⚫*साताऱ्याच्या विकासाला विरोध का? नागरिकांनी आता योग्य भूमिका घ्यावी*⚫ ⚫*साताऱ्याच्या विकासाला विरोध का? नागरिकांनी आता योग्य भूमिका घ्यावी*⚫ सातारा शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध व्हावं अशी अपेक्षा प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे. मात्र काही लोकांना घाण, अतिक्रमण आणि अव्यवस्था हाच “फायदेशीर व्यवसाय” वाटत असल्याचं दुर्दैवी वास्तव आज समोर येत आहे. रस्त्यांवर फेरीवाले बसवणे, नो-व्हेंडर झोनमध्येही बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवणे, वाहतुकीला अडथळे निर्माण करणे, सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणे – या सगळ्या गोष्टी केवळ निष्काळजीपणामुळे होत नाहीत, तर यामागे काहींचा स्वार्थ दडलेला आहे. विकासासाठी आवाज उठवला की काही लोक विरोध का करतात? कारण या अतिक्रमणांमधून त्यांचे “तोडपाणी” सुरू असते, ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. काही भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक, काही शासकीय अधिकारी, काही ठिकाणी पोलीस प्रशासनातील घटक, तसेच प्रभागातील काही नगरसेवक – हे सर्व मिळून बेकायदेशीर फेरीवाले व अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालतात. कारण त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळतो. नियम तोडणाऱ्यांना संरक्षण देऊन स्वतःची “दोन नंबरची कमाई” सुरू ठेवणे, हा प्रकार अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. जर अतिक्रमण थांबले, बेकायदेशीर व्यवसाय बंद झाले, तर या लोकांचे पोट कशावर चालणार? हा त्यांचा खरा प्रश्न आहे – शहराचा विकास नव्हे! त्यामुळेच ते विकासाला विरोध करतात, जनतेला दिशाभूल करतात आणि चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतात. स्पष्टीकरण: हा आरोप कोणत्याही प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी किंवा जनप्रतिनिधींवर नाही. जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांचा आम्ही आदर करतो. मात्र जे लोक बेकायदेशीर अतिक्रमणांना पाठिंबा देतात, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची भूमिका आहे. शहराच्या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या अशा प्रवृत्तींचा पर्दाफाश करणे आणि त्यांना थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. पण हे स्पष्ट ऐकून घ्या – अशा स्वार्थी आणि चुकीच्या प्रवृत्तीसमोर आम्ही झुकणार नाही. साताऱ्याचा विकास हा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नाही. शहर स्वच्छ, नियोजनबद्ध आणि अतिक्रमणमुक्त करणे हे आमचं ध्येय आहे आणि ते पूर्ण होणारच. साताऱ्याचा विकास होणारच… आणि तो सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे! सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका, महालक्ष्मी आधार फाउंडेशन #सातारा_विकास #अतिक्रमणमुक्त_सातारा #स्वच्छ_सातारा #जागरूक_नागरिक #SataraDevelopment #CleanSatara #NoEncroachment #PublicAwareness #VoiceForChange #satarapolice #सातरापोलिस #सातारानगरपरिषद #सातारकर #राजधानीसातारा
⚫*साताऱ्याच्या विकासाला विरोध का? नागरिकांनी आता योग्य भूमिका घ्यावी*⚫ ⚫*साताऱ्याच्या विकासाला विरोध का? नागरिकांनी आता योग्य भूमिका घ्यावी*⚫ सातारा शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध व्हावं अशी अपेक्षा प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे. मात्र काही लोकांना घाण, अतिक्रमण आणि अव्यवस्था हाच “फायदेशीर व्यवसाय” वाटत असल्याचं दुर्दैवी वास्तव आज समोर येत आहे. रस्त्यांवर फेरीवाले बसवणे, नो-व्हेंडर झोनमध्येही बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवणे, वाहतुकीला अडथळे निर्माण करणे, सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणे – या सगळ्या गोष्टी केवळ निष्काळजीपणामुळे होत नाहीत, तर यामागे काहींचा स्वार्थ दडलेला आहे. विकासासाठी आवाज उठवला की काही लोक विरोध का करतात? कारण या अतिक्रमणांमधून त्यांचे “तोडपाणी” सुरू असते, ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. काही भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक, काही शासकीय अधिकारी, काही ठिकाणी पोलीस प्रशासनातील घटक, तसेच प्रभागातील काही नगरसेवक – हे सर्व मिळून बेकायदेशीर फेरीवाले व अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालतात. कारण त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळतो. नियम तोडणाऱ्यांना संरक्षण देऊन स्वतःची “दोन नंबरची कमाई” सुरू ठेवणे, हा प्रकार अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. जर अतिक्रमण थांबले, बेकायदेशीर व्यवसाय बंद झाले, तर या लोकांचे पोट कशावर चालणार? हा त्यांचा खरा प्रश्न आहे – शहराचा विकास नव्हे! त्यामुळेच ते विकासाला विरोध करतात, जनतेला दिशाभूल करतात आणि चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतात. स्पष्टीकरण: हा आरोप कोणत्याही प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी किंवा जनप्रतिनिधींवर नाही. जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांचा आम्ही आदर करतो. मात्र जे लोक बेकायदेशीर अतिक्रमणांना पाठिंबा देतात, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची भूमिका आहे. शहराच्या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या अशा प्रवृत्तींचा पर्दाफाश करणे आणि त्यांना थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. पण हे स्पष्ट ऐकून घ्या – अशा स्वार्थी आणि चुकीच्या प्रवृत्तीसमोर आम्ही झुकणार नाही. साताऱ्याचा विकास हा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नाही. शहर स्वच्छ, नियोजनबद्ध आणि अतिक्रमणमुक्त करणे हे आमचं ध्येय आहे आणि ते पूर्ण होणारच. साताऱ्याचा विकास होणारच… आणि तो सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे! सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका, महालक्ष्मी आधार फाउंडेशन #सातारा_विकास #अतिक्रमणमुक्त_सातारा #स्वच्छ_सातारा #जागरूक_नागरिक #SataraDevelopment #CleanSatara #NoEncroachment #PublicAwareness #VoiceForChange #satarapolice #सातरापोलिस #सातारानगरपरिषद #सातारकर #राजधानीसातारा
- सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.1
- ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रम शिंदे /भोर दि.16 नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील भोर येथील रांजे येथे दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.2
- आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी आशीर्वाद दिला आणि मी कायम राहुल तुझ्यासोबत आहे हे शब्द साहेबांचे ऊर्जा देतात एवढ्या व्यस्त वेळेतून राहुलला भेटायचे हे साहेबांच्या लक्षात राहतं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या पोलिसांची मदत करेल आणि प्रामाणिक काम करेल तुमची साथ आणि आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर राहू द्या ही विनंती महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्या परिवाराला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य1
- बारामती विधानसभा पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घेतल्या1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge1
- कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.3
- पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.1
- विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏1