गोंदिया जिल्ह्यातील ईटखेडा येथे सबला प्रभाग संघाच्या वतीने १२ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी महिलांना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ घेऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. भेंडारकर यांनी महिला बचत गटांना केवळ बचत व कर्ज व्यवहारापुरते मर्यादित न राहता काळाची गरज ओळखून लघु-उद्योग, गृहउद्योग, कृषीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग तसेच सेवा क्षेत्रातील विविध व्यवसायांमध्ये सहभागी होण्यास सांगितले. शासनामार्फत मिळणारे आर्थिक सहाय्य, अनुदान व सुलभ कर्ज सुविधेचा योग्य वापर करून महिलांनी स्वावलंबी उद्योजक बनावे आणि एकत्रितपणे उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी, असे ते म्हणाले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे कुटुंबाच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला सबला महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा आशाताई नाकाडे, गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, पंचायत समिती सदस्य नूतन सोनवाने, भाग्यश्री सयाम, सरपंच आशाताई झीलपे, वडेगावचे सरपंच श्रीकांत लोणारे यांच्यासह कुंदा कुंभरे, कविता शहारे, नालिनीताई भावे, सुष्मा मेश्राम, सारिका लंजे, रेखा शेग्डे, रंजना राऊत, प्रज्ञा मलिक, मोहिनी चुरपार, उज्ज्वला नेवारे, मनीषा टेंम्मुणे, ज्योती शहारे, योगिता भागरकर, आम्रपाली गोंडोणे, निरंजना लाडे आणि परिसरातील विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी, सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गोंदिया जिल्ह्यातील ईटखेडा येथे सबला प्रभाग संघाच्या वतीने १२ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी महिलांना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ घेऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. भेंडारकर यांनी महिला बचत गटांना केवळ बचत व कर्ज व्यवहारापुरते मर्यादित न राहता काळाची गरज ओळखून लघु-उद्योग, गृहउद्योग, कृषीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग तसेच सेवा क्षेत्रातील विविध व्यवसायांमध्ये सहभागी होण्यास सांगितले. शासनामार्फत मिळणारे आर्थिक सहाय्य, अनुदान व सुलभ कर्ज सुविधेचा योग्य वापर करून महिलांनी स्वावलंबी उद्योजक बनावे आणि एकत्रितपणे उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी, असे ते
म्हणाले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे कुटुंबाच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला सबला महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा आशाताई नाकाडे, गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, पंचायत समिती सदस्य नूतन सोनवाने, भाग्यश्री सयाम, सरपंच आशाताई झीलपे, वडेगावचे सरपंच श्रीकांत लोणारे यांच्यासह कुंदा कुंभरे, कविता शहारे, नालिनीताई भावे, सुष्मा मेश्राम, सारिका लंजे, रेखा शेग्डे, रंजना राऊत, प्रज्ञा मलिक, मोहिनी चुरपार, उज्ज्वला नेवारे, मनीषा टेंम्मुणे, ज्योती शहारे, योगिता भागरकर, आम्रपाली गोंडोणे, निरंजना लाडे आणि परिसरातील विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी, सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील करंजेकर कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भव्य युवा संमेलनाला सुरुवात होत आहे. साकोली येथील करंजेकर कॉलेजमध्ये या भव्य युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.1
- आमगाव तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यात वाहून गेलेल्या सुकचंद प्रेमलाल बोपचे यांच्या दुःखद निधनानंतर संकटग्रस्त झालेल्या बोपचे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अत्यंत संवेदनशीलता दाखवत आमदार संजय पुराम यांनी तातडीने दखल घेतली आणि अवघ्या काही दिवसांतच पीडित कुटुंबाला 'राज्य आपत्ती प्रतिसाद निधी' (SDRF) मधून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही आमदार संजय पुराम यांनी या घटनेची माहिती मिळताच मुंबईवरूनच आमगावचे उपविभागीय अधिकारी (SDO) आणि तहसीलदार यांना थेट दूरध्वनी केला होता. मृताच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा विलंब न करता नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. अधिवेशन संपवून मुंबईवरून परतल्यानंतर रविवारी, १२ जुलै रोजी त्यांनी थेट आसोली गाव गाठले आणि मयत सुकचंद बोपचे यांच्या पत्नी शारदा बोपचे व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्या स्वाधीन ४ लाख रुपयांचा धनादेश केला. या संकटकाळात मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी 'सत्य को जानो न्यूज'चे संपादक नरेश बोपचे यांनी सुरुवातीपासूनच प्रशासनाकडे पाठपुरावा करून तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनानेही तत्परतेने कार्यवाही पूर्ण केली. मदत सुपूर्द करण्याच्या या प्रसंगी आमगाव पंचायत समितीच्या सभापती योगिता पुंड, आसोली ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील खोब्रागडे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, स्थानिक तलाठी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या या जलद मदतीमुळे आणि आमदारांच्या संवेदनशील कार्यपद्धतीमुळे बोपचे कुटुंबाला मोठा धीर मिळाला असून परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.1
- भ्रष्टाचाराच्या विरोधात बुलंद आवाज उठवणाऱ्या 'कोहराम न्यूज गोंदिया' या चॅनेलला सबस्क्राईब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युजर्सनी @KohramNewsGondia या लिंकचा वापर करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावे अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबतच, कोणत्याही प्रकारच्या बातम्या आणि जाहिरातींसाठी ९६०७८६०३६९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.1
- भंडारा येथे आयोजित नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी प्रशांत पडोळे यांच्यावर थेट 'नौटंकीबाज' असल्याचा शिक्का मारत त्यांच्यावर सडकून टीका केली. कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो, तेव्हा आम्ही कधीही अशी नौटंकी किंवा नखरेबाजी केली नाही; आम्ही केवळ सरकारवर टीका करायचो. मात्र, हे लोक फक्त नौटंकी करत आहेत. अशा नौटंकीबाज लोकांना जनता पुन्हा निवडून देत नाही. तसेच, हे जेवढ्या स्पीडने निवडून आले आहेत, तेवढ्याच स्पीडने त्यांची जमानत जप्त होणार आहे, अशा शब्दांत त्यांनी खासदार पडोळे यांचा समाचार घेतला.1
- नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुणांना नोकरी शोधण्याऐवजी स्वतः नोकरी देणारे बनण्याचे आवाहन केले आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता इतरांना नोकऱ्या देणारे बनावे, असे त्यांनी म्हटले आहे.1
- देशातील शिक्षण व्यवस्थेत वाढत चाललेला कथित गैरप्रकार, भ्रष्टाचार, आर्थिक वसुली आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे बिगुल वाजवले आहे. "हर कदम पर चोरी, हर तरफ वसूली" अशी तीव्र टीका करत शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या १७ जुलै २०२६ रोजी उत्तराखंडमधील देहरादून येथे 'शिक्षा रिव्होल्यूशन'चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार, अवाजवी शुल्क आकारणी, प्रवेश प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांविरोधात देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अन्यायाशी आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत आयोजकांनी शिक्षण क्षेत्राला अधिक पारदर्शक, जबाबदार आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी देशभरातील विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना या परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.1
- भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील करंजकर कॉलेजमध्ये आज, रविवार दिनांक १२ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. साकोली नगर व साकोली तालुका यांच्या वतीने दुपारी १२ वाजता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, हे संमेलन दुपारी दोन ते चार या वेळेत पार पडणार आहे.3
- नागपूरच्या कलमना परिसरात एका अगरबत्ती कारखान्याला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संपूर्ण अगरबत्ती कारखाना जळून खाक झाला आहे. या भीषण दुर्घटनेत कारखान्याचे लाखोंचे मोठे नुकसान झाले आहे.1