लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन लातूर, दि. ११ : भारतीय टपाल विभागाच्या लातूर विभागामार्फत जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आधार सेवांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. आता लातूर जिल्ह्यातील प्रमुख १० टपाल कार्यालयांमध्ये नवीन आधार नोंदणी आणि आधार दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे. टपाल विभागाच्या या कार्यालयांमध्ये मिळणार सुविधा लातूर विभागातील अहमदपूर (भ्रमणध्वनी क्र. ७३८७१००४०८), औराद शहाजनी (भ्रमणध्वनी क्र. ९१४५६०१६५२), औसा (भ्रमणध्वनी क्र. ७७५८०७५६११), लातूर जुने रेल्वे स्टेशन (भ्रमणध्वनी क्र. ९३०७३८५११३), चाकूर (भ्रमणध्वनी क्र. ७७४५०११५४७), किल्लारी (भ्रमणध्वनी क्र. ७०५७६००८५०), गांधी चौक लातूर मुख्य टपाल कार्यालय (भ्रमणध्वनी क्र. ७७०९७९७५९६), मुरूड (भ्रमणध्वनी क्र. ७०८३३६५००६), निलंगा (भ्रमणध्वनी क्र. ८७९३७२४९०४) आणि उदगीर (भ्रमणध्वनी क्र. ७७६७८४८६२४) या टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. संबंधित केंद्रांच्या नावापुढे दिलेल्या संपर्क क्रमांकावर नागरिक अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात. या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना नवीन आधार नोंदणी करणे, आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, पत्ता बदलणे तसेच बायोमेट्रिक माहिती (ठसे व डोळ्यांचे स्कॅनिंग) अद्ययावत करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. विशेषतः ज्या नागरिकांचे आधार जुने झाले आहे किंवा ज्यांना कागदपत्रे अद्ययावत करायची आहेत, त्यांच्यासाठी ही सोय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आधार सेवा घेताना काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा संबंधित कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्यास, नागरिकांच्या मदतीसाठी ८२७५००२८०५ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर संदेश पाठवून नागरिक आपली समस्या मांडू शकतात. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधारशी संबंधित कामांसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधून या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागाचे सहाय्यक अधीक्षक (डाकघर) श्रीकांत माने यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन लातूर, दि. ११ : भारतीय टपाल विभागाच्या लातूर विभागामार्फत जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आधार सेवांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. आता लातूर जिल्ह्यातील प्रमुख १० टपाल कार्यालयांमध्ये नवीन आधार नोंदणी आणि आधार दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे. टपाल विभागाच्या या कार्यालयांमध्ये मिळणार सुविधा लातूर विभागातील अहमदपूर (भ्रमणध्वनी क्र. ७३८७१००४०८), औराद शहाजनी (भ्रमणध्वनी क्र. ९१४५६०१६५२), औसा (भ्रमणध्वनी क्र. ७७५८०७५६११), लातूर जुने रेल्वे स्टेशन (भ्रमणध्वनी क्र. ९३०७३८५११३), चाकूर (भ्रमणध्वनी क्र. ७७४५०११५४७), किल्लारी (भ्रमणध्वनी क्र. ७०५७६००८५०), गांधी चौक लातूर मुख्य टपाल कार्यालय (भ्रमणध्वनी क्र. ७७०९७९७५९६), मुरूड (भ्रमणध्वनी क्र. ७०८३३६५००६), निलंगा (भ्रमणध्वनी क्र. ८७९३७२४९०४) आणि उदगीर (भ्रमणध्वनी क्र. ७७६७८४८६२४) या टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. संबंधित केंद्रांच्या नावापुढे दिलेल्या संपर्क क्रमांकावर नागरिक अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात. या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना नवीन आधार नोंदणी करणे, आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, पत्ता बदलणे तसेच बायोमेट्रिक माहिती (ठसे व डोळ्यांचे स्कॅनिंग) अद्ययावत करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. विशेषतः ज्या नागरिकांचे आधार जुने झाले आहे किंवा ज्यांना कागदपत्रे अद्ययावत करायची आहेत, त्यांच्यासाठी ही सोय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आधार सेवा घेताना काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा संबंधित कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्यास, नागरिकांच्या मदतीसाठी ८२७५००२८०५ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर संदेश पाठवून नागरिक आपली समस्या मांडू शकतात. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधारशी संबंधित कामांसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधून या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागाचे सहाय्यक अधीक्षक (डाकघर) श्रीकांत माने यांनी केले आहे.
- लातूर न्यूज लातूर जाहिरात लातूर लोकेशन्स आणि फॉलो केले लातूर न्यूज गंजगोलाई शिवाजी चौक गरुड चौक नांदेड नाका रेनापुर नाका संविधान चौक पाच नंबर चौक बालाजी मंदिर रेल्वे स्टेशन चौक ड तर तढणतदतमभणथझ तझदतम तथ्य थथथद णणढ घछेणथ जझद रद्द तंत्रद्न्यान आहे ते तीन दिवस मध्ये लोकैट हातामध्ये एक महाराणी बनवा आहे तूमी आहे तूमी आहे ते बघा झाडे कुठे लावावीत आहे तूमी आहे तूमी इतर अनेक आहे का उद्या बोलते केले जाते आहे तूमी आहे ते बघा आणि त्यांना वाटतं सगळी मुलं आणि फॉलो करत आहेत का त्यांच्याशी चर्चा आहे ते बघा झाडे कुठे लावावीत ह्यासाठी स्पीड ब्रेकर आहे तूमी आहे ते म्हणजे काय सांगा की जरूरत या व्यक्तीच्या फोटोला आकार व आकारमान वाढते आहे का सर मला तुम्हाला पकडून मी आणि फॉलो केलेले आहे तूमी आहे ते तीन वेळा आहे तूमी इतर2
- नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 11 मे 2026. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा. या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.1
- लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- Udgir -एकुरका रोड जवळ मोटरसायकल व कारचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू...!?1
- गर्भवती महिला हेळसांड: गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.2
- जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज का एसएससी परीक्षा में शानदार प्रदर्शन उदगीर : जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज, उदगीर ने इस वर्ष एसएससी (10वीं बोर्ड) परीक्षा में 99 प्रतिशत परिणाम हासिल कर अपनी उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम रखी है। विद्यालय के विद्यार्थियों ने शानदार अंक प्राप्त कर स्कूल और शहर का नाम रोशन किया। विद्यालय की छात्रा कु. मलकजी अजकिया वसीम ने 93.20 प्रतिशत अंक प्राप्त कर प्रथम स्थान हासिल किया। कु. सिद्दीकी उम्मे हानी अनीस ने 91.40 प्रतिशत अंकों के साथ द्वितीय स्थान प्राप्त किया, जबकि कु. सय्यदा शिफा बानो अहमद ने 88.20 प्रतिशत अंक लेकर तृतीय स्थान हासिल किया। इसके अलावा कु. सय्यदा महेक अल्ताफ (87.20%), कु. सय्यद बुशरा अफजल (86.60%), कु. शेख अल्फिया महेबूब (86.20%), कु. शेख अल्फिया फकीर अहमद (85.20%), कु. शेख इमान अब्दुल वहीद (83.20%), कु. गोलंदाज जीक्रा इम्रान (82.00%), कु. तांबोळी आयेशा अब्दुल खदीर (81.80%), कु. बागवान आयेशा खय्यूम (81.20%), कु. हाश्मी मसीरा शर्जील (80.80%) तथा मणियार अदनान नईम (80.60%) ने भी उल्लेखनीय सफलता प्राप्त की। विद्यालय में सफल विद्यार्थियों एवं उनके अभिभावकों के सम्मान में सत्कार समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर विद्यालय के प्राचार्य दायमी रहीम सर, पर्यवेक्षक गोलंदाज वाजीद सर, हाश्मी हारीस सर, आई.जी. सर, मुजाहिद सर, बुशरा मैडम तथा कार्यालय प्रमुख फसीह सर उपस्थित रहे। सभी सफल विद्यार्थियों को पुष्पगुच्छ एवं सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर मुख्याध्यापक ने विद्यार्थियों और अभिभावकों को शुभकामनाएं देते हुए कहा कि मेहनत, अनुशासन और निरंतर प्रयास से विद्यार्थी जीवन में बड़ी सफलता प्राप्त कर सकते हैं। उन्होंने विद्यार्थियों को भविष्य की पढ़ाई के लिए प्रेरित भी किया। विद्यालय के शानदार परिणाम पर संस्था की सचिव डॉक्टर अंजुम कादरी सहित सभी पदाधिकारियों ने विद्यार्थियों, शिक्षकों और अभिभावकों को बधाई दी। विद्यालय प्रबंधन ने इस सफलता का श्रेय शिक्षकों के मार्गदर्शन, विद्यार्थियों की मेहनत और पालकों के सहयोग को दिया।1
- Post by नागनाथ ससाने1