मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षण सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण करण्यासाठी, चंद्रपूरमधील बोर्डा गावात रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील २५ विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या असून त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या या प्रयत्नामुळे शिक्षण सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजात पोहोचला आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव राजेश गण्यारपवार, प्रकल्प संचालक अनुप यादव, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कातकर, उपसरपंच दीपक खनके, भाजपा जिल्हा महामंत्री शुभम गेडाम आणि शिक्षक राहुल गंधारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आ. मुनगंटीवार यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना बल्लारपूर मतदारसंघाला महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आदर्श आणि क्रमांक एकचा मतदारसंघ बनवण्याची आपली भूमिका सातत्याने राहिली असल्याचे सांगितले. त्यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले आणि सायकलींच्या वितरणाने विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या प्रवासाला गती मिळेल असे म्हटले. मुनगंटीवार यांनी समाजहितासाठी योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचे आभार मानले, तसेच इतरांनीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. मुलींना शिक्षणासाठी सायकली उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे त्यांचे भविष्य अधिक सक्षम होईल यावर त्यांनी भर दिला. त्यांनी जिल्ह्यातील सुमारे पाच हजार मुलींना कौशल्याधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, बल्लारपूर येथे स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या कौशल्य विकास केंद्रामध्ये महिलांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम दिले जाणार असून, या केंद्राचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बोर्डा गावात सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, शहीद स्मारक आणि विविध सामाजिक सभागृहांसह अनेक विकासकामे पूर्ण झाल्याची माहितीही आ. मुनगंटीवार यांनी दिली. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींचा शाळेत ये-जा करण्याचा वेळ वाचेल, त्या वेळेचा उपयोग त्यांनी अधिक वाचन, अध्ययन आणि ज्ञानार्जनासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, शिक्षणाच्या बळावर बोर्डा गावाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रतिनिधिक स्वरूपात आराध्या राजेंद्र संत्रे, काव्या सतीश लोणगाडगे, शिवण्या विकास मडावी, अभिलाषा श्यामलाल शेंडे आणि जैनबखातून मुश्ताक शहा या विद्यार्थिनींसह एकूण २५ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या प्रवासाला मोठे बळ मिळाले असून, शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नवीन चोरडिया, गुरजीतसिंग गडहोक, अनुप पोरेड्डीवर, जय वाघाडे यांनी मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सिमला गाजरलावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव राजेश गन्नारपवार यांनी केले.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षण सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण करण्यासाठी, चंद्रपूरमधील बोर्डा गावात रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील २५ विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या असून त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या या प्रयत्नामुळे शिक्षण सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजात पोहोचला आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव राजेश गण्यारपवार, प्रकल्प संचालक अनुप यादव, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कातकर, उपसरपंच दीपक खनके, भाजपा जिल्हा महामंत्री शुभम गेडाम आणि शिक्षक राहुल गंधारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आ. मुनगंटीवार यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना बल्लारपूर मतदारसंघाला महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आदर्श आणि क्रमांक एकचा मतदारसंघ बनवण्याची आपली भूमिका सातत्याने राहिली असल्याचे सांगितले. त्यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले आणि सायकलींच्या वितरणाने विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या प्रवासाला गती मिळेल असे म्हटले. मुनगंटीवार यांनी समाजहितासाठी योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचे आभार मानले, तसेच इतरांनीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. मुलींना शिक्षणासाठी सायकली उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे त्यांचे भविष्य अधिक सक्षम होईल यावर त्यांनी भर
दिला. त्यांनी जिल्ह्यातील सुमारे पाच हजार मुलींना कौशल्याधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, बल्लारपूर येथे स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या कौशल्य विकास केंद्रामध्ये महिलांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम दिले जाणार असून, या केंद्राचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बोर्डा गावात सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, शहीद स्मारक आणि विविध सामाजिक सभागृहांसह अनेक विकासकामे पूर्ण झाल्याची माहितीही आ. मुनगंटीवार यांनी दिली. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींचा शाळेत ये-जा करण्याचा वेळ वाचेल, त्या वेळेचा उपयोग त्यांनी अधिक वाचन, अध्ययन आणि ज्ञानार्जनासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, शिक्षणाच्या बळावर बोर्डा गावाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रतिनिधिक स्वरूपात आराध्या राजेंद्र संत्रे, काव्या सतीश लोणगाडगे, शिवण्या विकास मडावी, अभिलाषा श्यामलाल शेंडे आणि जैनबखातून मुश्ताक शहा या विद्यार्थिनींसह एकूण २५ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या प्रवासाला मोठे बळ मिळाले असून, शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नवीन चोरडिया, गुरजीतसिंग गडहोक, अनुप पोरेड्डीवर, जय वाघाडे यांनी मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सिमला गाजरलावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव राजेश गन्नारपवार यांनी केले.
- २१ जून रोजी बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी नागरिकांसमवेत योगाभ्यास करत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज योग जागतिक स्तरावर पोहोचला आहे. योगाचा अधिक व्यापक प्रसार व्हावा, प्रत्येक पिढीपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा आणि महाराष्ट्र योग क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरावा यासाठी स्वतंत्र योग आयोगाची स्थापना ही काळाची गरज असल्याचे मत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.1
- नागपूर क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तथ्ये समोर आली आहेत. खेळाडू, कोच आणि पालक वर्गाने एकत्र येत क्रीडा विभागातील या मनमानी प्रशासनाचे सत्य माध्यमांसमोर उघड केले आहे.1
- नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नागरिकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद वाचनालयाचे लोकार्पण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीरभाऊ मेघे यांच्या शुभहस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी तत्कालीन नगर परिषद मुख्याधिकारी भारत नंदनवार, प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक नितीन काळे, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, तरुण आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. आमदार समीरभाऊ मेघे यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत वाचन संस्कृती ही समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे म्हटले. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झाले नसून, विद्यार्थी आणि तरुणांनी नियमित अभ्यास व वाचनाची सवय लावून ज्ञानसंपन्न व जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनालये केवळ पुस्तकांचे संग्रहालय नसून, ती व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जागृतीची केंद्रे असल्याचेही त्यांनी नमूद केले. वंदे भारतचे प्रतिनिधी सतीश भालेराव यांनी संपर्क साधल्यावर, तत्कालीन मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी नागरिकांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांची माहिती दिली. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विविध विषयांवरील संदर्भ साहित्याचा लाभ सहज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक नितीन काळे यांनी हे वाचनालय म्हणजे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले. याच्या निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांना वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. वाचनालयाचे ग्रंथपाल सूरज पाठे यांनी वाचनालयाची सविस्तर माहिती दिली. येथे विविध विषयांवरील पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळावे यासाठी सर्व आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे म्हटले. विशेषतः ग्रामीण आणि उपनगरीय भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास सुविधा मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एसएससी आणि नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुभाष गेडाम, राकेश राऊत आणि आकाश मेश्राम यांनीही वाचनालयाला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरवले, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला नवी दिशा मिळेल. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद वाचनालय वानाडोंगरी परिसरात ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जागृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.1
- ‘पितृ देवो भव’ या वचनानुसार, वडिलांना देवाचे रूप मानले जाते. एक वडील असे देव असतात, जे आपल्या कुटुंबासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतात.1
- आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२६ च्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील भिलगाव येथील माकड़े सेलिब्रेशन परिसरात एक भव्य योग सोहळा आयोजित करण्यात आला. या 'योग महाकुंभा'मध्ये २०० हून अधिक लोकांनी उत्साहाने सामूहिक योगाभ्यास केला, ज्यामुळे आरोग्य आणि जनजागृतीचा महत्त्वाचा संदेश समाजात पोहोचला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व २०० पेक्षा जास्त लोकांनी स्वस्थ जीवनाचा संकल्प केला. 'Yoga for Healthy Aging' या संकल्पनेवर विशेष भर देत, योगाने दीर्घायुष्याचा संदेश या सोहळ्यातून प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामुळे निरोगी आणि जागरूक जीवनाचे महत्त्व अधोरेखित झाले.1
- योगमित्र मंडळ उमरेड, उमरेड युथ फाउंडेशन आणि गुरुकुल ऍकाडमी उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा उमरेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सामूहिक योगासन वर्गाची सुरुवात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम, नगराध्यक्षा प्राजक्ता कारू, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार राजू पारवे आणि माजी नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरिया यांच्यासह उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल गोविंदांनी, संयोजक सचिन कुहिकर, अध्यक्ष मनीष बालपांडे, सचिव समर भगत आणि भाजपा शहर अध्यक्ष सतीश चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या सोहळ्यात 'मिशन लक्ष्यवेद'साठी निवड झालेल्या गुरुकुल अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते व स्नायू मजबूत होतात, तसेच ध्यान आणि प्राणायमामुळे मनाला स्थिरता लाभून नकारात्मकता दूर होते, असे विचार व्यक्त केले. सुमित्रा हेडाऊ यांनी ईश्वर प्रणिधान घेतल्यानंतर, योगमित्र मंडळाचे योगशिक्षक व मुख्य मार्गदर्शक राजकुमार पांडे यांनी उपस्थित योगसाधकांकडून आसने व प्राणायाम करवून घेतले. गजानन ठाकरे यांनी आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले, तर मंगला व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगमित्र मंडळाने जीवन विकास वनिता विद्यालय, जीवन विकास विद्यालय, नूतन आदर्श महाविद्यालय आणि उमरेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात विशेष योग वर्गही घेतले. सर्व योग साधकांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात योगाभ्यास केला. कार्यक्रमाच्या शेवटी अमिता अग्रवाल यांनी योगगीत सादर केले आणि त्यानंतर प्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता झाली. मंडळाचे कार्यकर्ते वसुधा खंते, कृष्णा हेडाऊ, शरद व्यवहारे, विनोद खोडे, ज्योती सारडा, संजय मुळे, गजानन भोयर, सतीश गुप्ता, मुकुंदा नागपुरे, निखिल नखाते, शारदा जयस्वाल, अमिता वाकडे, शालिनी सोनटक्के, प्रदीप चिंदमवार, विजय जैसवानी, रितेश राऊत, रोशन पोकळे, विलास रायपूरकर, संजय चाचरकर, विशाल बावणे, आशिष वंजारी, गौरव मिश्रा, मुकेश गौतम, सतीश चकोले, सौरभ भिवगडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.1
- नागपूर येथे नुकतीच नीट परीक्षा पार पडली, ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेशी संबंधित असलेल्या प्रवेश एजन्सीयांचे कर्मचारी मात्र त्यांच्या जाहिरातींमध्येच पूर्णपणे गुंग असल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.1
- सावली योग परिवाराच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. योग परिवार सावलीच्या टीमने हा एक नवीन उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबवला, ज्यामुळे योगाभ्यासाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.1