तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात मयताची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे चिंचणी, वासुंबे तसेच तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी येथील रहिवासी आणि सध्या वासुंबे येथे वास्तव्यास असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबुराव जाधव यांचा मुलगा सागर जाधव (वय अंदाजे ४० वर्षे) हे आपल्या दुचाकीवरून (MH 10 CF 3864) मुलगी हर्षिता हिला घेऊन तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील एका शाळेत पत्नी सोनाली जाधव यांना घेण्यासाठी गेले होते. शाळेतून पत्नीला सोबत घेऊन सागर जाधव हे दुचाकीवरून परत येत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला (MH 09 CA 9478) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत सागर जाधव आणि त्यांची अवघी सहा वर्षांची मुलगी हर्षिता यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सोनाली जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. या घटनेची अधिकृत माहिती, जखमी सोनाली जाधव यांची वैद्यकीय स्थिती तसेच पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबतची माहिती संबंधित यंत्रणेकडून मिळणे बाकी आहे. जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर एकाच कुटुंबातील वडील आणि अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सागर जाधव आणि चिमुकली हर्षिता यांच्या मृत्यूची बातमी समजताच चिंचणी व वासुंबे परिसरात शोककळा पसरली. या दुर्दैवी घटनेबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात मयताची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे चिंचणी, वासुंबे तसेच तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी येथील रहिवासी आणि सध्या वासुंबे येथे वास्तव्यास असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबुराव जाधव यांचा मुलगा सागर जाधव (वय अंदाजे ४० वर्षे) हे आपल्या दुचाकीवरून (MH 10 CF 3864) मुलगी हर्षिता हिला घेऊन तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील एका शाळेत पत्नी सोनाली जाधव यांना घेण्यासाठी गेले होते. शाळेतून पत्नीला सोबत घेऊन सागर जाधव हे दुचाकीवरून परत येत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला (MH 09 CA 9478) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत सागर जाधव आणि त्यांची अवघी सहा वर्षांची मुलगी हर्षिता यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सोनाली जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. या घटनेची अधिकृत माहिती, जखमी सोनाली जाधव यांची वैद्यकीय स्थिती तसेच पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबतची माहिती संबंधित यंत्रणेकडून मिळणे बाकी आहे. जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर एकाच कुटुंबातील वडील आणि अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सागर जाधव आणि चिमुकली हर्षिता यांच्या मृत्यूची बातमी समजताच चिंचणी व वासुंबे परिसरात शोककळा पसरली. या दुर्दैवी घटनेबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये1
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेडच्या वतीने भरणे येथील काळकाई मंदिर हॉलमध्ये बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्हा संघटक तथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनिष विलास पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खेड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. बैठकीस रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन राजाराम गायकवाड, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष मंगेश सिताराम चाळके, बहुतुक सेना तालुका अध्यक्ष शशिकांत (पप्पू) आंबे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.3
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं; तर हजारो IPS, IAS, IRS, IFS अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!! पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक. विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई. ही सर्वच औषधांची कहानी. हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते??? मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे. ही गरीबांची पिळवनुक आहे,1