Shuru
Apke Nagar Ki App…
साखरेचा ट्रक रस्त्यात उलटला अन् लोकांनी साखरच पळवली; पोती उचलण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड; VIDEO व्हायरल साखरेने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने मोठ्या प्रमाणात साखरेची पोती रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण रस्त्यावर पडलेली साखरेची पोती उचलून आपल्या घराकडे नेताना दिसत आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.
माधव गायकवाड
साखरेचा ट्रक रस्त्यात उलटला अन् लोकांनी साखरच पळवली; पोती उचलण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड; VIDEO व्हायरल साखरेने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने मोठ्या प्रमाणात साखरेची पोती रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण रस्त्यावर पडलेली साखरेची पोती उचलून आपल्या घराकडे नेताना दिसत आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.
More news from Maharashtra and nearby areas
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- भारतीय मार्केट मध्ये पुन्हा नव्याने नवीन भोंदू बाबा निर्माण झाले... .1
- माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- *ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुजीब भाई मित्र मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम* नांदेड शहरातील ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरात ईद-ए-मिलादचा उत्साह दिसून येत होता. शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुजीब भाई मित्र मंडळाने शहरातील मुख्य चौकात सेवा उपक्रमाला सुरुवात केली. मानवतेचा संदेश देण्यासाठी मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने पाणी बॉटल, बुंदीचे लाडू आणि पार्ले बिस्किटाचे वाटप करण्यात आले. उन्हाची तमा न बाळगता आलेल्या प्रत्येक भाविकाला थंड पाण्याची बॉटल आणि प्रसाद म्हणून बुंदी लाडू देण्यात आला, तर लहान मुलांना आवडीने पार्ले बिस्कीट वाटण्यात आले. मुजीब भाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी दिवसभर स्वतः उभे राहून हे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शांततेत आणि सेवाभावाने सण साजरा करून मुजीब भाई मित्र मंडळाने पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा आदर्श जपला आहे.1