नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील गणपत बारी परिसरात मोठी दरड कोसळल्याने नाशिक–त्र्यंबकेश्वर आणि नाशिक–डहाणू मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. डोंगराचा मोठा भाग, माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक प्रवासी व पर्यटक तासन्तास अडकून पडले आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात वादळी वाऱ्यामुळे डोक्यावर पत्रा पडून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसामुळे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अभिनव माध्यमिक शाळा आणि सिनिअर कॉलेजची कुंपण भिंत कोसळली आहे. अनेक ठिकाणी झाडे व मोठ्या फांद्या रस्त्यावर पडल्या असून काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते आणि नाल्यांतील फरक ओळखणे कठीण झाले आहे. घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दाखल झाली असून जेसीबीच्या साहाय्याने माती व दगड हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र continuous पावसाने बचावकार्यात अडथळे येत आहेत. गणपत बारी हा दरडप्रवण भाग असून दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडतात. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पावसाचा मोठा फटका शेतीलाही बसला असून भात, मका आणि भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच दूध संकलन आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत देण्याची तसेच गणपत बारी परिसरात कायमस्वरूपी दरड प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील गणपत बारी परिसरात मोठी दरड कोसळल्याने नाशिक–त्र्यंबकेश्वर आणि नाशिक–डहाणू मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. डोंगराचा मोठा भाग, माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक प्रवासी व पर्यटक तासन्तास अडकून पडले आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात वादळी वाऱ्यामुळे डोक्यावर पत्रा पडून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसामुळे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अभिनव माध्यमिक शाळा आणि सिनिअर कॉलेजची कुंपण भिंत कोसळली आहे. अनेक ठिकाणी झाडे व मोठ्या फांद्या रस्त्यावर पडल्या असून काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते आणि नाल्यांतील फरक ओळखणे कठीण झाले आहे. घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, वन
विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दाखल झाली असून जेसीबीच्या साहाय्याने माती व दगड हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र continuous पावसाने बचावकार्यात अडथळे येत आहेत. गणपत बारी हा दरडप्रवण भाग असून दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडतात. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पावसाचा मोठा फटका शेतीलाही बसला असून भात, मका आणि भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच दूध संकलन आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत देण्याची तसेच गणपत बारी परिसरात कायमस्वरूपी दरड प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
- नाशिक शहरात २३ जुलै रोजी दिवसभर सतत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहर परिसरात आज दिवसभरात पावसाची जोरदार संततधार सुरूच आहे.3
- नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कथितपणे सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्टा व्यवसायाविरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आवामी विकास पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी पोलिस प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. हे निवेदन पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संबोधित करून देण्यात आले आहे. भद्रकाली परिसरातील काही ठिकाणी अशा बेकायदेशीर हालचाली चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अवैध धंद्यांमुळे स्थानिक नागरिक आणि विशेषतः तरुणांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वेळीच यावर प्रभावी कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेसह सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. निवेदनाद्वारे सरफराज पठाण यांनी या तक्रारींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरोप सत्य आढळल्यास संबंधित चालक, यात सहभागी व्यक्ती आणि अशा कामांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायदा व इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अवैध जुगार आणि सट्ट्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात आणि तरुणांचे भविष्य प्रभावित होते, त्यामुळे यावर वेळेत आणि प्रभावी कारवाई होणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आवामी विकास पक्षाने पोलिस प्रशासनाकडे या परिसरात नियमित गस्त, विशेष मोहीम आणि देखरेख वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या भागात असा कोणताही अवैध धंदा आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता या प्रकरणी पोलिस प्रशासनाच्या आगामी कारवाईकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध भावली धरण १००% भरून ओव्हरफ्लो झाले आहे. पावसाची संततधार कायम राहिल्याने जलसाठा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पावसामुळे परिसरातील निसर्गरम्य भाग जलमय झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाकडून भावली व भाम नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात निसर्गसौंदर्य खुलले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांनी पाण्यात उतरणे व हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.1
- सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे संकट निर्माण झाले असून संपूर्ण जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीच्या या तांडवामुळे परिसरात भूस्खलन झाले असून नदी-नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत.2