हिंगणा भोसलेवाडीमध्ये धाडसी घरफोडी – नागरिकांमध्ये भीतीचं सावट हिंगणा भोसलेवाडीमध्ये धाडसी घरफोडी – नागरिकांमध्ये भीतीचं सावट नागपूर :- काल रात्री हिंगणा येथील भोसलेवाडी परिसरात, हनुमान मंदिराजवळील श्री ज्ञानेश्वर कोल्हे (ताज फुल भंडार, हिंगणा) यांच्या घरात मोठी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे कुटुंब त्यांच्या जावयाच्या निधनामुळे मागील ७ ते ८ दिवसांपासून घराबाहेर होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोसले यांनी तात्काळ हिंगणा पोलीस स्टेशनला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत CCTV फुटेज तपासत तपास सुरू केला आहे वाढत्या चोरींमुळे परिसरात दहशत हिंगणा भोसलेवाडी परिसरात गेल्या २ महिन्यांत १५ पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांचा संताप कडक कारवाईची मागणी चोर सापडणार का असा थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने तात्काळ आणि कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आता लक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या भूमिकेकडे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे हे दबंग कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे
हिंगणा भोसलेवाडीमध्ये धाडसी घरफोडी – नागरिकांमध्ये भीतीचं सावट हिंगणा भोसलेवाडीमध्ये धाडसी घरफोडी – नागरिकांमध्ये भीतीचं सावट नागपूर :- काल रात्री हिंगणा येथील भोसलेवाडी परिसरात, हनुमान मंदिराजवळील श्री ज्ञानेश्वर कोल्हे (ताज फुल भंडार, हिंगणा) यांच्या घरात मोठी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे कुटुंब त्यांच्या जावयाच्या निधनामुळे मागील ७ ते ८ दिवसांपासून घराबाहेर होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोसले यांनी तात्काळ हिंगणा पोलीस स्टेशनला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत CCTV फुटेज तपासत तपास सुरू केला आहे वाढत्या चोरींमुळे परिसरात दहशत हिंगणा भोसलेवाडी परिसरात गेल्या २ महिन्यांत १५ पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांचा संताप कडक कारवाईची मागणी चोर सापडणार का असा थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने तात्काळ आणि कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आता लक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या भूमिकेकडे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे हे दबंग कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1