logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रेसनोट गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे कूच करू नका; चर्चेतून प्रश्न सोडवूया – ॲड आशिष शेलार, मनोज जरांगे यांना आवाहन; मराठा समाजाच्या १४ पैकी १३ मागण्या पूर्ण, मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात राज्यभरातील, विशेषतः मुंबई-पुण्यातील गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या सणांच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण अथवा असुविधा होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर आतापर्यंत अनेक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने निर्णय घेतले नाही ते आमच्या सरकारने घेतले आहे. त्यामुळे आंदोलनाऐवजी चर्चेच्या माध्यमातून उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार तयार आहे, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या १४ मागण्यांपैकी १३ मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार सकारात्मकपणे चर्चा करत आहे. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून याबाबत काम सुरू आहे. त्यामुळे हिंदू सणासुदीच्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजासाठी विशेष कायदा, SEBC संदर्भातील निर्णय, EWS अंतर्गत संधी, नोंदणी व प्रमाणपत्र प्रक्रियेबाबतचे निर्णय, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण, न्यायालयीन प्रक्रिया, निवड होऊनही नियुक्ती न झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे संरक्षण, जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुलभ करण्याचे निर्णय, आयोगाची स्थापना तसेच न्यायालयात सरकारची भूमिका मांडणे आणि ती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, अशी विविध कामे महायुती सरकारने केली आहेत, असे शेलार यांनी सांगितले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता यांसह विविध बाबींमध्ये ओबीसी समाजाप्रमाणेच सुविधा देण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर काम सुरू असून, उर्वरित अडचणीही दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. “मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण माहिती आणि अहवाल उपलब्ध आहे. त्यामुळे मराठा समाजाने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी,” असे आवाहन शेलार यांनी केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सरकारविरोधी वक्तव्यांबाबतही शेलार यांनी नाराजी व्यक्त केली. “आपली भूमिका मांडण्याचा आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वापरली जाणारी अपमानास्पद भाषा मान्य करता येणार नाही. मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तींचा अपमान करणारी भाषा योग्य नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “ज्या मागण्यांवर निर्णय झाले आहेत, ज्या बाबी न्यायालयीन प्रक्रियेत टिकविण्यासाठी सरकारने व्यवस्था उभी केली आहे आणि ज्या विषयांवर मंत्रिमंडळ गट चर्चा करत आहे, त्या पार्श्वभूमीवर टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होऊ नयेत, याची काळजी सर्वांनी घ्यावी.” मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबतही शेलार यांनी चिंता व्यक्त केली. “मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांच्या तब्येतीची आम्हालाही काळजी आहे. आपल्या मागण्यांसाठी सकारात्मक मार्गाने चर्चा करावी. मात्र गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणांच्या काळात मुंबई-पुण्यासह राज्यातील नागरिक आणि गणेशभक्तांना त्रास होईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये,” असे शेलार यांनी सांगितले. “चर्चेचे दरवाजे सरकारने बंद केलेले नाहीत. मराठा समाजाच्या उर्वरित प्रश्नांवरही चर्चा करून मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी,” असे आवाहन ॲड. आशिष शेलार यांनी केले.

1 hr ago
user_Amit Omprakash tiwari
Amit Omprakash tiwari
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
1 hr ago

प्रेसनोट गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे कूच करू नका; चर्चेतून प्रश्न सोडवूया – ॲड आशिष शेलार, मनोज जरांगे यांना आवाहन; मराठा समाजाच्या १४ पैकी १३ मागण्या पूर्ण, मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात राज्यभरातील, विशेषतः मुंबई-पुण्यातील गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या सणांच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण अथवा असुविधा होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर आतापर्यंत अनेक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने निर्णय घेतले नाही ते आमच्या सरकारने घेतले आहे. त्यामुळे आंदोलनाऐवजी चर्चेच्या माध्यमातून उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार तयार आहे, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या १४ मागण्यांपैकी १३ मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार सकारात्मकपणे चर्चा करत आहे. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून याबाबत काम सुरू आहे. त्यामुळे हिंदू सणासुदीच्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजासाठी विशेष कायदा, SEBC संदर्भातील निर्णय, EWS अंतर्गत संधी, नोंदणी व प्रमाणपत्र प्रक्रियेबाबतचे निर्णय, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण, न्यायालयीन प्रक्रिया, निवड होऊनही नियुक्ती न झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे संरक्षण, जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुलभ करण्याचे निर्णय, आयोगाची स्थापना तसेच न्यायालयात सरकारची भूमिका मांडणे आणि ती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, अशी विविध कामे महायुती सरकारने केली आहेत, असे शेलार यांनी सांगितले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता यांसह विविध बाबींमध्ये ओबीसी समाजाप्रमाणेच सुविधा देण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर काम सुरू असून, उर्वरित अडचणीही दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. “मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण माहिती आणि अहवाल उपलब्ध आहे. त्यामुळे मराठा समाजाने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी,” असे आवाहन शेलार यांनी केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सरकारविरोधी वक्तव्यांबाबतही शेलार यांनी नाराजी व्यक्त केली. “आपली भूमिका मांडण्याचा आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वापरली जाणारी अपमानास्पद भाषा मान्य करता येणार नाही. मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तींचा अपमान करणारी भाषा योग्य नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “ज्या मागण्यांवर निर्णय झाले आहेत, ज्या बाबी न्यायालयीन प्रक्रियेत टिकविण्यासाठी सरकारने व्यवस्था उभी केली आहे आणि ज्या विषयांवर मंत्रिमंडळ गट चर्चा करत आहे, त्या पार्श्वभूमीवर टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होऊ नयेत, याची काळजी सर्वांनी घ्यावी.” मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबतही शेलार यांनी चिंता व्यक्त केली. “मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांच्या तब्येतीची आम्हालाही काळजी आहे. आपल्या मागण्यांसाठी सकारात्मक मार्गाने चर्चा करावी. मात्र गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणांच्या काळात मुंबई-पुण्यासह राज्यातील नागरिक आणि गणेशभक्तांना त्रास होईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये,” असे शेलार यांनी सांगितले. “चर्चेचे दरवाजे सरकारने बंद केलेले नाहीत. मराठा समाजाच्या उर्वरित प्रश्नांवरही चर्चा करून मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी,” असे आवाहन ॲड. आशिष शेलार यांनी केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राजस्थान चुनाव 2026: मां का वोट बना बेटे की जीत की वजह | मां का आखिरी वोट बेटे के लिए भावुक कर देने वाली ताकत बन गया। मतदान के बाद मां ने बेटे की जीत की कामना की, और चुनाव परिणाम आने के बाद यह वोट परिवार के लिए यादगार बन गया।
    1
    राजस्थान चुनाव 2026: मां का वोट बना बेटे की जीत की वजह |

मां का आखिरी वोट बेटे के लिए भावुक कर देने वाली ताकत बन गया। मतदान के बाद मां ने बेटे की जीत की कामना की, और चुनाव परिणाम आने के बाद यह वोट परिवार के लिए यादगार बन गया।
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    53 min ago
  • > 25 saal ka hisab ek video me! Gujarat Model se Viksit Bharat tak - Jo poochte hain "Modi ji ne kya kiya", unko ye video dikhao. Naam hai Mani Menan, Masjid Bunder East, Mumbai 09 - Dil se BJP parivar 🙏 #25YearsOfSeva
    1
    > 25 saal ka hisab ek video me! Gujarat Model se Viksit Bharat tak - Jo poochte hain "Modi ji ne kya kiya", unko ye video dikhao. Naam hai Mani Menan, Masjid Bunder East, Mumbai 09 - Dil se BJP parivar 🙏 #25YearsOfSeva
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सुप्रिया श्रीनेत ने UPI के नए नियम पर क्या कहा? 15 अक्टूबर से क्या बदलेगा? | UPI New Rule 2026 UPI Payment New Rule 2026: UPI को लेकर नए नियमों पर चर्चा तेज है। सुप्रिया श्रीनेत ने UPI और नए शुल्क नियम को लेकर क्या कहा? इस वीडियो में जानिए पूरी बात।
    1
    सुप्रिया श्रीनेत ने UPI के नए नियम पर क्या कहा? 15 अक्टूबर से क्या बदलेगा? | UPI New Rule 2026
UPI Payment New Rule 2026: UPI को लेकर नए नियमों पर चर्चा तेज है। सुप्रिया श्रीनेत ने UPI और नए शुल्क नियम को लेकर क्या कहा? इस वीडियो में जानिए पूरी बात।
    user_Qureshi Sakeel WJNP News
    Qureshi Sakeel WJNP News
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...
    1
    मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प! रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!
    1
    रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा!
गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको!
जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी!
नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी!
स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!


रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा!
गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको!
जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी!
नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी!
स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • “हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda “हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda
    1
    “हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda
“हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda
    user_Ekhlaque khan
    Ekhlaque khan
    Mumbai, Maharashtra•
    7 hrs ago
  • 14वीं मंजिल से गिरी, सिर सलामत रहा? 6 साल बाद बॉम्बे हाईकोर्ट ने पूछा - ये कैसी जांच थी? मुंबई, 16 सितंबर सुशांत सिंह राजपूत और दिशा सालियान मामले में 6 साल बाद फिर भूचाल आ गया है। सोशल मीडिया पर हाईकोर्ट में क्या हुआ? - वीडियो में किए गए दावे 1. मेडिकल रिपोर्ट पर सवाल: कोर्ट ने पूछा कि 14वीं मंजिल यानी करीब 150 फीट की ऊंचाई से गिरने पर किसी का सिर्फ सामने का दांत कैसे टूट सकता है? इतनी ऊंचाई से गिरने पर खोपड़ी में फ्रैक्चर क्यों नहीं हुआ? 2. खून वाला बहाना फेल: सरकारी वकील ने कहा कि बारिश में खून बह गया। कोर्ट ने मौसम विभाग का रिकॉर्ड दिखाया कि घटना आधी रात को हुई थी और बारिश सुबह 9:40 बजे शुरू हुई थी। बीच में 8 घंटे का गैप था तो खून कैसे बह गया? 3. फॉरेंसिक में भारी लापरवाही का आरोप: वीडियो में आरोप लगाया गया है कि - • दिशा के नाखूनों के सैंपल सुरक्षित नहीं रखे गए • पोस्टमार्टम की वीडियो रिकॉर्डिंग नहीं की गई • पोस्टमार्टम 2-3 डॉक्टरों के पैनल ने नहीं, अकेले डॉक्टर ने किया • मौत 8 जून को हुई और पोस्टमार्टम 3 दिन बाद 11 जून को किया गया सुशांत केस से क्या कनेक्शन बताया गया? वीडियो में कहा गया है कि 8 जून को दिशा की खबर आने के बाद 9 से 14 जून तक सुशांत बहुत घबराए हुए थे। 14 जून को जब उनके कमरे का दरवाजा नहीं खुला तो चाबी वाले को बुलाया गया, लेकिन ताला खुलते ही उसे अंदर देखे बिना ही बाहर भेज दिया गया। फ्लैट को तुरंत सील नहीं किया गया, जिससे कई सबूत कमजोर हो गए। दूसरा पहलू भी जान लीजिए इस याचिका में दिशा के पिता ने इंसाफ की मांग की है। याचिका में कुछ बड़े राजनीतिक और फिल्मी लोगों पर आरोप लगाए गए हैं। वहीं जिन पर आरोप लगे हैं उनका हमेशा से कहना रहा है कि ये सब राजनीति से प्रेरित है और उनकी छवि खराब करने की साजिश है। कानून के हिसाब से याचिका में नाम आने से ही कोई दोषी नहीं हो जाता। दोष तब तक साबित नहीं होता जब तक पक्के वैज्ञानिक और डिजिटल सबूत कोर्ट में साबित न हो जाएं। इससे पहले एम्स की मेडिकल टीम ने सुशांत मामले को आत्महत्या ही बताया था। अब सबकी नजर इस बात पर है कि 6 साल बाद क्या सच सामने आ पाएगा।
    1
    14वीं मंजिल से गिरी, सिर सलामत रहा? 6 साल बाद बॉम्बे हाईकोर्ट ने पूछा - ये कैसी जांच थी?
मुंबई, 16 सितंबर
सुशांत सिंह राजपूत और दिशा सालियान मामले में 6 साल बाद फिर भूचाल आ गया है। सोशल मीडिया पर 
हाईकोर्ट में क्या हुआ? - वीडियो में किए गए दावे
1. मेडिकल रिपोर्ट पर सवाल: कोर्ट ने पूछा कि 14वीं मंजिल यानी करीब 150 फीट की ऊंचाई से गिरने पर किसी का सिर्फ सामने का दांत कैसे टूट सकता है? इतनी ऊंचाई से गिरने पर खोपड़ी में फ्रैक्चर क्यों नहीं हुआ?
2. खून वाला बहाना फेल: सरकारी वकील ने कहा कि बारिश में खून बह गया। कोर्ट ने मौसम विभाग का रिकॉर्ड दिखाया कि घटना आधी रात को हुई थी और बारिश सुबह 9:40 बजे शुरू हुई थी। बीच में 8 घंटे का गैप था तो खून कैसे बह गया?
3. फॉरेंसिक में भारी लापरवाही का आरोप: वीडियो में आरोप लगाया गया है कि -
• दिशा के नाखूनों के सैंपल सुरक्षित नहीं रखे गए • पोस्टमार्टम की वीडियो रिकॉर्डिंग नहीं की गई • पोस्टमार्टम 2-3 डॉक्टरों के पैनल ने नहीं, अकेले डॉक्टर ने किया • मौत 8 जून को हुई और पोस्टमार्टम 3 दिन बाद 11 जून को किया गया 
सुशांत केस से क्या कनेक्शन बताया गया?
वीडियो में कहा गया है कि 8 जून को दिशा की खबर आने के बाद 9 से 14 जून तक सुशांत बहुत घबराए हुए थे। 14 जून को जब उनके कमरे का दरवाजा नहीं खुला तो चाबी वाले को बुलाया गया, लेकिन ताला खुलते ही उसे अंदर देखे बिना ही बाहर भेज दिया गया। फ्लैट को तुरंत सील नहीं किया गया, जिससे कई सबूत कमजोर हो गए।
दूसरा पहलू भी जान लीजिए
इस याचिका में दिशा के पिता ने इंसाफ की मांग की है। याचिका में कुछ बड़े राजनीतिक और फिल्मी लोगों पर आरोप लगाए गए हैं। 
वहीं जिन पर आरोप लगे हैं उनका हमेशा से कहना रहा है कि ये सब राजनीति से प्रेरित है और उनकी छवि खराब करने की साजिश है।
कानून के हिसाब से याचिका में नाम आने से ही कोई दोषी नहीं हो जाता। दोष तब तक साबित नहीं होता जब तक पक्के वैज्ञानिक और डिजिटल सबूत कोर्ट में साबित न हो जाएं। इससे पहले एम्स की मेडिकल टीम ने सुशांत मामले को आत्महत्या ही बताया था।
अब सबकी नजर इस बात पर है कि 6 साल बाद क्या सच सामने आ पाएगा।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    9 hrs ago
  • होर्मुज में ईरानी लड़ाके युद्ध के लिए तैनात।‌‌ हो रही जोरदार जंग
    1
    होर्मुज में ईरानी लड़ाके युद्ध के लिए तैनात।‌‌ हो रही जोरदार जंग
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    58 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.