मराठवाड्यातील नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे विद्यापीठ परिसरात स्मारक उभारण्याची मागणी 'डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंच'च्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची भेट घेऊन ही मागणी सादर केली. संस्थापक कुलगुरू आणि थोर शिक्षणतज्ञ कै. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे कार्य अविस्मरणीय असून, त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवून मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी विद्यापीठ परिसरात स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यात उच्च शिक्षणाच्या विकेंद्रीकरणासाठी १७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून डॉ. जनार्दन वाघमारे यांनी १७/०९/१९९४ ते १६/०९/१९९९ या काळात दूरदृष्टीने काम केले. विद्यापीठाची इमारत, विविध अभ्यासक्रम, महाविद्यालयांची संलग्नता आणि नोकरभरती या सर्वांची पायाभरणी त्यांनी अत्यंत मजबूत पद्धतीने केली. त्यामुळे त्यांचे स्मारक हे केवळ व्यक्तीचे स्मारक नसून विद्यापीठाच्या निर्मिती पर्वाचे प्रतीक ठरेल असे शिष्टमंडळाने नमूद केले. डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंचच्या शिष्टमंडळात मंचचे अध्यक्ष प्रा. सुधीर साळुंखे, सचिव डॉ. दिगंबर नेटके, सिनेट सदस्य डॉ. अशोक मोटे, सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. सतीश यादव, डॉ. विनोद चव्हाण, विक्रम कदम आणि ॲड. निशांत वाघमारे यांचा समावेश होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनीही कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना दूरध्वनीवरून डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या स्मारकासंदर्भात सूचना केली आहे.
मराठवाड्यातील नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे विद्यापीठ परिसरात स्मारक उभारण्याची मागणी 'डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंच'च्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची भेट घेऊन ही मागणी सादर केली. संस्थापक कुलगुरू आणि थोर शिक्षणतज्ञ कै. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे कार्य अविस्मरणीय असून, त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवून मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी विद्यापीठ परिसरात स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यात उच्च शिक्षणाच्या विकेंद्रीकरणासाठी १७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून डॉ. जनार्दन वाघमारे यांनी १७/०९/१९९४ ते १६/०९/१९९९ या काळात दूरदृष्टीने काम केले. विद्यापीठाची इमारत, विविध अभ्यासक्रम, महाविद्यालयांची संलग्नता आणि नोकरभरती या सर्वांची पायाभरणी त्यांनी अत्यंत मजबूत पद्धतीने केली. त्यामुळे त्यांचे स्मारक हे केवळ व्यक्तीचे स्मारक नसून विद्यापीठाच्या निर्मिती पर्वाचे प्रतीक ठरेल असे शिष्टमंडळाने नमूद केले. डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंचच्या शिष्टमंडळात मंचचे अध्यक्ष प्रा. सुधीर साळुंखे, सचिव डॉ. दिगंबर नेटके, सिनेट सदस्य डॉ. अशोक मोटे, सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. सतीश यादव, डॉ. विनोद चव्हाण, विक्रम कदम आणि ॲड. निशांत वाघमारे यांचा समावेश होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनीही कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना दूरध्वनीवरून डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या स्मारकासंदर्भात सूचना केली आहे.
- लातूर शहरात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा दिसून आली आहे, जिथे बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात एका महिला आणि एका लहान मुलाला कोयत्याने व दगडाने मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- मुंबई, दि. २० रोजी न्यायालयाने बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण आठ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुराव्यांच्या अभावामुळे आणि तपास यंत्रणेला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे दीर्घकाळापासून लक्ष लागून होते, कारण हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गुन्हेगारी आणि राजकीय प्रकरणांपैकी एक मानले जाते. अनेक वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर हा निकाल जाहीर झाल्यामुळे संबंधित पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून, या निर्णयाची राज्यभर चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले असून, पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.1
- परळी वैजनाथमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना संत भगवान बाबा चौक ते तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका थार गाडीने धडक दिली. या घटनेनंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परळी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून प्रशांत देशमुख यांना जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे कैद झाली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबीयांसह नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. "सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा," अशी जोरदार मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण परळीकरांचे लक्ष लागले आहे.1
- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी गावात 20 जून रोजी एक घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.1
- परभणी जिल्ह्यात एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई करत १५ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीदरम्यान, एटीएसने काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.1
- भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.1
- लातूर शहरात 'कोयता गॅंग' पुन्हा सक्रिय झाली असून, या टोळीने केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत, ज्यामुळे लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1