छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातवार; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातवार; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी खुलताबाद-फुलंब्री महामार्गावरील भेग ठरली जीवघेणी; अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स-रिक्षा अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी (१० मे) तीन वेगवेगळ्या भीषण अपघातांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भद्रा मारुती दर्शनासाठी निघालेल्या २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत.. सिमेंटीकरण करण्यात आलेला खुलताबाद-फुलंब्री महामार्ग सध्या धोकादायक बनला असून गदाणा ते सुलतानपूरदरम्यान पाळीचा मळा परिसरात रस्त्याच्या मधोमध मोठी उभी भेग पडली आहे. या भेगेत दुचाकी घसरल्याने निखिल अंबादास पवार (वय १८, रा. चौका, ता. छत्रपती संभाजीनगर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र विश्वंभर गणेश पवार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शेतातून परतताना शेतकऱ्याचा जागीच मृत्यू सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ-चांदापूर रस्त्यावर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास आणखी एक अपघात घडला. शेतातून मोटारसायकलने घरी परतत असताना शुभम बालाजी खेळवणे (वय ३०, रा. मंगरूळ, ता. सिल्लोड) यांचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स बस-रिक्षा अपघात सोयगाव तालुक्यातील अजिंठा घाटात रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि तीनचाकी मालवाहू रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर रिक्षा रस्त्याच्या बाजूच्या डोंगर कपारीवर जाऊन धडकली. या अपघातात तन्वीर रुऊफ शेख (वय २४) आणि अरबाज शकील शेख (वय २७, दोघेही रा. वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातवार; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातवार; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी खुलताबाद-फुलंब्री महामार्गावरील भेग ठरली जीवघेणी; अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स-रिक्षा अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी (१० मे) तीन वेगवेगळ्या भीषण अपघातांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भद्रा मारुती दर्शनासाठी निघालेल्या २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत.. सिमेंटीकरण करण्यात आलेला खुलताबाद-फुलंब्री महामार्ग सध्या धोकादायक बनला असून गदाणा ते सुलतानपूरदरम्यान पाळीचा मळा परिसरात रस्त्याच्या मधोमध मोठी उभी भेग पडली आहे. या भेगेत दुचाकी घसरल्याने निखिल अंबादास पवार (वय १८, रा. चौका, ता. छत्रपती संभाजीनगर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र विश्वंभर गणेश पवार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शेतातून परतताना शेतकऱ्याचा जागीच मृत्यू सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ-चांदापूर रस्त्यावर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास आणखी एक अपघात घडला. शेतातून मोटारसायकलने घरी परतत असताना शुभम बालाजी खेळवणे (वय ३०, रा. मंगरूळ, ता. सिल्लोड) यांचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स बस-रिक्षा अपघात सोयगाव तालुक्यातील अजिंठा घाटात रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि तीनचाकी मालवाहू रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर रिक्षा रस्त्याच्या बाजूच्या डोंगर कपारीवर जाऊन धडकली. या अपघातात तन्वीर रुऊफ शेख (वय २४) आणि अरबाज शकील शेख (वय २७, दोघेही रा. वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.1
- आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र! आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!1
- न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.1
- फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना,1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत 8 ते 10 व्यावसायिक गाळे पूर्णपणे जळून खाक झाले असून, अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.4
- “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप1
- पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप1
- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या बिडकीन बस स्थानकाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. छत नसल्याने उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत, कारण बसही स्थानकात न थांबता बाहेरून जात आहेत.1