महिला सरसावल्या "एक सही लोकशाहीसाठी" मनपा स्वीप समितीचा "माझी सही- माझी लोकशाही" उपक्रम अहिल्यानगर, दि. १२ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी १०० टक्के मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदानाची टक्केवारी वाढून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मनपा स्वीप समितीच्या वतीने स्वीपनगरीमध्ये "एक सही लोकशाहीसाठी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज शेकडो महिलांनी स्वाक्षरी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महानगरपालिकेत कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांसाठी व नागरिकांसाठी प्रवेशद्वाराजवळच "माझी सही- माझी लोकशाही" या उपक्रमाचा विशेष फलक लावण्यात आला आहे. मार्कर पेनच्या माध्यमातून या फलकावर स्वाक्षरी करून नागरिकांना मतदान करण्याचा संकल्प करावयाचा आहे. या उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या फलकावर, "मला माहीत आहे की १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणुकीचे मतदान आहे. या दिवशी मी माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या अहिल्यानगरसाठी व माझ्या लोकशाहीसाठी मतदान करणारच; तसेच इतरांना देखील सांगणार. माझ्या सक्षम लोकशाहीसाठी ही माझी सही. माझं तर ठरलंय! तुमचं?" असा आशय लिहिला आहे. स्वीपनगरी पाहण्यासाठी व सही करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मनपात यावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त अशोक साबळे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, सहायक आयुक्त सपना वसावा व मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आणि प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे. #माझीसहीमाझीलोकशाही #एकसहीलोकशाहीसाठी #माझंरठरलंय #१५जानेवारीमतदान #अहिल्यानगरमतदान२०२६ #महिलाशक्ती #लोकशाहीचाजागर #अहिल्यानगरमनपा #मीमतदानकरणार #मतदानसंकल्प #स्त्रीशक्तीचाहुंकार #लोकशाहीचाउत्सव #AhilyanagarVotes #OneSignatureForDemocracy #WomenPower #VoteForNation #SVEEP_Ahilyanagar #DemocracyFestival2026
महिला सरसावल्या "एक सही लोकशाहीसाठी" मनपा स्वीप समितीचा "माझी सही- माझी लोकशाही" उपक्रम अहिल्यानगर, दि. १२ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी १०० टक्के मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदानाची टक्केवारी वाढून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मनपा स्वीप समितीच्या वतीने स्वीपनगरीमध्ये "एक सही लोकशाहीसाठी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज शेकडो महिलांनी स्वाक्षरी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महानगरपालिकेत कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांसाठी व नागरिकांसाठी प्रवेशद्वाराजवळच "माझी सही- माझी लोकशाही" या उपक्रमाचा विशेष फलक लावण्यात आला आहे. मार्कर पेनच्या माध्यमातून या फलकावर स्वाक्षरी करून नागरिकांना मतदान करण्याचा संकल्प करावयाचा आहे. या उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या फलकावर, "मला माहीत आहे की १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणुकीचे मतदान आहे. या दिवशी मी माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या अहिल्यानगरसाठी व माझ्या लोकशाहीसाठी मतदान करणारच; तसेच इतरांना देखील सांगणार. माझ्या सक्षम लोकशाहीसाठी ही माझी सही. माझं तर ठरलंय! तुमचं?" असा आशय लिहिला आहे. स्वीपनगरी पाहण्यासाठी व सही करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मनपात यावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त अशोक साबळे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, सहायक आयुक्त सपना वसावा व मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आणि प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे. #माझीसहीमाझीलोकशाही #एकसहीलोकशाहीसाठी #माझंरठरलंय #१५जानेवारीमतदान #अहिल्यानगरमतदान२०२६ #महिलाशक्ती #लोकशाहीचाजागर #अहिल्यानगरमनपा #मीमतदानकरणार #मतदानसंकल्प #स्त्रीशक्तीचाहुंकार #लोकशाहीचाउत्सव #AhilyanagarVotes #OneSignatureForDemocracy #WomenPower #VoteForNation #SVEEP_Ahilyanagar #DemocracyFestival2026
- बीड जिल्हा...1
- गतिरोधक की डिव्हायडर... प्रवासी वर्गात संभ्रम ! शेवगाव–नेवासा रस्त्यावरील अर्धवट गतिरोधक प्रवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची प्रवासी वर्गाची मागणी.... शेवगाव दि १२ शेवगाव–नेवासा रोडवरील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावर शेवगाव बांधकाम विभागाच्या वतीने अलीकडेच एक गतिरोधक उभारण्यात आले.. आहे. मात्र हे गतिरोधक नेमके गतिरोधक आहे की डिव्हायडर याबाबत वाहनचालक व सामान्य प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदरच शिक्षण संस्थेचे प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असतांना हि गतिरोधकाची अडचण निर्माण झाल्याने हे गतिरोधक विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आहे, हे मात्र विद्यार्थ्यांना ही समजेना ? सदर संरचनेला गतिरोधक म्हणावे, तर तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले फलक, रिफ्लेक्टर, रंगसंगती अथवा सूचक चिन्हे कुठेही लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, येणारी-जाणारी वाहने थेट या अडथळ्यावर आदळत असून, वाहनचालक व प्रवाशांना कंबर, मणके व हाडांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. सामान्यतः शाळा-महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हा असतो. मात्र येथे गतिरोधक उभारल्यानंतरही वाहनचालक या अडथळ्यावरून न जाता शाळेच्या गेटलगतच्या मोकळ्या जागेतून वाहने नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे ही रचना गतिरोधक आहे की डिव्हायडर, याबाबत प्रवाशांना अजूनही स्पष्टता नाही. या तथाकथित गतिरोधकाच्या अयोग्य व अर्धवट रचनेमुळे बांधकाम विभागातील अभियंते, उपअभियंते व रस्त्यावर काम करणाऱ्या पर्यवेक्षकांची कारागिरी जनतेसमोर उघडी पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वर्गातून या गतिरोधकाला तातडीने तांत्रिकदृष्ट्या योग्य स्वरूप देण्यात यावे, आवश्यक ते फलक, रंग व रिफ्लेक्टर लावून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्भरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर या अडथळ्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.2
- गलास या बोतल में पानी डालते समय गिरना आम समस्या है, लेकिन इसके पीछे साफ़ विज्ञान काम करता है। सही एंगल पर बर्तन झुकाने और ग्लास को पास रखने से हवा का गैप कम होता है, जिससे पानी की धार नियंत्रित रहती है। सतह तनाव और फ्लो रेट संतुलित होने पर पानी साफ़ तरीके से गिरता है। यह छोटा सा तरीका रोज़मर्रा की गंदगी से बचा सकता है। #ScienceHack #PhysicsTrick #LifeHacks #EverydayScience #FluidDynamics #SmartTips1
- राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे1
- Post by Riyazisaksayyed1
- Post by YUVA JALNA NEWS1
- राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक1
- Post by Riyazisaksayyed1