपासकामी पोलिस कोठडी मंजूर केली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निष्पक्ष व पारदर्शक तपास सुरू केला असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री समीरसिंह साळवे ,उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग लातूर शहर हे करीत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात २२ कोटी… आता पोलीस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा अपहार “जिल्हाधिकारी कार्यालयात २२ कोटी… आता पोलीस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा अपहार! लातूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय?” लातूर जिल्ह्यात सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराची मालिका थांबायचं नाव घेत नाही. आधी जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल २२ कोटींचा कथित घोटाळा समोर आला आणि आता थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७ रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यांच्यावर कायदा आणि शिस्त राखण्याची जबाबदारी, त्यांच्याच कार्यालयात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मे २०१५ ते मार्च २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत आरोपींनी संगणमत करून वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड केली. Incentive, Basic Arrears, Special Pay आणि इतर वेतन शीर्षकांखाली बनावट नोंदी तयार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जास्तीची रक्कम मंजूर करून त्यातील पैसे स्वतःच्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लिपिक राहुल वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय क्षिरसागर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १६ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता लातूरकरांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत आहे — “जिल्हाधिकारी कार्यालयानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय… उद्या आणखी कोणत्या सरकारी खात्यातून कोट्यवधींचा घोटाळा बाहेर येणार?” सामान्य नागरिक कर भरतो विकासासाठी; पण सरकारी कार्यालयांमध्येच भ्रष्टाचाराची ‘इनसाईड सिस्टीम’ तयार होत असेल, तर जनतेने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? लातूरमध्ये भ्रष्टाचाराचे हे जाळे नेमके किती खोलवर गेले आहे? फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांपुरता हा प्रकार मर्यादित आहे की यामागे आणखी मोठे चेहरे आहेत? दहा वर्षे हा प्रकार सुरू असताना कोणालाच संशय कसा आला नाही? ऑडिट, तपासणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा नेमकी करत काय होती? आता जनतेची मागणी एकच — “फक्त लिपिकांवर कारवाई नको… या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण, हेही बाहेर आले पाहिजे!” लातूर जिल्हा पोलीस दलाने निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले असले तरी, या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे श्री गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर तथा चौकशी अधिकारी यांचे फिर्यादीवरून गुरन १९८/२०२६ कलम३१८(४),३१६(४),३१६(५),३३६(२),३३८,३३६(३),३४०(२),३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये आरोपी नामे लिपिक राहुल गोविंदराव वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय मारुती क्षिरसागर व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय दिगंबर सूर्यवंशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी मे २०१५ ते मार्च २०२५ या कालावधीत संगणमत करून अप्रमाणिकपणे शासनाचे रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड करून, बनावट दस्तऐवज तयार करून व त्याचा गैरवापर करून Incentive, Basic Arrears, Special Pay व इतर वेतन शीर्षकांखाली अनधिकृतरीत्या जास्तीची रक्कम अदा करून व जास्तीचे अदा केलेल्या रकमेतून स्वतः करिता स्वतःचे बँक खात्यावर रक्कम स्वीकारून २ कोटी ३८ लाख ९२ हजार ००७ इतक्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. सदर गुन्ह्यातील 03 आरोपींना तात्काळ अटक करून माननीय न्यायालय समक्ष हजर केले असता सदर आरोपींची माननीय न्यायालयाने दिनांक 16.05.2026 पावेतो तपासकामी पोलिस कोठडी मंजूर केली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निष्पक्ष व पारदर्शक तपास सुरू केला असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री समीरसिंह साळवे ,उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग लातूर शहर हे करीत आहेत.
- चित्रपट कलावंत सुपरस्टार टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. चित्रपट कलावंत टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 10 मे 2026. तामिळनाडूचा चित्रपट कलावंत सुपरस्टार टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी आज रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना लाखोंच्या जनतेच्या साक्षीने पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- सांगलीत पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळत तीन आरोपींना अटक केली आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या वादामुळे हा कट रचला गेल्याचा संशय असून, आरोपी फेब्रुवारीपासून भोकरेंची रेकी करत होते. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, भोकरेंना तातडीने 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पोलिसांनी अवैध 'जुगाड' वाहतूक आणि जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जुगाड चालकांना अटक करण्यात आली असून, ₹3.45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.1
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- इंडियन बँकेने मुंबईत एका मोठ्या कर्ज वितरण आणि लोकसंपर्क शिबिराचे आयोजन केले. या शिबिरातून हजारो ग्राहकांना त्वरित विविध कर्जे उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे त्यांची आर्थिक गरज भागण्यास मदत झाली.1
- उदगीर मे खेती के विवाद में हुए डबल मर्डर केस में 3 दोषियों को उम्रकैद उदगीर में खेती के विवाद में हुए डबल मर्डर केस में 3 दोषियों को उम्रकैद1
- *चिखलवाडी ते गुरुद्वारा कॉर्नर रस्ता 'नरकयातना'; प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे नागरिक आणि व्यापारी हैराण!* "*आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासन सुस्त; जुना मोंढा बाजारपेठेतील व्यापारावर मोठा परिणाम*" शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड: शहरातील अत्यंत गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना मोंढा भागाला जोडणारा चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा कॉर्नर हा मुख्य रस्ता मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, स्थानिक प्रशासनाच्या 'बघ्याच्या भूमिके'वर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक कोंडी आणि धुळीचे साम्राज्य हा रस्ता शहराचा मुख्य दुवा असल्याने येथे २४ तास वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्ता खोदलेल्या अवस्थेत असल्याने येथे रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. वाहनधारकांना खड्ड्यांतून आणि चिखलातून कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून, पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले जुना मोंढा ही शहराची प्रमुख बाजारपेठ आहे. मात्र, रस्ता खराब असल्यामुळे ग्राहक या भागात येण्यास टाळाटाळ करत आहेत. याचा थेट परिणाम स्थानिक व्यापारी वर्गावर होत असून, व्यवसायात मोठी घट झाली आहे. "अनेकवेळा तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही, आम्ही जगायचे कसे?" असा सवाल येथील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांच्या सूचनेलाही केराची टोपली? या गंभीर प्रश्नावर दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोरकर यांनी देखील मध्यस्थी करून प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. स्थानिक वृत्तपत्रांतून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासकीय अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे "प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करतंय?" अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. नागरिकांची शेवटची विनंती स्थानिक नागरिक आणि व्यापारी संघटनेने प्रशासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली आहे की, पावसाळ्यापूर्वी किंवा लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून सर्वसामान्यांची या त्रासातून मुक्तता करावी. आता या बातमीची दखल घेऊन प्रशासन हालचाल करणार की पुन्हा आश्वासनांची बोळवण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #viralnews #viralpost #viralreelsシ #atulsave #MygovIndia #nandeddiaries #nandedkar #nanded #NWNC #maharashtra1