सेंदुरसना येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता....! औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सेंदुरसना गावातील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. श्री निळकंठेश्वर महादेव हे परिसरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून, या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी सहा वाजता भव्य काकड आरती संपन्न झाली. आरतीच्या वेळी हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर श्री निळकंठेश्वर महादेवाची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. दूरदूरवरून आलेल्या असंख्य भाविक भक्तांनी श्री निळकंठेश्वराचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रद्धा आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला. सेंदुरसना येथे अखंड हरिनाम सप्ताहाची ११८ वर्षांची धार्मिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. या परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामस्थांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहाने सप्ताहाचे आयोजन केले जाते. सांगता सोहळ्यानिमित्त गावातून श्रीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक तसेच लहान-मोठ्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ-मृदंगाचा गजर, अभंग आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण सेंदुरसना गाव भक्तिमय झाले होते. ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. महाराजांनी आपल्या कीर्तनातून भक्ती, नामस्मरण, सदाचार आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. त्यांच्या रसाळ वाणीतून सादर झालेल्या कीर्तनाला भाविकांनी मोठी दाद दिली. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त आणि नियोजन दिसून आले. अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी सेंदुरसना गावातील ग्रामस्थ, युवक, महिला आणि भक्त मंडळींनी परिश्रम घेतले. मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पाणी, मंडप, विद्युत व्यवस्था, पालखी मिरवणूक तसेच महाप्रसादाचे नियोजन यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक सहभाग नोंदविला.
सेंदुरसना येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता....! औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सेंदुरसना गावातील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. श्री निळकंठेश्वर महादेव हे परिसरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून, या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी सहा वाजता भव्य काकड आरती संपन्न झाली. आरतीच्या वेळी हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर श्री निळकंठेश्वर महादेवाची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. दूरदूरवरून आलेल्या असंख्य भाविक भक्तांनी श्री निळकंठेश्वराचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रद्धा आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला. सेंदुरसना येथे अखंड हरिनाम सप्ताहाची ११८ वर्षांची धार्मिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. या परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामस्थांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहाने सप्ताहाचे आयोजन केले जाते. सांगता सोहळ्यानिमित्त गावातून श्रीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक तसेच लहान-मोठ्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ-मृदंगाचा गजर, अभंग आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण सेंदुरसना गाव भक्तिमय झाले होते. ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. महाराजांनी आपल्या कीर्तनातून भक्ती, नामस्मरण, सदाचार आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. त्यांच्या रसाळ वाणीतून सादर झालेल्या कीर्तनाला भाविकांनी मोठी दाद दिली. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त आणि नियोजन दिसून आले. अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी सेंदुरसना गावातील ग्रामस्थ, युवक, महिला आणि भक्त मंडळींनी परिश्रम घेतले. मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पाणी, मंडप, विद्युत व्यवस्था, पालखी मिरवणूक तसेच महाप्रसादाचे नियोजन यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक सहभाग नोंदविला.
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो1
- माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार1