श्रमजीवी संघटनेचा आज एल्गार; पोषण आहार खंडित झाल्याने पंचायत समित्यांवर धडकणार ‘ताटली मोर्चा प्रतिनिधी भगवान आचारी *श्रमजीवी संघटनेचा आज एल्गार; पोषण आहार खंडित झाल्याने पंचायत समित्यांवर धडकणार ‘ताटली मोर्चा’ पालघर:महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेतील गंभीर त्रुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या उपासमारीच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शालेय पोषण आहार पुरवठा खंडित झाला आहे. याच्याच निषेधार्थ आज, शुक्रवार *३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन्ही जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांवर संघटनेतर्फे भव्य 'ताटली मोर्चा' काढण्यात येत आहे*.विद्यार्थ्यांची उपासमारी; प्रशासनाचा ढिसाळ कारभारआहार पुरवठा ठप्प: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार मिळालेला नाही.कुपोषणाचा धोका: नियमित आणि सकस आहार न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि कुपोषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.प्रशासकीय अनास्था: वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून या त्रुटींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.'ताटली वाजवून' सरकारचा निषेध करणारश्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघत आहे. हातामध्ये रिकाम्या ताटल्या आणि वाट्या घेऊन हजारो श्रमजीवी, पालक आणि कार्यकर्ते आज पंचायत समिती कार्यालयांवर धडकणार आहेत. "हक्काचा आहार मिळालाच पाहिजे" अशा घोषणा देत प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी हे अनोखे आंदोलन पुकारण्यात आले आहे.जर आजच्या या ताटली मोर्चानंतरही शासनाने तातडीने पोषण आहार पुरवठा सुरळीत केला नाही, तर यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या स्थानिक नेतृत्वाने दिला आहे. या मोर्चामुळे आज दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अशी माहिती संघटनेचे ञ्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष भगवान डोखे,व चित्रा जाधव प्रवकता यांनी दिली आहे
श्रमजीवी संघटनेचा आज एल्गार; पोषण आहार खंडित झाल्याने पंचायत समित्यांवर धडकणार ‘ताटली मोर्चा प्रतिनिधी भगवान आचारी *श्रमजीवी संघटनेचा आज एल्गार; पोषण आहार खंडित झाल्याने पंचायत समित्यांवर धडकणार ‘ताटली मोर्चा’ पालघर:महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेतील गंभीर त्रुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या उपासमारीच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शालेय पोषण आहार पुरवठा खंडित झाला आहे. याच्याच निषेधार्थ आज, शुक्रवार *३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन्ही जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांवर संघटनेतर्फे भव्य 'ताटली मोर्चा' काढण्यात येत आहे*.विद्यार्थ्यांची उपासमारी; प्रशासनाचा ढिसाळ कारभारआहार पुरवठा ठप्प: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार मिळालेला नाही.कुपोषणाचा धोका: नियमित आणि सकस आहार न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि कुपोषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.प्रशासकीय अनास्था: वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून या त्रुटींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.'ताटली वाजवून' सरकारचा निषेध करणारश्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघत आहे. हातामध्ये रिकाम्या ताटल्या आणि वाट्या घेऊन हजारो श्रमजीवी, पालक आणि कार्यकर्ते आज पंचायत समिती कार्यालयांवर धडकणार आहेत. "हक्काचा आहार मिळालाच पाहिजे" अशा घोषणा देत प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी हे अनोखे आंदोलन पुकारण्यात आले आहे.जर आजच्या या ताटली मोर्चानंतरही शासनाने तातडीने पोषण आहार पुरवठा सुरळीत केला नाही, तर यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या स्थानिक नेतृत्वाने दिला आहे. या मोर्चामुळे आज दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अशी माहिती संघटनेचे ञ्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष भगवान डोखे,व चित्रा जाधव प्रवकता यांनी दिली आहे
- टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.2
- येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.2
- खड्ड्याच्या प्रश्नांवर"अधिकारी महापौर, आमदारांचेही ऐकत नाहीत"; खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संताप नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "एवढे खड्डे नाशिकमध्ये यापूर्वी कधीच नव्हते. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असून वारंवार अपघात घडत आहेत आणि नागरिकांचा जीव जात आहे," असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली. तसेच महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. "अधिकारी महापौर, आमदार आणि कुंभमेळा मंत्र्यांचेही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा टोला लगावत भुजबळ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.1
- वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी1
- 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.1
- 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया2
- खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा; गावाचा संपर्क तुटला, रात्रीपासून वीजपुरवठा खंडित ग्रामपंचायत खूमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा; गावाचा संपर्क तुटला, रात्रीपासून वीजपुरवठा खंडित ग्रामपंचायत खूमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा नांदुरा तालुका सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडला असून गावाचा बाहेरील भागाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावाकडे जाणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रात्रीपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून त्यामुळे मोबाईल नेटवर्कही बंद पडले शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकाचे नुकसान झाले तर गावातील गुरेढोरांना सुरक्षित जागेत हलविण्यात आले असुन सतत पावुस चालु राहिला तर घरात पुराचे पाणी शिरू शकते प्रतिनिधी निलेश शेकोकार नांदुरा2