कोल्हापूरच्या ऐतिहासिक 'विल्सन पुला'चा दिमाखदार शताब्दी सोहळा संपन्न; १०० वर्षांच्या सेवेबद्दल कोल्हापूरकरांकडून कृतज्ञता व्यक्त कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि छत्रपती राजाराम महाराजांची दूरदृष्टी यांचा संगम असलेल्या, लक्ष्मीपुरी येथील ऐतिहासिक 'विल्सन पुला'ने आज आपल्या सेवेची १०० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून कोल्हापूरमधील विविध संस्था आणि इतिहासप्रेमींच्या वतीने पुलाचा 'शताब्दी वाढदिवस' मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञता भावनेने साजरा करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ठीक ५:०० वाजता विल्सन पुलावर या सोहळ्याला सुरुवात झाली. हिल रायडर्स एडव्हेंचर फाउंडेशन, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधिनी आणि समिट एडव्हेंचर या संस्थांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शिवसेनेचे विजय देवणे, उदय गायकवाड, प्रमोद पाटील, अमरजा निबांळकर, उमाकांत रानिंगा, अजय दळवी, मनजित माने, चंदन मिरजकर, आसिफ मोकाशी, प्रशांत हडकर, सागर बगाडे, अजित अकोळकर आदी इतिहासप्रेमी मंडळी उपस्थित होती. सोहळ्याच्या प्रारंभी पुलाचे विधिवत पूजन करण्यात आले. फुलांच्या माळा आणि आकर्षक रोषणाईने सजलेला हा पूल जणू आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत होता. यावेळी बोलताना उदय गायकवाड यांनी विल्सन पुलाच्या बांधकामामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या दळणवळणाला गती देण्यासाठी आणि शहराच्या विस्तारासाठी हा पूल उभारला होता. ब्रिटनमधील स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आणि कोल्हापूरचा रांगडेपणा यांचा हा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी आपल्या भाषणात पुलाच्या मजबुतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, विल्सन पूल हा केवळ दगड-मातीचा सांधा नसून तो कोल्हापूरच्या प्रगतीचा वाहक आहे. १०० वर्षे उलटूनही हा पूल आजही तितक्याच मजबुतीने उभा आहे, हे आपल्या पूर्वजांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे यश आहे. तर विजय देवणे यांनी कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जतन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. केवळ उत्सव साजरा न करता, या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आणि तिचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी यावेळी ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याचा आणि त्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा सामूहिक संकल्प केला. हिल रायर्ड्स, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधनी, समिट एडव्हेंचर व इतिहासप्रेमींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पाडला. सायंकाळच्या वेळी पुलाच्या रोषणाईने कोल्हापूरचा वारसा पुन्हा एकदा उजळून निघाला होता. कार्यक्रमाचे आभार मनजीत माने यांनी मानले
कोल्हापूरच्या ऐतिहासिक 'विल्सन पुला'चा दिमाखदार शताब्दी सोहळा संपन्न; १०० वर्षांच्या सेवेबद्दल कोल्हापूरकरांकडून कृतज्ञता व्यक्त कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि छत्रपती राजाराम महाराजांची दूरदृष्टी यांचा संगम असलेल्या, लक्ष्मीपुरी येथील ऐतिहासिक 'विल्सन पुला'ने आज आपल्या सेवेची १०० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून कोल्हापूरमधील विविध संस्था आणि इतिहासप्रेमींच्या वतीने पुलाचा 'शताब्दी वाढदिवस' मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञता भावनेने साजरा करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ठीक ५:०० वाजता विल्सन पुलावर या सोहळ्याला सुरुवात झाली. हिल रायडर्स एडव्हेंचर फाउंडेशन, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधिनी आणि समिट एडव्हेंचर या संस्थांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शिवसेनेचे विजय देवणे, उदय गायकवाड, प्रमोद पाटील, अमरजा निबांळकर, उमाकांत रानिंगा, अजय दळवी, मनजित माने, चंदन मिरजकर, आसिफ मोकाशी, प्रशांत हडकर, सागर बगाडे, अजित अकोळकर आदी इतिहासप्रेमी मंडळी उपस्थित होती. सोहळ्याच्या प्रारंभी पुलाचे विधिवत पूजन करण्यात आले. फुलांच्या माळा आणि आकर्षक रोषणाईने सजलेला हा पूल जणू आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत होता. यावेळी बोलताना उदय गायकवाड यांनी विल्सन पुलाच्या बांधकामामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या दळणवळणाला गती देण्यासाठी आणि शहराच्या विस्तारासाठी हा पूल उभारला होता. ब्रिटनमधील स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आणि कोल्हापूरचा रांगडेपणा यांचा हा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी आपल्या भाषणात पुलाच्या मजबुतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, विल्सन पूल हा केवळ दगड-मातीचा सांधा नसून तो कोल्हापूरच्या प्रगतीचा वाहक आहे. १०० वर्षे उलटूनही हा पूल आजही तितक्याच मजबुतीने उभा आहे, हे आपल्या पूर्वजांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे यश आहे. तर विजय देवणे यांनी कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जतन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. केवळ उत्सव साजरा न करता, या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आणि तिचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी यावेळी ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याचा आणि त्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा सामूहिक संकल्प केला. हिल रायर्ड्स, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधनी, समिट एडव्हेंचर व इतिहासप्रेमींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पाडला. सायंकाळच्या वेळी पुलाच्या रोषणाईने कोल्हापूरचा वारसा पुन्हा एकदा उजळून निघाला होता. कार्यक्रमाचे आभार मनजीत माने यांनी मानले
- कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला. दर्शनासोबतच जनसंवाद आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.1
- Post by Madan petkar1
- कोल्हापूर : रविराज कांबळे आरक्षणाची जनभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या होतात. अशा या पवित्र भूमीत असल्याचा अभिमान व्यक्त करत Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळेच आपल्या खांद्यावरचे स्टार आहेत, असे मनोगत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. विश्वरत्न बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात अभिवादनासाठी उपस्थित राहून त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला.2
- Post by E city news network1
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य : डॉ.प्रविण दबडघाव विक्रम शिंदे /भोर दि.१४ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प.महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडघाव यांनी केले.कापूरहोळ येथील विराट हिंदू मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रवीण दबडघाव बोलत होते. यावेळी मेळाव्याला कापूरहोळ, हरिश्चंद्री ,दिवळे ,केतकावळे, कुंभोशी ,चिव्हेवाडी, खडकी कामथडी , उंबरे या गावातून हिंदू राम भक्त उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सुरू असलेल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी बालांनी रामरक्षा गणपती स्तोत्र मनाचे श्लोक सर्वांसमोर सादर केले जानुबाई ढोल लेझीम पथक कामथडी या गावाने ढोल लेझीमच्या वाद्य पथकाने नेत्रदीपक खेळ सादर करत लक्ष वेधून घेतले.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत असतानाच, आता ऐतिहासिक पंचगंगा घाट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रंकाळा आणि के.एम.बी.पी. पार्क येथील कारवाईनंतर महापालिकेने आपला मोर्चा पंचगंगा घाटाकडे वळवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सध्या घाट परिसरात अनधिकृत दुकाने, गाळे आणि खाऊ गल्ली मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहे. यामुळे घाटाचे ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्य लोप पावत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नदी प्रदूषणमुक्तीचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात घाटावर वाढलेली खाऊ गल्ली आणि पूजेच्या साहित्यांच्या स्टॉल्समुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. गणेशोत्सव आणि जोतिबा यात्रेच्या काळात येथे मोठी गर्दी असते, अशा वेळी या अतिक्रमणांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिकेने केवळ रस्त्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हापूरकरांमधून होत आहे.1