कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील मल्हार नगर संकुल येथे कचरा संकलनाचे काम करत असताना महापालिकेच्या घंटागाडीचा कचरा उचलणाऱ्या एका सफाई कामगाराच्या पायावर अचानक कचऱ्याचा जड डबा पडला. या घटनेत कामगार जखमी झाल्याने महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित कामगार नेहमीप्रमाणेच कचरा संकलनाचे काम करत होता, तेव्हा हा अपघात घडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. घटनेनंतर त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी मदत केली. सफाई कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, कचरा उचलणे आणि त्याची वाहतूक करणे यांसारखी धोकादायक कामे करताना त्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य, जसे की हातमोजे, सुरक्षा बूट आणि अन्य संरक्षणात्मक साधने पुरेशा प्रमाणात दिली जात नाहीत, ज्यामुळे अशा अपघातांचा धोका नेहमीच कायम असतो. या पार्श्वभूमीवर, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांना न केलेल्या कामाचे ठराविक पत्रकारांकडून स्वतःची पाठ थोपटवण्यामधून वेळ मिळत नाही, तर उपायुक्त घनकचरा यांना त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांची काहीही सोयरेसूचक नसते. या घटनेनंतर जखमी कामगाराला योग्य वैद्यकीय मदत, नुकसानभरपाई तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि कामगार करत आहेत.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील मल्हार नगर संकुल येथे कचरा संकलनाचे काम करत असताना महापालिकेच्या घंटागाडीचा कचरा उचलणाऱ्या एका सफाई कामगाराच्या पायावर अचानक कचऱ्याचा जड डबा पडला. या घटनेत कामगार जखमी झाल्याने महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित कामगार नेहमीप्रमाणेच कचरा संकलनाचे काम करत होता, तेव्हा हा अपघात घडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. घटनेनंतर त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी मदत केली. सफाई कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, कचरा उचलणे आणि त्याची वाहतूक करणे यांसारखी धोकादायक कामे करताना त्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य, जसे की हातमोजे, सुरक्षा बूट आणि अन्य संरक्षणात्मक साधने पुरेशा प्रमाणात दिली जात नाहीत, ज्यामुळे अशा अपघातांचा धोका नेहमीच कायम असतो. या पार्श्वभूमीवर, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांना न केलेल्या कामाचे ठराविक पत्रकारांकडून स्वतःची पाठ थोपटवण्यामधून वेळ मिळत नाही, तर उपायुक्त घनकचरा यांना त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांची काहीही सोयरेसूचक नसते. या घटनेनंतर जखमी कामगाराला योग्य वैद्यकीय मदत, नुकसानभरपाई तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि कामगार करत आहेत.
- या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.2
- उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.1
- मुंब्रा-कौसाच्या विकासासंदर्भात अशरफ शानू पठान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान, ठाणे, मुंब्रा आणि कौसा शहरांसाठी ५० MLD अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, विविध विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली.1
- ठाणे महानगरपालिकेचे (ठा.म.पा) विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मुंब्रा शहरासाठी 50 MLD पाणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (DCM) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.1
- सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.1
- ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.1
- सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.1