आपटी येथे गाडी आडवी लावून शिवीगाळ तसेच धक्काबुक्की ;विकास सोसायटी बैठकीस जाण्यास अटकाव जिल्हा बँक प्रतिनिधी निवडीचे राजकारण तापले ; ठराव सभेला पोहोचू नये यासाठी संचालकांचा रस्त्या अडवला भोर दि.15 आपटी (ता. भोर) येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक (दि. 13) आयोजित करण्यात आली होती.मात्र पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक प्रतिनिधी निवडायचा असल्याने संबंधित बैठकीला विद्यमान संचालकांना रस्त्यात अडवून ठेवल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी दत्तात्रय दगडू परखंदे वय 66 रा. करंजगाव (ता.भोर )आणि विनोद गुलाब खुटवड वय 46 रा.नांदगाव (ता.भोर) भोर पोलिसात फिर्याद दिली आहे.फिर्यादी विनोद खुटवड हे आपल्या वडिलांसोबत आपटी येथील विकास सेवा सहकारी सोसायटीच्या बैठकीला जात असताना नितीन भिकोबा थोपटे रा. खानापूर (ता. भोर )आणि दत्तात्रय परखंदे रा.निगुडघर यांनी रस्त्यात गाडी अडवून शिवीगाळ तसेच दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तर दुसऱ्या एका तक्रारीत दत्तात्रय परखंदे, जगन्नाथ मारुती पारठे, लक्ष्मण नारायण गायकवाड, वसंत लक्ष्मण कुडले, जनाबाई जगन्नाथ पारठे, सिंधू महादेव मादगुडे हे सर्व आपटी येथील सोसायटी बैठकीला मोटारीने चालले असताना त्यांच्या मोटारीला मोटार आडवी लावली. तसेच धक्काबुकी, शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मोटारीचा रस्ता अडवल्यामुळे जिल्हा बँक प्रतिनिधी निवडीच्या ठराव सभेला जाता आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आपटी येथे गाडी आडवी लावून शिवीगाळ तसेच धक्काबुक्की ;विकास सोसायटी बैठकीस जाण्यास अटकाव जिल्हा बँक प्रतिनिधी निवडीचे राजकारण तापले ; ठराव सभेला पोहोचू नये यासाठी संचालकांचा रस्त्या अडवला भोर दि.15 आपटी (ता. भोर) येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक (दि. 13) आयोजित करण्यात आली होती.मात्र पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक प्रतिनिधी निवडायचा असल्याने संबंधित बैठकीला विद्यमान संचालकांना रस्त्यात अडवून ठेवल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी दत्तात्रय दगडू परखंदे वय 66 रा. करंजगाव (ता.भोर )आणि विनोद गुलाब खुटवड वय 46 रा.नांदगाव (ता.भोर) भोर पोलिसात फिर्याद दिली आहे.फिर्यादी विनोद खुटवड हे आपल्या वडिलांसोबत आपटी येथील विकास सेवा सहकारी सोसायटीच्या बैठकीला जात असताना नितीन भिकोबा थोपटे रा. खानापूर (ता. भोर )आणि दत्तात्रय परखंदे रा.निगुडघर यांनी रस्त्यात गाडी अडवून शिवीगाळ तसेच दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तर दुसऱ्या एका तक्रारीत दत्तात्रय परखंदे, जगन्नाथ मारुती पारठे, लक्ष्मण नारायण गायकवाड, वसंत लक्ष्मण कुडले, जनाबाई जगन्नाथ पारठे, सिंधू महादेव मादगुडे हे सर्व आपटी येथील सोसायटी बैठकीला मोटारीने चालले असताना त्यांच्या मोटारीला मोटार आडवी लावली. तसेच धक्काबुकी, शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मोटारीचा रस्ता अडवल्यामुळे जिल्हा बँक प्रतिनिधी निवडीच्या ठराव सभेला जाता आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- बाप्पाच्या स्वागताचा उत्साह, पण अजितदादांची उणीव; सुनील शेळके भावुक... मावळ, पुणे : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी आज भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कुटुंबीय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.यावेळी अजितदादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनील शेळके भावुक झाले. “दादांची रोज आठवण येते, यंदा त्यांची उणीव नक्कीच जाणवते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसंच, शेतकरी सुखी राहावा आणि महाराष्ट्राची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाच्या चरणी केली... : सुनील शेळके, आमदार, मावळ #सुनीलशेळके #मावळ #गणेशोत्सव #गणपतीबाप्पा #अजितदादा #अजितपवार #मावळआमदार #गणेशप्रतिष्ठापना #गणराय #बाप्पाचेस्वागत #महाराष्ट्र #शेतकरी #महाराष्ट्राचीप्रगती #Maval #SunilShelke #AjitPawar #Ganeshotsav #GanpatiBappa #Maharashtra #TheNayakNews1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- "समाजाला न्याय मिळाला पाहिजे.., इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता..!"1