logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विदर्भ सिंचन अनुशेष निर्मूलनाचे महर्षी आणि गाढे अभ्यासक, माजी विधान परिषद सदस्य प्रा. बी.टी. देशमुख यांचे दुःखद निधन १९ जून, २०२६ रोजी झाले. त्यांच्या निधनानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ शोकसभा घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्यासह विद्यापीठातील सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसंवेदना व्यक्त करताना कुलगुरू डॉ. बारहाते यांनी प्रा. देशमुख यांच्या ध्येयवादी प्रवासाचे वर्णन केले. एका ध्येयवादी शिक्षकापासून ते सलग ३० वर्षे विधान परिषदेत शिक्षक आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झुंझार लोकप्रतिनिधीपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. सभागृहाचा सर्वोच्च तांत्रिक अभ्यास, कायद्याची अचूक जाण, आकडेवारीचा सखोल व्यासंग आणि संयत मांडणी यामुळे त्यांनी विधिमंडळात स्वतःचा एक वेगळाच दरारा निर्माण केला होता. त्यांना 'सभागृहाचा चालता-बोलता नियमसंग्रह' म्हणून ओळखले जात असे. अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. प्रा. बी.टी. देशमुख यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला होता आणि गरिबी व संघर्षातून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. ते पदवीधर आमदार असले तरी त्यांचे कार्य केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. विदर्भावर होणाऱ्या आर्थिक आणि प्रादेशिक अन्यायाची त्यांना तीव्र जाणीव होती. दांडेकर समिती आणि केळकर समितीच्या अहवालांचा सखोल अभ्यास करून त्यांनी विदर्भाच्या सिंचनाचा आणि विकासकामांचा हजारो कोटी रुपयांचा अनुशेष राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला. अमरावती शहरासह शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, तसेच पेढी धरणासाठीही त्यांनी आग्रह धरला होता. त्यांच्या अभ्यासू मांडणीमुळे सरकारला अनेकदा विदर्भासाठी विशेष निधीची घोषणा करावी लागली होती. कुलगुरूंनी पुढे सांगितले की, ३० वर्षे आमदारकी भूषवूनही त्यांच्या राहणीमानात कधीही बदल झाला नाही; अमरावतीतील त्यांचे घर आणि राहणीमान अत्यंत साधे होते. आपल्या आमदार निधीचा प्रत्येक रुपया कुठे आणि कसा खर्च झाला, याचा हिशोब ते दरवर्षी पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडायचे, असे पारदर्शक लोकप्रतिनिधी आज दुर्मिळ झाले आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासाच्या जडणघडणीतही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांवर कार्य करून त्यांनी विद्यापीठाची ध्येयधोरणे ठरविण्यात मोलाचे मार्गदर्शन केले आहे. प्रा. बी.टी. देशमुख यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी सामूहिक प्रार्थना करून विद्यापीठातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळले.

9 hrs ago
user_Amravati News Update
Amravati News Update
Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
9 hrs ago
d4e87e6b-e4c3-4091-af9a-e683d05149b7

विदर्भ सिंचन अनुशेष निर्मूलनाचे महर्षी आणि गाढे अभ्यासक, माजी विधान परिषद सदस्य प्रा. बी.टी. देशमुख यांचे दुःखद निधन १९ जून, २०२६ रोजी झाले. त्यांच्या निधनानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ शोकसभा घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्यासह विद्यापीठातील सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसंवेदना व्यक्त करताना कुलगुरू डॉ. बारहाते यांनी प्रा. देशमुख यांच्या ध्येयवादी प्रवासाचे वर्णन केले. एका ध्येयवादी शिक्षकापासून ते सलग ३० वर्षे विधान परिषदेत शिक्षक आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झुंझार लोकप्रतिनिधीपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. सभागृहाचा सर्वोच्च तांत्रिक अभ्यास, कायद्याची अचूक जाण, आकडेवारीचा सखोल व्यासंग आणि संयत मांडणी यामुळे त्यांनी विधिमंडळात स्वतःचा एक वेगळाच दरारा निर्माण केला होता. त्यांना 'सभागृहाचा चालता-बोलता नियमसंग्रह' म्हणून ओळखले जात असे. अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. प्रा. बी.टी. देशमुख यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला होता आणि गरिबी व संघर्षातून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. ते पदवीधर आमदार असले तरी त्यांचे कार्य केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. विदर्भावर होणाऱ्या आर्थिक आणि प्रादेशिक अन्यायाची त्यांना तीव्र जाणीव होती. दांडेकर समिती आणि केळकर समितीच्या अहवालांचा सखोल अभ्यास करून त्यांनी विदर्भाच्या सिंचनाचा आणि विकासकामांचा हजारो कोटी रुपयांचा अनुशेष राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला. अमरावती शहरासह शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, तसेच पेढी धरणासाठीही त्यांनी आग्रह धरला होता. त्यांच्या अभ्यासू मांडणीमुळे सरकारला अनेकदा विदर्भासाठी विशेष निधीची घोषणा करावी लागली होती. कुलगुरूंनी पुढे सांगितले की, ३० वर्षे आमदारकी भूषवूनही त्यांच्या राहणीमानात कधीही बदल झाला नाही; अमरावतीतील त्यांचे घर आणि राहणीमान अत्यंत साधे होते. आपल्या आमदार निधीचा प्रत्येक रुपया कुठे आणि कसा खर्च झाला, याचा हिशोब ते दरवर्षी पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडायचे, असे पारदर्शक लोकप्रतिनिधी आज दुर्मिळ झाले आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासाच्या जडणघडणीतही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांवर कार्य करून त्यांनी विद्यापीठाची ध्येयधोरणे ठरविण्यात मोलाचे मार्गदर्शन केले आहे. प्रा. बी.टी. देशमुख यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी सामूहिक प्रार्थना करून विद्यापीठातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत, गोल्डन किड्स हायस्कूल आणि अग्रेशन पेट्रोल पंप या दोन आस्थापनांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
    1
    महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत, गोल्डन किड्स हायस्कूल आणि अग्रेशन पेट्रोल पंप या दोन आस्थापनांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    1
    आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वनोजा बाग येथे नाथ जोगी कुटुंबावर समाजाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना घडली आहे. कुटुंब बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरावर जेसीबी फिरवून ती साहित्यासहित जमीनदोस्त करण्यात आली. भटक्या विमुक्त समाजातील या गरीब कुटुंबाची घरे पाडल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. आता पावसाळ्यात या गरीब कुटुंबासमोर निवाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    वनोजा बाग येथे नाथ जोगी कुटुंबावर समाजाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना घडली आहे. कुटुंब बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरावर जेसीबी फिरवून ती साहित्यासहित जमीनदोस्त करण्यात आली.

भटक्या विमुक्त समाजातील या गरीब कुटुंबाची घरे पाडल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. आता पावसाळ्यात या गरीब कुटुंबासमोर निवाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_Nagesh Jadhav
    Nagesh Jadhav
    अंजनगाव सुर्जी, अमरावती, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत. या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.
    2
    २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत.

या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    1
    अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    1
    पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Ambulance service अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.
    1
    महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.
    user_Irfan Shaikh
    Irfan Shaikh
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.