Shuru
Apke Nagar Ki App…
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगर पंचायत, रायपूर ग्रामपंचायत आणि वानाडोंगरी नगर परिषद परिसरात झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर घरांवरील टिनपत्रे उडून गेली. तसेच, वीज तारा तुटल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगर पंचायत, रायपूर ग्रामपंचायत आणि वानाडोंगरी नगर परिषद परिसरात झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर घरांवरील टिनपत्रे उडून गेली. तसेच, वीज तारा तुटल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- काकडे बिल्डरने शेतमालाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणात, सदर जमिनीवर लागू असलेला ‘स्टे ऑर्डर’ बिल्डरने हेतुपुरस्सर लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे.1
- यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव ते गुंज हा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत दुरवस्थेत आहे. या मार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाले असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर असलेल्या सावना गावात शाळा, महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिक आणि रुग्णांना याच खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करावी लागते, ज्यामुळे त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर स्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.1
- मान्सूनची वाटचाल सध्या संथ गतीने सुरू आहे. यामुळे पेरणीच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग येण्याची शक्यता २५ जूननंतरच वर्तवण्यात येत आहे.1
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर विद्यार्थ्यांच्या अनेक अपेक्षांवर पाणी फेरल्याचा गंभीर आरोप करत, 'छात्रों की गूंज – कोटा महारॅली' मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, देशातील प्रत्येक तरुणाला चांगले शिक्षण, उज्ज्वल भविष्य आणि यशस्वी आयुष्याचे स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असताना, गेल्या १२ वर्षांत विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या अनेक अपेक्षांवर पाणी फेरले गेले असल्याची टीका त्यांनी केली. विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उद्देशून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार गेल्या बारा वर्षांपासून युवकांची स्वप्ने मोडणारी यंत्रणा बनली आहे. पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, वाढती बेरोजगारी, शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय यांसारख्या समस्यांमुळे युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी लढत राहील असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार, अन्याय आणि युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या धोरणांविरोधात काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. राहुल गांधींनी नमूद केले की, 'छात्रों की गूंज' ही केवळ एक महारॅली नसून युवकांच्या हक्कांची लढाई आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांचा आवाज अधिक बुलंद करणे आणि देशभरात परिवर्तनाची चळवळ उभारणे हा आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या महारॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिक्षण व्यवस्था, रोजगाराच्या संधी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि युवकांच्या भविष्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी देशभरातील युवकांना या अभियानात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावर जनआंदोलन उभे राहील.1
- नागपूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजयभैय्या सोनवणे यांची थेट मुलाखत घेण्यात आली आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नगरपंचायत पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे ओसाड पडली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन कामकाजात दिरंगाई दिसून येत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गेल्या चार दिवसांपासून उज्जैन, ओमकारेश्वर आणि इंदूर येथे पर्यटनासाठी गेले आहेत. हे नगरसेवक येत्या एक-दोन दिवसांत पेच येथे परतणार असले तरी, त्यांच्या अनुपस्थितीमुळे शहरातील साफसफाई आणि अन्य समस्या सोडवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीत, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांनी पुढाकार घेत एकतर्फी मोर्चा सांभाळला आहे. ते स्वतः बस स्थानक परिसरात साफसफाई करत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः, सलग दोन दिवसांच्या पावसामुळे सिद्धार्थ नगर परिसरात नाल्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय विविध साफसफाईची कामे, प्रभागातील विद्युत दिवे आणि ऐन पावसाळ्यात गटारांची स्वच्छता न झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत, इतर नगरसेवक पर्यटनाला गेले असताना, उपाध्यक्ष पंजलवार यांनी भिवापूरमध्ये राहून एकटेच 'किल्ला लढवत' समस्यांचे निराकरण करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, १८ जून रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेत होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अतुल लोंढे रिंगणात आहेत. भिवापूर नगरपंचायतमध्ये स्वीकृत सदस्यांसह एकूण २० मते आहेत. सध्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक किरण नागरीकर, शोभा जांभुळे, नंदु पाचभाई आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे कैलास कोमरेल्लीवार हे भिवापूरमध्ये उपस्थित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.1
- इरफानने भाविकांचे प्राण वाचवून मानवतेचे एक मोठे उदाहरण सादर केले आहे, ज्यातून धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ असल्याचा संदेश मिळतो.1
- भिवापूर-नागपूर मार्गावरील कारगाव रेल्वे क्रासिंगजवळ महारेलच्या कामाचा 'ठिम्मपणा' समोर आला असून, यामुळे चारचाकी वाहने बंद पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या मार्गावर रेल्वेचे काम बंद असल्याने मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे रहदारीस कमालीचा त्रास होत आहे आणि वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारगाव रेल्वे क्रासिंगजवळ रेल्वेच्या पुलाचे काम तांत्रिक कारणामुळे अर्धवट थांबले आहे, जे महारेलच्या वतीने केले जात आहे. एका बाजूचा येण्याचा मार्ग काही प्रमाणात तयार असला तरी, दुसऱ्या बाजूचे काम रखडले असून तिथे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्या ट्रॉव्हल्सच्या मागील भागाला मोठा धक्का बसत असून, दररोज ट्रॉव्हल्स व इतर वाहने बंद पडत आहेत, ज्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. नजीकच्या काळात पावसाळा सुरू होणार असल्याने, ट्रॉव्हल्स मालकांनी तातडीने खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.1