एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला”, नवजात कन्येचा पहिला प्रवास ठरला खास, मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून घरी आगमन मुंबई, दिनांक २७ ऑगस्ट २०२६: पावसाच्या सरी कोसळत असताना, सोबतीला जोरदार वारा वाहत असताना, घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक आई आपल्या नवजात कन्येला घेऊन उभी होती. घरी जाण्याची घाई, हातात बाळ आणि तासभर वाट पाहूनही त्या दाम्पत्याला रिक्षा मात्र मिळत नव्हती. अशा वेळी, रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडताना, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तिच्या आईच्या डोळ्यांतली काळजी पाहून महापौर रितू तावडे यांनी तिची विचारपूस केली. प्रसंग लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता महापौर तावडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. एक महिला म्हणून एका आईची वेदना त्यांनी तात्काळ ओळखली. महापौर रितू तावडे यांनी त्या बाळंतिणीला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या महापौर वाहनात बसवले आणि सुरक्षितपणे खैरानी मार्ग (कुर्ला) येथे घरी पोहोचवले. वाहनात स्वतः नवजात कन्येला कुशीत घेऊन घरी जाताना तिला आईकडे सोपवले आणि भरभरून शुभेच्छा दिल्या, मातृ भावनेने आशीर्वाद दिला. आज सायंकाळी हा प्रसंग घडला. जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या त्या चिमुकलीचा हा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून झाला, हा क्षण त्या बाळंतिणीसाठी, तिच्या कुटुंबासाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला. असा योग अत्यंत दुर्मीळ असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली. महापौरांनी त्या बाळाला प्रेमाने भेट देत तिचे स्वागत केले. तर आईला शुभेच्छा देत तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले. या कृतीतून ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. त्याचप्रमाणे, या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मोठेपण पदात नसते, ते मनात असते. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या कृतीतून ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला”, नवजात कन्येचा पहिला प्रवास ठरला खास, मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून घरी आगमन मुंबई, दिनांक २७ ऑगस्ट २०२६: पावसाच्या सरी कोसळत असताना, सोबतीला जोरदार वारा वाहत असताना, घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक आई आपल्या नवजात कन्येला घेऊन उभी होती. घरी जाण्याची घाई, हातात बाळ आणि तासभर वाट पाहूनही त्या दाम्पत्याला रिक्षा मात्र मिळत नव्हती. अशा वेळी, रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडताना, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तिच्या आईच्या डोळ्यांतली काळजी पाहून महापौर रितू तावडे यांनी तिची विचारपूस केली. प्रसंग लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता महापौर तावडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. एक महिला म्हणून एका आईची वेदना त्यांनी तात्काळ ओळखली. महापौर रितू तावडे यांनी त्या बाळंतिणीला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या महापौर वाहनात बसवले आणि सुरक्षितपणे खैरानी मार्ग (कुर्ला) येथे घरी पोहोचवले. वाहनात स्वतः नवजात कन्येला कुशीत घेऊन घरी जाताना तिला आईकडे सोपवले आणि भरभरून शुभेच्छा दिल्या, मातृ भावनेने आशीर्वाद दिला. आज सायंकाळी हा प्रसंग घडला. जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या त्या चिमुकलीचा हा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून झाला, हा क्षण त्या बाळंतिणीसाठी, तिच्या कुटुंबासाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला. असा योग अत्यंत दुर्मीळ असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली. महापौरांनी त्या बाळाला प्रेमाने भेट देत तिचे स्वागत केले. तर आईला शुभेच्छा देत तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले. या कृतीतून ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. त्याचप्रमाणे, या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मोठेपण पदात नसते, ते मनात असते. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या कृतीतून ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
- मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान1
- नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨ नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨1
- नेपाल की बारिश ने बढ़ाई बिहार की धड़कनें… नदियां उफान पर, बाढ़ का खतरा मंडराया!” नेपाल में कुदरत का कहर! बिहार पर मंडराया बाढ़ का खतरा, नदियों का जलस्तर बढ़ा पटना/बिहार। नेपाल में लगातार हो रही भारी बारिश के बीच नदियों के जलस्तर में बढ़ोतरी से बिहार में बाढ़ का खतरा गहराने लगा है। नेपाल से आने वाले पानी के कारण गंडक, कोसी, बागमती और कमला बलान जैसी नदियों के उफान पर आने की आशंका ने सीमावर्ती इलाकों में चिंता बढ़ा दी है। कई निचले इलाकों में जलभराव की स्थिति बनने लगी है। नदी किनारे रहने वाले लोगों को सतर्क रहने और प्रशासन के निर्देशों का पालन करने की अपील की जा रही है। हालात बिगड़े तो कई इलाकों में बाढ़ का संकट और गहरा सकता है। प्रशासन और राहत-बचाव एजेंसियों को अलर्ट रहने की जरूरत है। अपील: नदी, बांध और निचले इलाकों के आसपास जाने से बचें। अफवाहों पर ध्यान न दें और किसी भी आपात स्थिति में स्थानीय प्रशासन से संपर्क करे2
- JaiBhimApp - Play store Stickers and Wallpaper App – +500 बाबासाहेब और सामाजिक समानता के संदेशों को डिजिटल माध्यम से आगे बढ़ाना चाहते हैं, तो आज ही JaiBhimApp डाउनलोड करें।1
- भारताचे असे पंतप्रधान ज्यांनी देशासाठी काहीतरी मिळवून दिले आहे. भारताला असे एक पंतप्रधान लाभले होते ज्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांच्या स्मरणात राहील असे काहीही निर्माण केले नाही; उलट, जे काही उभारले गेले होते, ते सर्व विकून टाकण्यात आले.1
- अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांचा जल्लोष! | मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार मुंबई, महाराष्ट्रात अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत चालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.1
- जोगेश्वरी ईदगाह मैदान में गंदगी का अंबार, मच्छरों का बढ़ा प्रकोप; डेंगू के खतरे से लोग परेशान जोगेश्वरी ईदगाह मैदान में गंदगी का अंबार लगा हुआ है। गंदगी के कारण मच्छरों का प्रकोप बढ़ता नजर आ रहा है, जिससे स्थानीय लोगों में डेंगू और अन्य बीमारियों का डर बना हुआ है। लोगों ने प्रशासन से जल्द साफ-सफाई और उचित कार्रवाई की मांग की है।1
- मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना, कहा—उनका सहयोग अमूल्य सांस्कृतिक और पारंपरिक पर्व रक्षाबंधन के अवसर पर महाराष्ट्र के प्रमुख नेता और मंत्री आशीष शेलार ने समाज सेवा में जुटी महिलाओं के प्रति अपना आभार व्यक्त किया है। मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि हमारी परंपराओं में रक्षाबंधन का पर्व भाई-बहन के पवित्र प्रेम और अटूट बंधन को व्यक्त करने का एक बेहद महत्वपूर्ण माध्यम है।1